शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जामठ्यात क्रिकेटची माती !

By admin | Updated: November 27, 2015 00:44 IST

भारत-द. आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी खेळपट्टीच्या खराब स्वरूपामुळे चर्चेत आली आहे. दुसऱ्याच दिवशी सामन्याचा निकाल दृष्टिपथात आला

किशोर बागडे , नागपूरभारत-द. आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी खेळपट्टीच्या खराब स्वरूपामुळे चर्चेत आली आहे. दुसऱ्याच दिवशी सामन्याचा निकाल दृष्टिपथात आला. दोन दिवसांत तब्बल ३२ गडी बाद झाले, पण कसोटीचे कौशल्य आणि दर्जा मात्र पडलेला दिसला. नंबर वन असलेला द. आफ्रिका संघ २००६ पासून परदेशात कसोटी मालिका जिंकत आला आहे. नागपूर सामन्यात पराभव झाल्यास त्यांचा हा विक्रम मोडीत निघेल. जामठ्याच्या मातीमय झालेल्या खेळपट्टीवर एकाच दिशी २० गडी बाद होण्याच्या विक्रमाशीही बरोबरी झाली. क्रिकेट चाहत्यांसाठी हे आकडे उत्साहवर्धक असू शकतील, पण क्रिकेटच्या लोकप्रियतेला मागे खेचणारे आहेत. कसोटी सामना फलंदाज आणि गोलंदाजांच्या शैलीची परीक्षा घेणारा असतो. या कसोटीत असे काहीही दिसत नाही. यजमान देशाला पूरक ठरतील अशी खेळपट्टी देण्याचे संकेत असले तरी इतकी खराब खेळपट्टी बनविल्यास विरोधी संघ निराशेच्या गर्तेत लोटतो. वन-डे आणि टी-२० मालिका गमविल्याचा वचपा कदाचित मालिका विजयातून काढायचा बीसीसीआयने निर्धार केला असावा असा निष्कर्ष सामना पाहणारे सहज काढू शकतील. हा वेळ, पैसा आणि मेहनतीचा अपव्यय आहे. अशा खेळपट्टीमुळे कसोटी सामन्यातून चांगले फलंदाज आणि गोलंदाज मिळणार नाहीत हा बोध घ्यायला हवा. आम्हाला हिरव्यागार खेळपट्ट्या नव्हे, पण ज्या दोन दिवसांत निकाल देतील अशाही खेळपट्ट्या नकोत. अशाच खराब विकेटवर खेळत राहिल्यास विक्रम होत राहतील, पण टीम इंडियाला चांगले क्रिकेटपटू मिळणार नाहीत. सध्याच्या संघाकडे पाहिल्यास कसोटी दर्जाचा हाच तो संघ का, असा सहज प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात येईल. नको ते शॉट्स मारण्याची घाई, संयम न दाखविणे, शैलीदार फलंदाजी संपल्यात जमा झाल्यासारखे दिसत आहे. कसोटीचा निकाल यावा आणि निकाल देणाऱ्या खेळपट्ट्या हव्यात हे पटण्यासारखे आहे.