शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

आयओए एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही - किरेन रिजीजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 03:43 IST

‘भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) २०२२ मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही,’ असे केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : ‘भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) २०२२ मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही,’ असे केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले. राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी हटवल्यानंतर आयओएने या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली.गेल्या आठवड्यात राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) बर्मिंगहॅम स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा निर्णय घेताना तीन नवीन खेळांचा समावेश करण्याची शिफारस केली होती. हा निर्णय भारतासाठी मोठा धक्का आहे. २०१८ मध्ये गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६४ पदके जिंकली होती आणि त्यापैकी १६ पदके नेमबाजांनी जिंकली होती. तथापि, रिजीजू यांनी त्यांचे मंत्रालय कोणताही निर्णय घेण्याआधी नेमबाजी महासंघ आणि आयओएशी विस्तृत चर्चा करेल.रिजीजू म्हणाले, ‘मी नेमबाजी महासंघाशी चर्चा केलेली नाही. जर बहिष्कार टाकायचा असेल तर तुम्हाला सरकारला विचारावे लागेल. कारण असे निर्णय एकतर्फी घेतले जाऊ शकत नाही. यावर योग्य सल्लामसलतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल. हा आमच्या खेळाडूंच्या भविष्याचा आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. यात सर्व काही समाविष्ट आहे. आयओएने काही पावले उचलायला हवीत व आम्ही त्यांच्याशी याविषयी चर्चा करू.’२०३२ आॅलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाविषयी रिजीजू म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद पत्करणे हे कोणत्याही देशासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. आॅलिम्पिक, विश्वचषक अथवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याची सर्वांचीच इच्छा असते. तथापि, तुम्ही त्यासाठी तयार आहात का हा मुख्य प्रश्न आहे. आॅलिम्पिकचे आयोजन करण्यात एक राष्ट्र म्हणून आम्हाला अभिमान वाटेल यात शंकाच नाही. आम्ही सकारात्मक आहोत व आम्ही याबाबत आयओएशी चर्चा करू.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indiaभारत