शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

कबड्डी : स्वस्तिक क्रीडा मंडळाचा डबल धमाका; दोन जेतेपदावर कोरले नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 17:53 IST

पुरुषांच्या अंतिम सामन्यात निलेश शिंदेच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सचा ३०-१२ असा सहज पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.

मुंबई :- स्वस्तिक क्रीडा मंडळाने मुंबई उपनगर कबड्डी असो. आयोजित “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” पुरुष आणि कुमार गटाचे विजेतेपद पटकावत “डबल धमाका” केला. आज उपनगर कबड्डी स्पर्धेचा अंतिम दिवस. नेहरू नगर-कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर संपन्न झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात निलेश शिंदेच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सचा ३०-१२ असा सहज पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. मध्यांतराला १८-०६ अशी आघाडी घेणाऱ्या स्वस्तिकने मध्यांतरानंतर देखील आपला जोश कायम ठेवत जॉलीला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. स्वस्तिकच्या विजयाचे श्रेय सुयोग राजापकरच्या आक्रमक चढाया आणि अभिषेक चव्हाण यांच्या धाडशी पकडीला जाते. जॉलीच्या श्रीकांत बिर्जे, सचिन सावंत यांना या सामन्यात सूर सापडला नाही.

   कुमार गटाच्या अंतिम सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळाने अंबिका सेवा मंडळाला ३४-१८ असा पाडाव करीत या गटाच्या जेतेपदा बरोबर “डबल धमाका” उडवून दिला. पहिल्या डावात २०-०२ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या स्वस्तिकला दुसऱ्या डावात अंबिकाने कडवी लढत देत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. ही आघाडी कमी करण्यात त्यांना यश आले खरे, पण संघाचा विजय साजरा करण्यात ते कमी पडले. स्वस्तिकच्या या विजयाचे श्रेय सिद्धेश पांचाळ, हृतिक कांबळे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला जाते. अंबिकाच्या शुभम दिडवाघ, शुभम सुतार यांच्याकडून संघाच्या विजयाचे प्रयत्न तोकडे पडले.

  किशोर गटाच्या अंतिम सामन्यात सुरक्षा क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सला ५१-३८ असे लीलया नमवित या गटाचे विजेतेपद संपादन केले. विश्रांतीला २२-१९ अशी आघाडी घेणाऱ्या सुरक्षाने विश्रांतीनंतर देखील जोरदार प्रतिकार करीत हा विजय साकारला. आदित्य अंधेर, उदित यादव यांच्या अष्टपैलू खेळाला सुरक्षाच्या या विजयाचे श्रेय जाते. त्यांच्या या झंजावातामुळे त्यांनी गुणांचे अर्धशतक पार केले. जॉलीच्या दिनेश यादव, रजत राजकुमार सिंग यांनी कडवी लढत दिली.  या पराभवामुळे त्यांना यंदा पुरुष आणि किशोर अशा दोन्ही गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

  किशोरी गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने आकाश स्पोर्ट्स क्लबचे आव्हान ४२-३४ असे संपवित या गटाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. याशिका पुजारी, आरती मुंगुटकर यांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत स्वराज्यला २८-१२ अशी आश्वासक आघाडी घेऊन दिली होती.  उत्तरार्धात मात्र आकाशच्या आकांक्षा बने, कल्पिता शेवाळे यांनी आपला खेळ अधिक गतिमान करीत सामन्यात चुरस निर्माण केली. पण विज्यापासून ते खूप मागे राहिले.

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबई