शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

केदारची कामगिरी आश्चर्यचकित करणारी

By admin | Updated: June 17, 2017 02:42 IST

उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशविरुद्ध मिळविलेल्या विजयात अनेक ‘हीरो’ ठरले, पण त्यात एक मात्र आश्चर्यचकित करणारा होता. केदार जाधवने डावाच्या मधल्या

- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशविरुद्ध मिळविलेल्या विजयात अनेक ‘हीरो’ ठरले, पण त्यात एक मात्र आश्चर्यचकित करणारा होता. केदार जाधवने डावाच्या मधल्या टप्प्यात भारताला वर्चस्व मिळवून दिले. त्याने महत्त्वाचे बळी घेत बांगलादेश संघ ३१० किंवा ३२० धावांची मजल मारणार नाही, हे निश्चित केले. डावाच्या मधल्या षटकांत कुठल्याही गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाचे बळी घेण्यासारखे दुसरे चांगले काम नाही, पण यामुळे भारताच्या पाचव्या गोलंदाजाबाबत मात्र प्रश्न उपस्थित झाला आहे. भुवनेश्वरने सुरुवातीला बळी घेतल्यानंतर आणि त्याने व बुमराहने एजबेस्टनच्या पाटा खेळपट्टीवर शिस्तबद्ध मारा केला. त्यानंतर तमिम इक्बाल व मुशीफिकूर रहीम यांनी डाव सावरला. विराटने केदारकडे चेंडू सोपविण्याचा जुगार खेळला आणि त्यात त्याला यशही मिळाले. केदार २८ व्या षटकात गोलंदाजीला आला. त्याने सलग सहा षटके टाकताना २२ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. २८ ते ४० षटकांदरम्यान बांगलादेशला केवळ ५५ धावा वसूल करता आल्या आणि त्यासाठी त्यांना तीन गड्यांचे मोल द्यावे लागले. त्यामुळे तळाच्या फलंदाजांसाठी सध्याच्या स्थितीत डेथ ओव्हर्स स्पेशालिस्टमध्ये गणल्या जाणाऱ्या गोलंदाजांविरुद्ध धावा फटकावणे कठीण बाब होती.केदार चाणाक्ष गोलंदाज आहे. कमी उंची लाभलेला केदार राऊंड आर्म शैलीने गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याचे चेंडू फलंदाजाच्या रोखाने येतात. त्याच्या चेंडूचा टप्पा फुललेंथही नसतो आणि आखूडही नसतो. त्यामुळे चेंडूच्या खोलात जाऊन फटका खेळणे किंवा बॅकफूटवर कटचा फटका मारण्याची संधी नसते. त्यामुळे त्याचे एकापाठोपाठ एक निर्धाव चेंडू पडत असतात. यापूर्वी, न्यूझीलंड व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याने गोलंदाजीमध्ये छाप सोडली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या धावगतीवर लगाम घालण्यासाठी २५ ते ४० व्या षटकांदरम्यान बळी घेणे आवश्यक असते. भारतीय संघाला हार्दिक पांड्याकडून गोलंदाजीमध्ये आशा आहे. कारण माझ्या मते सध्याच्या घडीला भारतीय संघात पाचवा गोलंदाज हीच एकमेव कमकुवत बाजू आहे. हा अपवाद वगळता गुरुवारी भारतीय संघाची खेळी शानदार ठरली. शिखर धवनचा फॉर्म संघाच्या यशात महत्त्वाचा आहे. रोहितचे योगदानही उल्लेखनीय ठरत आहे. विराटचे कव्हर ड्राईव्हचे फटके डोळ्याचे पारणे फेडणारे होते. त्याची आतापर्यंतची या स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी होती. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम लढतीसाठी आणखी काही राखून ठेवलेले असेल, अशी आशा आहे. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान अंतिम लढत होणे म्हणजे या रंगतदार स्पर्धेची यशस्वी सांगता होण्यासारखे आहे. (गेमप्लॉन)