शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

धोनीला टार्गेट करणे चुकीचे !

By admin | Updated: October 14, 2015 00:07 IST

उत्कृष्ट ‘फिनिशर’ म्हणून ज्याची ख्याती आहे, त्या महेंद्रसिंह धोनीमुळे आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना गमवावा लागला, अशी ओरड झाल्यानंतर त्याच्या निवृत्तीवरही चर्चा रंगली.

सचिन कोरडे उत्कृष्ट ‘फिनिशर’ म्हणून ज्याची ख्याती आहे, त्या महेंद्रसिंह धोनीमुळे आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना गमवावा लागला, अशी ओरड झाल्यानंतर त्याच्या निवृत्तीवरही चर्चा रंगली. असे असले तरी या खेळाडूमधील ‘जज्बा’ कायम आहे. तोच संघातील खरा ‘मॅच टर्नर’ आहे.सध्या तरी त्याला टार्गेट करणे चुकीचे आहे, असे सध्या भारतीय संघाचे व्यवस्थापक असलेले विनोद फडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते इंदूर येथून दूरध्वनीवरून बोलत होते. भारतीय संघाचे मंगळवारी इंदूर येथे विमानतळावर शानदार स्वागत करण्यात आले. चाहत्यांच्या स्वागताने खेळाडूंचाही उत्साह वाढला. हाच संघ आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने खचून गेला होता. हातचा सामना गमावल्याने खेळाडू दु:खी झाले होते; मात्र संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी खेळाडूंना आत्मविश्वासाचे बळ दिले. त्यामुळे होळकर स्टेडियमवर हा संघ नव्या उमेदीने मैदानावर उतरेल, असेही फडके म्हणाले. धोनीपर्व समाप्तीकडे आहे काय, यावर मात्र फडके यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘‘धोनीने विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्ती घ्यायला हवी होती, असे मला वाटते. मात्र, हा निर्णय निवड समितीचा आहे. त्याने निवृत्ती घ्यावी, याचा अर्थ त्याच्यातील खेळ संपला, असे नाही. सध्या भारतीय संघातील तोच खरा ‘टर्नर’ आहे.विराट, रैना अपयशीस्टार फलंदाज विराट कोहली आणि सुरेश रैना हेसुद्धा अपयशी ठरले आहेत. या दोघांकडून मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे पराभवाला एकटा धोनी जबाबदार नाही. इतरांनीही सामना जिंकून द्यायला हवा. दुसरीकडे, भारतीय जलदगती गोलंदाजी कमकुवत आहे. त्यात सुधारणेची गरज आहे. केवळ फिरकीपटूंच्या कामगिरीवर सामना जिंकणे कठीण असते. मोहंमद शमी हा दुखापतग्रस्त असल्याने त्याची कमतरताही संघाला भासत आहे. शमी हा धावांची गती कमी राखण्यास मदत करतो.संघात ‘गटबाजी’ नाही!धोनी आणि विराट कोहली यांचे संघात गट आहेत काय, यावर फडके यांनी संघात एकजूट असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘ड्रेसिंग रूममधील वातावरण ‘फ्रेंडली’ आहे. विराट-धोनी यांच्यात कुठलेही गैरसमज नाहीत. ते केवळ माध्यमांनी तयार केले आहेत. ड्रेसिंग रूमचे नाव राहुल द्रविडहोळकर स्टेडियमवर भारतीय संघासाठी खास ड्रेसिंग रूम तयार करण्यात आली आहे. तिला राहुल द्रविडचे नाव देण्यात आले आहे. सध्या भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे संघाला प्रोत्साहनाची गरज आहे. त्यामुळे मध्य प्रदेश संघटनेने ही खास योजना आखली.