शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग:सहा भारतीयांचा अंतिम फेरीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 10:16 IST

भारताच्या सहा बॉक्सर्सनी दुबई येथे सुरू असलेल्या ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

नवी दिल्ली : भारताच्या सहा बॉक्सर्सनी दुबई येथे सुरू असलेल्या ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यापैकी दोन बॉक्सर्सना वॉकओव्हर मिळाला. कझाखिस्तानच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने त्यांचे खेळाडू विलगीकरणात गेले. अंतिम फेरी गाठलेल्या भारतीयांमध्ये २ मुले आणि ४ मुलींचा समावेश आहे.

मुलींमध्ये सिमरन वर्मा (५२ किलो) आणि स्नेहा (६६ किलो) यांचे प्रतिस्पर्धी खेळाडू कझाखिस्तानचे असल्याने त्यांना वॉकओव्हर मिळाला. संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कझाकस्तानच्या खावा बोल्कोयेवा आणि अनार तुरिनबेक या खेळाडूंना विलगीकरणात जावे लागले आहे. भारताचे प्रशिक्षक भास्कर भट्ट यांनी सांगितले की, ‘कजाकिस्तानची एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने दुसऱ्या खेळाडूलाही विलगीकरणात जावे लागले. दोन्ही खेळाडू एकाच रूममध्ये राहत होत्या.’ सिमरन आणि स्नेहा यांच्यासह प्रीती (५७ किलो) आणि प्रीती दहिया (६० किलो) यांनीही अंतिम फेरी गाठली. प्रीतीने नेपाळच्या नारिका रायला तिसऱ्या फेरीत नॉकआऊट केले, तर प्रीती दहियाने उझबेकिस्तानच्या रुख्सोना उकतामोवाला ३-२ असे नमवले.

मुलांमध्ये वंशजने (६४ किलो) इराणच्या फरिदी अबुलफजलचा ५-० असा सहज पाडाव केला. विशालने (८० किलो) कझाखिस्तानच्या दौरेन मामिरला ५-० असे लोळवले. त्याचवेळी, दक्षला (५७ किलो) उझबेकिस्तानच्या सोलिजोनोज समंदर याच्याविरुद्ध १-४ असा पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिमन्यू (९२ किलो) आणि अमन सिंग बिष्ट (९२ किलोहून अधिक) यांनाही आपापल्या गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 

टॅग्स :boxingबॉक्सिंग