शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

ज्यु. क्रिकेटपटूंसाठी योजना आखण्याची गरज

By admin | Updated: December 2, 2015 04:04 IST

भारतात ज्युनियर क्रिकेटपटूंसाठी पायाभूत सुविधा आणि योजना उभारण्याची गरज असल्याचे मत माजी कर्णधार राहुल द्रविड याने मंगळवारी व्यक्त केले. ज्युनियर स्तरावर वय

नवी दिल्ली : भारतात ज्युनियर क्रिकेटपटूंसाठी पायाभूत सुविधा आणि योजना उभारण्याची गरज असल्याचे मत माजी कर्णधार राहुल द्रविड याने मंगळवारी व्यक्त केले. ज्युनियर स्तरावर वय लपविण्याचे प्रकार आणि संशयास्पद गोलंदाजी थांबविण्यासाठी योजना आखण्याचे द्रविडने बीसीसीआयला आवाहन केले.चौथ्या टायगर पतौडी स्मृती लेक्चर सीरिजमध्ये व्याख्यान देताना द्रविड म्हणाला, ‘‘१९ वर्षे वयाच्या खेळाडूची संशयास्पद गोलंदाजीसाठी तक्रार झाल्याचे ऐकून मला धक्का बसला.’’ त्याची ही शैली चेक करण्यासाठी कोच नव्हते काय? त्याच्या संशयास्पद शैलीची सुरुवात दहा वर्षांआधी झाली होती काय? तो विकेट घेत सामना जिंकून देत असावा, म्हणून कोचने डोळेझाक केली का, असे उद्विग्न प्रश्न द्रविडने विचारले. तो म्हणाला, ‘‘१९ वर्षांचा मुलगा कठोर मेहनत घेत विश्वचषकात खेळत असेल व नंतर संशयास्पद गोलंदाजीसाठी बाहेर काढला जात असेल तर त्याचे निराश होणे स्वाभाविक आहे. अशा प्रकारच्या झटपट निकाल देणाऱ्या घटनांवर भर दिल्याने ज्युनियर स्तरावर अधिक वयाचे खेळाडू खेळण्याचे प्रकार घडत आहेत. हे सर्व तेव्हाच शक्य होते जेव्हा एखादा कोच खेळाडूचे वय बदलून त्याला स्थानिक स्पर्धेत खेळण्याची परवानगी देतो.’’बीसीसीआयने युवा खेळाडूंना आकर्षित करण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन करीत द्रविड म्हणाला, ‘‘आम्ही युवा खेळाडूंना आकर्षित करण्याची योजना राबविण्यात अपयशी ठरत असल्याने प्रतिभावान खेळाडू पुढे येताना दिसत नाहीत. क्रिकेटसाहित्याच्या विक्रीत मंदी आल्याचे एका नामांकित क्रिकेटसाहित्य विक्रेत्या कंपनीने तथ्य उलगडले आहे.’’ बीसीसीआयने ज्युनियर स्तरावर चांगल्या योजना तयार कराव्यात; शिवाय मृदुभाषी प्रशिक्षक नेमावेत. ज्युनियर क्रिकेटमध्ये रोटेशन पद्धत अधिक प्रभावी ठरू शकेल. यामुळे खेळाडूंना पुरेशी संधी उपलब्ध होईल. युवा खेळाडू विविध कारणांनी लवकर क्रिकेटकडे पाठ फिरवितात. आई-वडिलांच्या अपेक्षांची पूर्तता न होणे, हे यामागील मोठे कारण आहे. खेळाडूंनी खेळासोबतच शिक्षणात सातत्य राखल्यास ते चांगले नागरिक बनू शकतील, असे तो म्हणाला.(वृत्तसंस्था)एखादा खेळाडू वय लपवून संघात स्थान मिळवीत असेल आणि खेळत असेल तर प्रामाणिक आणि प्रतिभावान खेळाडूवर याचा विपरीत परिणाम होतो. प्रामाणिक खेळाडूला संघातील स्थान गमवावे लागल्याने त्याच्या डोक्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.- राहुल द्रविड