शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नेमबाजी संघटनेवर चौकशी समितीचे ताशेरे

By admin | Updated: October 6, 2016 04:57 IST

रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या खराब कामगिरीची चौकशी करण्यासाठी अभिनव बिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे.

नेमबाजी संघटनेवर चौकशी समितीचे ताशेरेनवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या खराब कामगिरीची चौकशी करण्यासाठी अभिनव बिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या खराब कामगिरीसाठी समितीने प्रशिक्षक व संघटना या दोघांनाही जबाबदार धरले आहे. त्याचबरोबर यात आमूलाग्र बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.समितीने गगन नारंग, हीना सिद्धू यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंबरोबर आयोनिका पालसारख्या नवोदित खेळाडूवरही ताशेरे ओढले आहेत. हीनाने आपला पती रोनक पंडित यांनाच प्रशिक्षक बनविल्याबद्दल टीका झाली होती. हीनाने राष्ट्रीय प्रशिक्षक पावेल स्मिरनोव्ह यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोनिकाने आपल्या आर्थिक फायद्यासाठी थॉमस फारनिक यांना प्रशिक्षक, तर सुमा शिरूर यांना मार्गदर्शकपदी दाखविले. मात्र, सुमाच तिची पूर्णवेळ प्रशिक्षक होती.रिओमध्ये भारताचे १२ नेमबाज सहभागी झाले होते. मात्र, या प्रकारात भारताला एकही पदक मिळविता आले नाही. अभिनव बिंद्रा १० मीटर एअर रायफल गटात चौथ्या क्रमांकावर राहिला. ही भारतीयांची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. यामुळे नेमबाजीतील कामगिरीची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. समितीने नेमबाजीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.समितीने जीतू राय प्रशिक्षक स्मिरनोव्ह यांच्याबरोबर सूर जुळवू शकला नाही, तर प्रकाश नंजप्पा याच्यासाठी स्मिरनोव्ह यांच्याकडे कोणतीही विशेष योजना नसल्याचे स्पष्ट झाले. समितीने गगन नारंग याच्यावरही कडक ताशेरे ओढले आहेत. नारंग स्पर्धेत घोट्याच्या दुखापतीसह उतरला होता. तसेच त्याने त्याच्यासाठी बनविण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाकडे साफ दुर्लक्ष केले होेते. अपूर्वी चंदेला याला प्रशिक्षकासाठी झगडावे लागले, हे सर्वांत चकीत करणारे असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. नेमबाज बिंद्रा याला नशिबाने साथ दिली नसल्याचे मत व्यक्त करून त्याच्या कारकिर्दीचा शेवट परीकथेसारखा झाला नसल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)रिओची तयारीच चुकीच्या दिशेने होतीचारसदस्यीय समितीने आपल्या ३६ पानांच्या अहवालात कामगिरीचे कडक समीक्षा करण्यात आली आहे. समितीत म्हटले आहे, की २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिकनंतर नेमबाजीतील कामगिरीमुळे सर्वांनाच आत्ममग्न केले होते. सर्वांना वाटले, की या खेळात आता आपोआप प्रगती होईल. त्यामुळे यासाठी विशेष प्रयत्न करण्याचेच सर्व जण विसरून गेले. समितीने म्हटले आहे, की रिओ आॅलिम्पिकसाठीची तयारीच चुकीच्या दिशेने होती. भारतीय नेमबाजांना गेल्या काही वर्षांत मिळालेले यश म्हणजे फक्त नशिबाची साथ होती.