शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जामठ्यात क्रिकेटची माती !

By admin | Updated: November 27, 2015 00:44 IST

भारत-द. आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी खेळपट्टीच्या खराब स्वरूपामुळे चर्चेत आली आहे. दुसऱ्याच दिवशी सामन्याचा निकाल दृष्टिपथात आला

किशोर बागडे , नागपूरभारत-द. आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी खेळपट्टीच्या खराब स्वरूपामुळे चर्चेत आली आहे. दुसऱ्याच दिवशी सामन्याचा निकाल दृष्टिपथात आला. दोन दिवसांत तब्बल ३२ गडी बाद झाले, पण कसोटीचे कौशल्य आणि दर्जा मात्र पडलेला दिसला. नंबर वन असलेला द. आफ्रिका संघ २००६ पासून परदेशात कसोटी मालिका जिंकत आला आहे. नागपूर सामन्यात पराभव झाल्यास त्यांचा हा विक्रम मोडीत निघेल. जामठ्याच्या मातीमय झालेल्या खेळपट्टीवर एकाच दिशी २० गडी बाद होण्याच्या विक्रमाशीही बरोबरी झाली. क्रिकेट चाहत्यांसाठी हे आकडे उत्साहवर्धक असू शकतील, पण क्रिकेटच्या लोकप्रियतेला मागे खेचणारे आहेत. कसोटी सामना फलंदाज आणि गोलंदाजांच्या शैलीची परीक्षा घेणारा असतो. या कसोटीत असे काहीही दिसत नाही. यजमान देशाला पूरक ठरतील अशी खेळपट्टी देण्याचे संकेत असले तरी इतकी खराब खेळपट्टी बनविल्यास विरोधी संघ निराशेच्या गर्तेत लोटतो. वन-डे आणि टी-२० मालिका गमविल्याचा वचपा कदाचित मालिका विजयातून काढायचा बीसीसीआयने निर्धार केला असावा असा निष्कर्ष सामना पाहणारे सहज काढू शकतील. हा वेळ, पैसा आणि मेहनतीचा अपव्यय आहे. अशा खेळपट्टीमुळे कसोटी सामन्यातून चांगले फलंदाज आणि गोलंदाज मिळणार नाहीत हा बोध घ्यायला हवा. आम्हाला हिरव्यागार खेळपट्ट्या नव्हे, पण ज्या दोन दिवसांत निकाल देतील अशाही खेळपट्ट्या नकोत. अशाच खराब विकेटवर खेळत राहिल्यास विक्रम होत राहतील, पण टीम इंडियाला चांगले क्रिकेटपटू मिळणार नाहीत. सध्याच्या संघाकडे पाहिल्यास कसोटी दर्जाचा हाच तो संघ का, असा सहज प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात येईल. नको ते शॉट्स मारण्याची घाई, संयम न दाखविणे, शैलीदार फलंदाजी संपल्यात जमा झाल्यासारखे दिसत आहे. कसोटीचा निकाल यावा आणि निकाल देणाऱ्या खेळपट्ट्या हव्यात हे पटण्यासारखे आहे.