शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा युवांसाठी महत्त्वाची ठरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 02:44 IST

पी. गोपीचंद लिहितात...

पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेला शुक्रवारपासून ओडिशामध्ये प्रारंभ होत आहे. विद्यापीठ पातळीवरील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने क्रीडा मंत्रालयाचे हे पाऊल प्रशंसनीय आहे. खेलो इंडियाने प्राथमिक स्तरावर क्रीडा गुणवत्ता शोधण्यासाठी व त्याला पैलू पाडण्यासाठी शानदार कार्य केले आहे. आता या स्पर्धेला विद्यापीठ पातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यात २५ वर्षांखालील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळेल. ही स्पर्धा यासाठीही महत्त्वाची आहे की, पदकविजेत्याला भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार करता येईल. एवढेच नाहीतर आॅलिम्पिकसाठी सुद्धा.

जगभरातील मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी गुणवत्ता शोधण्याचे कार्य विद्यापीठांमध्ये केले जाते. उदाहरण द्यायचे झाल्यास अमेरिका येथे यूएस नॅशनल कोलेजियट अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन चॅम्पियनशिपला फार महत्त्व आहे. २०१८-१९ मध्ये एकट्या डिव्हिजन वनमध्ये १.८२ लाख खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता, तर असे तीन डिव्हिजन आहेत. यातील विजेते खेळाडू सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतात. दुर्दैवाने भारतात आम्ही प्रदीर्घ कालावधीपासून खेळ व शिक्षण यांना दोन वेगळ्या तराजूमध्ये तोलत असतो. महत्त्वाचे म्हणजे, आपण शिक्षण संस्थांकडे केवळ अकादमी सेंटर म्हणून बघायला नको, तर सेंटर आॅफ एक्सलन्स म्हणून बघायला हवे. येथे खेळासह विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीच्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन द्यायला हवे.मुलांवर मोठे दडपण असते. आधी १० वी आणि नंतर १२ वी चा विचार करावा लागतो. त्यानंतर प्रत्येक प्रकारच्या प्रवेश परीक्षांचा विचार येतो. विद्यापीठात मात्र सहज वातावरण असते. सुविधा असतात, जागा उपलब्ध असते. यामुळे खेळात कारकिर्द करण्यासाठी गुणवान खेळाडूंना पाठिंबा मिळू शकतो. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेच्या माध्यमातून विद्यापीठ प्रोत्साहन देईल, शिवाय विद्यार्थीही खेळाकडे गंभीरपणे पहायला शिकतील. मुलांसाठी ही मोठी संधी आहे. खेळात आंतरराष्टÑीय स्तरावर भरारी घेण्यासाठी विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा ‘मैलाचा दगड’ सिद्ध होऊ शकतील.भारतासारख्या विशाल देशात गुणवत्तेची उणीव नाही. त्या तुलनेत खेळाच्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे आता अनेक खेळांकडे कारकिर्दीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. तरीही अनेक संधींची गरज आहे. खेळात युवा भारतीयांच्या पंखांना बळ देण्याच्या हेतूने खेलो इंडिया विद्यापीठ गेम्स हे शानदार व्यासपीठ आहे. विशेषत: भारतीय बॅडमिंटनने गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय वर्चस्वाची नवी गाथा लिहिल्याचे सर्वांनी अनुभवले आहेच. 

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडिया