शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

कबड्डी : स्वस्तिक क्रीडा मंडळाचा डबल धमाका; दोन जेतेपदावर कोरले नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 17:53 IST

पुरुषांच्या अंतिम सामन्यात निलेश शिंदेच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सचा ३०-१२ असा सहज पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.

मुंबई :- स्वस्तिक क्रीडा मंडळाने मुंबई उपनगर कबड्डी असो. आयोजित “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” पुरुष आणि कुमार गटाचे विजेतेपद पटकावत “डबल धमाका” केला. आज उपनगर कबड्डी स्पर्धेचा अंतिम दिवस. नेहरू नगर-कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर संपन्न झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात निलेश शिंदेच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सचा ३०-१२ असा सहज पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. मध्यांतराला १८-०६ अशी आघाडी घेणाऱ्या स्वस्तिकने मध्यांतरानंतर देखील आपला जोश कायम ठेवत जॉलीला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. स्वस्तिकच्या विजयाचे श्रेय सुयोग राजापकरच्या आक्रमक चढाया आणि अभिषेक चव्हाण यांच्या धाडशी पकडीला जाते. जॉलीच्या श्रीकांत बिर्जे, सचिन सावंत यांना या सामन्यात सूर सापडला नाही.

   कुमार गटाच्या अंतिम सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळाने अंबिका सेवा मंडळाला ३४-१८ असा पाडाव करीत या गटाच्या जेतेपदा बरोबर “डबल धमाका” उडवून दिला. पहिल्या डावात २०-०२ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या स्वस्तिकला दुसऱ्या डावात अंबिकाने कडवी लढत देत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. ही आघाडी कमी करण्यात त्यांना यश आले खरे, पण संघाचा विजय साजरा करण्यात ते कमी पडले. स्वस्तिकच्या या विजयाचे श्रेय सिद्धेश पांचाळ, हृतिक कांबळे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला जाते. अंबिकाच्या शुभम दिडवाघ, शुभम सुतार यांच्याकडून संघाच्या विजयाचे प्रयत्न तोकडे पडले.

  किशोर गटाच्या अंतिम सामन्यात सुरक्षा क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सला ५१-३८ असे लीलया नमवित या गटाचे विजेतेपद संपादन केले. विश्रांतीला २२-१९ अशी आघाडी घेणाऱ्या सुरक्षाने विश्रांतीनंतर देखील जोरदार प्रतिकार करीत हा विजय साकारला. आदित्य अंधेर, उदित यादव यांच्या अष्टपैलू खेळाला सुरक्षाच्या या विजयाचे श्रेय जाते. त्यांच्या या झंजावातामुळे त्यांनी गुणांचे अर्धशतक पार केले. जॉलीच्या दिनेश यादव, रजत राजकुमार सिंग यांनी कडवी लढत दिली.  या पराभवामुळे त्यांना यंदा पुरुष आणि किशोर अशा दोन्ही गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

  किशोरी गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने आकाश स्पोर्ट्स क्लबचे आव्हान ४२-३४ असे संपवित या गटाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. याशिका पुजारी, आरती मुंगुटकर यांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत स्वराज्यला २८-१२ अशी आश्वासक आघाडी घेऊन दिली होती.  उत्तरार्धात मात्र आकाशच्या आकांक्षा बने, कल्पिता शेवाळे यांनी आपला खेळ अधिक गतिमान करीत सामन्यात चुरस निर्माण केली. पण विज्यापासून ते खूप मागे राहिले.

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबई