शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आयओए एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही - किरेन रिजीजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 03:43 IST

‘भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) २०२२ मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही,’ असे केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : ‘भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) २०२२ मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही,’ असे केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले. राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी हटवल्यानंतर आयओएने या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली.गेल्या आठवड्यात राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) बर्मिंगहॅम स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा निर्णय घेताना तीन नवीन खेळांचा समावेश करण्याची शिफारस केली होती. हा निर्णय भारतासाठी मोठा धक्का आहे. २०१८ मध्ये गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६४ पदके जिंकली होती आणि त्यापैकी १६ पदके नेमबाजांनी जिंकली होती. तथापि, रिजीजू यांनी त्यांचे मंत्रालय कोणताही निर्णय घेण्याआधी नेमबाजी महासंघ आणि आयओएशी विस्तृत चर्चा करेल.रिजीजू म्हणाले, ‘मी नेमबाजी महासंघाशी चर्चा केलेली नाही. जर बहिष्कार टाकायचा असेल तर तुम्हाला सरकारला विचारावे लागेल. कारण असे निर्णय एकतर्फी घेतले जाऊ शकत नाही. यावर योग्य सल्लामसलतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल. हा आमच्या खेळाडूंच्या भविष्याचा आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. यात सर्व काही समाविष्ट आहे. आयओएने काही पावले उचलायला हवीत व आम्ही त्यांच्याशी याविषयी चर्चा करू.’२०३२ आॅलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाविषयी रिजीजू म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद पत्करणे हे कोणत्याही देशासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. आॅलिम्पिक, विश्वचषक अथवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याची सर्वांचीच इच्छा असते. तथापि, तुम्ही त्यासाठी तयार आहात का हा मुख्य प्रश्न आहे. आॅलिम्पिकचे आयोजन करण्यात एक राष्ट्र म्हणून आम्हाला अभिमान वाटेल यात शंकाच नाही. आम्ही सकारात्मक आहोत व आम्ही याबाबत आयओएशी चर्चा करू.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indiaभारत