शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

आयओए एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही - किरेन रिजीजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 03:43 IST

‘भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) २०२२ मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही,’ असे केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : ‘भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) २०२२ मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही,’ असे केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले. राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी हटवल्यानंतर आयओएने या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली.गेल्या आठवड्यात राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) बर्मिंगहॅम स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा निर्णय घेताना तीन नवीन खेळांचा समावेश करण्याची शिफारस केली होती. हा निर्णय भारतासाठी मोठा धक्का आहे. २०१८ मध्ये गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६४ पदके जिंकली होती आणि त्यापैकी १६ पदके नेमबाजांनी जिंकली होती. तथापि, रिजीजू यांनी त्यांचे मंत्रालय कोणताही निर्णय घेण्याआधी नेमबाजी महासंघ आणि आयओएशी विस्तृत चर्चा करेल.रिजीजू म्हणाले, ‘मी नेमबाजी महासंघाशी चर्चा केलेली नाही. जर बहिष्कार टाकायचा असेल तर तुम्हाला सरकारला विचारावे लागेल. कारण असे निर्णय एकतर्फी घेतले जाऊ शकत नाही. यावर योग्य सल्लामसलतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल. हा आमच्या खेळाडूंच्या भविष्याचा आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. यात सर्व काही समाविष्ट आहे. आयओएने काही पावले उचलायला हवीत व आम्ही त्यांच्याशी याविषयी चर्चा करू.’२०३२ आॅलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाविषयी रिजीजू म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद पत्करणे हे कोणत्याही देशासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. आॅलिम्पिक, विश्वचषक अथवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याची सर्वांचीच इच्छा असते. तथापि, तुम्ही त्यासाठी तयार आहात का हा मुख्य प्रश्न आहे. आॅलिम्पिकचे आयोजन करण्यात एक राष्ट्र म्हणून आम्हाला अभिमान वाटेल यात शंकाच नाही. आम्ही सकारात्मक आहोत व आम्ही याबाबत आयओएशी चर्चा करू.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indiaभारत