शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

तर मालिका होणे कठीणच : शहरयार

By admin | Updated: December 12, 2015 00:14 IST

भारत-पाक यांच्यात प्रस्तावित क्रिकेट मालिका पुढील महिन्यात जानेवारीत न झाल्यास वर्षभरात ही मालिका होणे कठीण असल्याचे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले आहे.

कराची : भारत-पाक यांच्यात प्रस्तावित क्रिकेट मालिका पुढील महिन्यात जानेवारीत न झाल्यास वर्षभरात ही मालिका होणे कठीण असल्याचे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले आहे.शहरयार म्हणाले, ‘‘उभय संघांना वर्षभर भरगच्च क्रिकेट खेळायचे असल्याने ही मालिका वेळेत न झाल्यास ती वर्षभर होऊ शकेल, असे मला वाटत नाही. भारतासोबत द्विपक्षीय मालिकेचे आयोजन आणि टी-२० विश्वचषकात पाकचा सहभाग या दोन्ही बाबी भिन्न आहेत. टी-२० आयसीसीची स्पर्धा असल्याने संघ खेळायला पाठविण्यासाठी पीसीबीला सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आम्ही स्थितीवर नजर ठेवून आहोत. भारतात पाक संघ पाठवायचा झाल्यास सरकारकडून परवानगी घेतल्यानंतरच खेळणे शक्य होईल.’’श्रीलंकेत लहान मालिका खेळण्याबाबत भारत सरकारने संघाला अद्याप परवानगी बहाल केली नसल्याबद्दल शहरयार निराश दिसले. ते म्हणाले, ‘‘मालिका अयोजनाबद्दल माझ्या प्रयत्नांवर काही जण टीका करीत असल्याची मला जाणीव आहे. पण ही मालिका झाली किंवा नाही तरी भारताने उभय बोर्डात झालेल्या समझोत्याचा सन्मान राखायला हवा, असे माझे मत आहे.’’ भारताने मालिका न खेळल्यास पाकला आर्थिक फटका बसेल, मात्र आम्ही दिवाळखोरीत निघणार नसल्याचे शहरयार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘पीसीबीची आर्थिक स्थिती चांगलीच आहे. मालिका न झाल्यास काही अडचण जाणवेल, पण आम्ही आर्थिक डबघाईस आलो असे कुणी समजू नये. भारताविरुद्ध मालिका आयोजनाची आशा सोडलेली नाही. मालिका लवकर व्हावी, ही पीसीबीची इच्छा आहे. आम्ही आणखी काही दिवस भारताच्या होकाराची वाट पाहू.’’ ईसीबी अध्यक्ष जाईल्स क्लार्क हे यासंदर्भात मध्यस्थाची भूमिका बाजावत असल्याचे शहरयार यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)