शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

केदारची कामगिरी आश्चर्यचकित करणारी

By admin | Updated: June 17, 2017 02:42 IST

उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशविरुद्ध मिळविलेल्या विजयात अनेक ‘हीरो’ ठरले, पण त्यात एक मात्र आश्चर्यचकित करणारा होता. केदार जाधवने डावाच्या मधल्या

- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशविरुद्ध मिळविलेल्या विजयात अनेक ‘हीरो’ ठरले, पण त्यात एक मात्र आश्चर्यचकित करणारा होता. केदार जाधवने डावाच्या मधल्या टप्प्यात भारताला वर्चस्व मिळवून दिले. त्याने महत्त्वाचे बळी घेत बांगलादेश संघ ३१० किंवा ३२० धावांची मजल मारणार नाही, हे निश्चित केले. डावाच्या मधल्या षटकांत कुठल्याही गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाचे बळी घेण्यासारखे दुसरे चांगले काम नाही, पण यामुळे भारताच्या पाचव्या गोलंदाजाबाबत मात्र प्रश्न उपस्थित झाला आहे. भुवनेश्वरने सुरुवातीला बळी घेतल्यानंतर आणि त्याने व बुमराहने एजबेस्टनच्या पाटा खेळपट्टीवर शिस्तबद्ध मारा केला. त्यानंतर तमिम इक्बाल व मुशीफिकूर रहीम यांनी डाव सावरला. विराटने केदारकडे चेंडू सोपविण्याचा जुगार खेळला आणि त्यात त्याला यशही मिळाले. केदार २८ व्या षटकात गोलंदाजीला आला. त्याने सलग सहा षटके टाकताना २२ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. २८ ते ४० षटकांदरम्यान बांगलादेशला केवळ ५५ धावा वसूल करता आल्या आणि त्यासाठी त्यांना तीन गड्यांचे मोल द्यावे लागले. त्यामुळे तळाच्या फलंदाजांसाठी सध्याच्या स्थितीत डेथ ओव्हर्स स्पेशालिस्टमध्ये गणल्या जाणाऱ्या गोलंदाजांविरुद्ध धावा फटकावणे कठीण बाब होती.केदार चाणाक्ष गोलंदाज आहे. कमी उंची लाभलेला केदार राऊंड आर्म शैलीने गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याचे चेंडू फलंदाजाच्या रोखाने येतात. त्याच्या चेंडूचा टप्पा फुललेंथही नसतो आणि आखूडही नसतो. त्यामुळे चेंडूच्या खोलात जाऊन फटका खेळणे किंवा बॅकफूटवर कटचा फटका मारण्याची संधी नसते. त्यामुळे त्याचे एकापाठोपाठ एक निर्धाव चेंडू पडत असतात. यापूर्वी, न्यूझीलंड व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याने गोलंदाजीमध्ये छाप सोडली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या धावगतीवर लगाम घालण्यासाठी २५ ते ४० व्या षटकांदरम्यान बळी घेणे आवश्यक असते. भारतीय संघाला हार्दिक पांड्याकडून गोलंदाजीमध्ये आशा आहे. कारण माझ्या मते सध्याच्या घडीला भारतीय संघात पाचवा गोलंदाज हीच एकमेव कमकुवत बाजू आहे. हा अपवाद वगळता गुरुवारी भारतीय संघाची खेळी शानदार ठरली. शिखर धवनचा फॉर्म संघाच्या यशात महत्त्वाचा आहे. रोहितचे योगदानही उल्लेखनीय ठरत आहे. विराटचे कव्हर ड्राईव्हचे फटके डोळ्याचे पारणे फेडणारे होते. त्याची आतापर्यंतची या स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी होती. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम लढतीसाठी आणखी काही राखून ठेवलेले असेल, अशी आशा आहे. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान अंतिम लढत होणे म्हणजे या रंगतदार स्पर्धेची यशस्वी सांगता होण्यासारखे आहे. (गेमप्लॉन)