शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

तर मालिका होणे कठीणच : शहरयार

By admin | Updated: December 12, 2015 00:14 IST

भारत-पाक यांच्यात प्रस्तावित क्रिकेट मालिका पुढील महिन्यात जानेवारीत न झाल्यास वर्षभरात ही मालिका होणे कठीण असल्याचे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले आहे.

कराची : भारत-पाक यांच्यात प्रस्तावित क्रिकेट मालिका पुढील महिन्यात जानेवारीत न झाल्यास वर्षभरात ही मालिका होणे कठीण असल्याचे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले आहे.शहरयार म्हणाले, ‘‘उभय संघांना वर्षभर भरगच्च क्रिकेट खेळायचे असल्याने ही मालिका वेळेत न झाल्यास ती वर्षभर होऊ शकेल, असे मला वाटत नाही. भारतासोबत द्विपक्षीय मालिकेचे आयोजन आणि टी-२० विश्वचषकात पाकचा सहभाग या दोन्ही बाबी भिन्न आहेत. टी-२० आयसीसीची स्पर्धा असल्याने संघ खेळायला पाठविण्यासाठी पीसीबीला सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आम्ही स्थितीवर नजर ठेवून आहोत. भारतात पाक संघ पाठवायचा झाल्यास सरकारकडून परवानगी घेतल्यानंतरच खेळणे शक्य होईल.’’श्रीलंकेत लहान मालिका खेळण्याबाबत भारत सरकारने संघाला अद्याप परवानगी बहाल केली नसल्याबद्दल शहरयार निराश दिसले. ते म्हणाले, ‘‘मालिका अयोजनाबद्दल माझ्या प्रयत्नांवर काही जण टीका करीत असल्याची मला जाणीव आहे. पण ही मालिका झाली किंवा नाही तरी भारताने उभय बोर्डात झालेल्या समझोत्याचा सन्मान राखायला हवा, असे माझे मत आहे.’’ भारताने मालिका न खेळल्यास पाकला आर्थिक फटका बसेल, मात्र आम्ही दिवाळखोरीत निघणार नसल्याचे शहरयार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘पीसीबीची आर्थिक स्थिती चांगलीच आहे. मालिका न झाल्यास काही अडचण जाणवेल, पण आम्ही आर्थिक डबघाईस आलो असे कुणी समजू नये. भारताविरुद्ध मालिका आयोजनाची आशा सोडलेली नाही. मालिका लवकर व्हावी, ही पीसीबीची इच्छा आहे. आम्ही आणखी काही दिवस भारताच्या होकाराची वाट पाहू.’’ ईसीबी अध्यक्ष जाईल्स क्लार्क हे यासंदर्भात मध्यस्थाची भूमिका बाजावत असल्याचे शहरयार यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)