शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी : भारतीय रेल्वेला राष्ट्रीय पुरुष गट स्पर्धेचे जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 20:11 IST

रेल्वेचे हे या स्पर्धेतील २२वे जेतेपद.

मुंबई : भारतीय रेल्वेने सेनादलाचा ४१-१७असा धुव्वा उडवित "६६व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या" चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील त्यांचे हे २२वे जेतेपद. ४वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ५व्या वर्षी त्यांना हे यश लाभले. या अगोदर मंडया-कर्नाटक येथे २०१३ साली झालेल्या स्पर्धेत त्यांनी सेनादलालाच पराभूत करीत शेवटचे जेतेपद मिळविले होते. 

    रोहा,म्हाडा कॉलिनीतील द. ग. तटकरे क्रीडानगरीत झालेल्या अंतिम सामना प्रो-कबड्डीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या पवन शेरावतने आपल्या झंजावाती चढायांनी. तर गतवर्षी आपल्या अभेद्य बचावाने सर्वाधिक पकडीचे गुण मिळविणाऱ्या रविंदर बहलने आपल्या पकडीच्या खेळणे गाजविला. पहिल्याच चढाईत रेल्वेने मोनू गोयतची पकड करीत सेनादलाला इशारा दिला.नंतर सलग गुण घेत आपली आघाडी ३-०अशी वाढविली. सेनादलाने पवनची पकड करीत पहिल्या गुण घेतला. १५व्या मिनिटाला सेनादलावर लोण देत रेल्वेने १७-०९अशी आघाडी घेतली. मध्यांतराला २७-१३अशी आघाडी रेल्वेकडे होती. मध्यांतरानंतर ९व्या मिनिटाला लोण देत रेल्वेने २७-१३अशी आपली आघाडी वाढविली. या नंतर सेनादलाचा प्रतिकार मावळला. तीस ते पस्तीस हजाराच्या प्रचंड संख्येने सामना पहाण्यासाठी गर्दी करून उपस्थित कबड्डीरसिकांना या एकतर्फी सामन्याने निराश केले. या एकतर्फी सामन्यामुळे मध्यांतरानंतर त्यांनी हळूहळू काढता पाय घेण्यास सुरुवात केले.

     रेल्वेच्या या विजयात पवन शेरावत यांनी १९चढाया करीत १बोनस गुणासह ७झटापटीचे गुण घेतले.पण ६वेळा त्याची पकड झाली. दिपकने देखील आपल्या १५चढायात ५गुण घेतले, तर ३वेळा त्याची पकड झाली. रविंदर बहल यांनी ७पकडी करीत,तर दीपक आणि धर्मेश या मधरक्षक जोडगळीने एकत्रित ३पकडी करीत या विजयात  मोलाची भूमिका बजावली. सेनादलाच्या या पराभवास कारणीभूत ठरला तो मोनू गोयतचा हरविलेला सूर. यंदाच्या हंगामात सर्वाधिक बोली लागलेला मोनू प्रो-कबड्डीत देखील अपयशी ठरला होता. या स्पर्धेत देखील त्याचा खेळ बहरला नाही. या सामन्यात त्याने १३चढाया केल्या. त्यात त्याने अवघा १बोनस गुण मिळविला. तर ९वेळा तो पकडला गेला. यात तो दोन वेळा स्वयंचित (सेल्फ आउट) झाला. नितेशकुमार, जयदीप यांनी ३-३पकडी करीत थोडाफार प्रतिकार केला. पण विजयासाठी तो पुरेसा नव्हता.

   या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात सेनादलाने हरियाणाचा ५२-३८ असा ,तर रेल्वेने यजमान महाराष्ट्राचा ४७-२०असा पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली.महाराष्ट्र आपले विजेतेपद राखेल अशी आस लावून प्रचंड संख्येने गर्दी करून सामना पहाण्यास आलेल्या क्रीडारसिकाचा महाराष्ट्राच्या या पराभवाने हिरमोड झाला. त्यातच अंतिम सामना देखील रटाळ झाल्याने त्यांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली. 

टॅग्स :Kabaddiकबड्डीrailwayरेल्वे