शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाजी संघटनेवर चौकशी समितीचे ताशेरे

By admin | Updated: October 6, 2016 04:57 IST

रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या खराब कामगिरीची चौकशी करण्यासाठी अभिनव बिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे.

नेमबाजी संघटनेवर चौकशी समितीचे ताशेरेनवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या खराब कामगिरीची चौकशी करण्यासाठी अभिनव बिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या खराब कामगिरीसाठी समितीने प्रशिक्षक व संघटना या दोघांनाही जबाबदार धरले आहे. त्याचबरोबर यात आमूलाग्र बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.समितीने गगन नारंग, हीना सिद्धू यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंबरोबर आयोनिका पालसारख्या नवोदित खेळाडूवरही ताशेरे ओढले आहेत. हीनाने आपला पती रोनक पंडित यांनाच प्रशिक्षक बनविल्याबद्दल टीका झाली होती. हीनाने राष्ट्रीय प्रशिक्षक पावेल स्मिरनोव्ह यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोनिकाने आपल्या आर्थिक फायद्यासाठी थॉमस फारनिक यांना प्रशिक्षक, तर सुमा शिरूर यांना मार्गदर्शकपदी दाखविले. मात्र, सुमाच तिची पूर्णवेळ प्रशिक्षक होती.रिओमध्ये भारताचे १२ नेमबाज सहभागी झाले होते. मात्र, या प्रकारात भारताला एकही पदक मिळविता आले नाही. अभिनव बिंद्रा १० मीटर एअर रायफल गटात चौथ्या क्रमांकावर राहिला. ही भारतीयांची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. यामुळे नेमबाजीतील कामगिरीची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. समितीने नेमबाजीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.समितीने जीतू राय प्रशिक्षक स्मिरनोव्ह यांच्याबरोबर सूर जुळवू शकला नाही, तर प्रकाश नंजप्पा याच्यासाठी स्मिरनोव्ह यांच्याकडे कोणतीही विशेष योजना नसल्याचे स्पष्ट झाले. समितीने गगन नारंग याच्यावरही कडक ताशेरे ओढले आहेत. नारंग स्पर्धेत घोट्याच्या दुखापतीसह उतरला होता. तसेच त्याने त्याच्यासाठी बनविण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाकडे साफ दुर्लक्ष केले होेते. अपूर्वी चंदेला याला प्रशिक्षकासाठी झगडावे लागले, हे सर्वांत चकीत करणारे असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. नेमबाज बिंद्रा याला नशिबाने साथ दिली नसल्याचे मत व्यक्त करून त्याच्या कारकिर्दीचा शेवट परीकथेसारखा झाला नसल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)रिओची तयारीच चुकीच्या दिशेने होतीचारसदस्यीय समितीने आपल्या ३६ पानांच्या अहवालात कामगिरीचे कडक समीक्षा करण्यात आली आहे. समितीत म्हटले आहे, की २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिकनंतर नेमबाजीतील कामगिरीमुळे सर्वांनाच आत्ममग्न केले होते. सर्वांना वाटले, की या खेळात आता आपोआप प्रगती होईल. त्यामुळे यासाठी विशेष प्रयत्न करण्याचेच सर्व जण विसरून गेले. समितीने म्हटले आहे, की रिओ आॅलिम्पिकसाठीची तयारीच चुकीच्या दिशेने होती. भारतीय नेमबाजांना गेल्या काही वर्षांत मिळालेले यश म्हणजे फक्त नशिबाची साथ होती.