शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

ऑलिम्पिक पदकासाठी पी. व्ही. सिंधूने ठेवलीय शोकेसमध्ये जागा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 06:42 IST

इतरही चषकांच्या रांगेत असेल सिंधूचा हा स्वप्नवत चषक : प्रयत्नांची पराकाष्ठा करणार

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने नुकतेच विश्व चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. रिओ ऑलिम्पिक सोडला तर तिच्याकडे जवळपास सर्वच चषक आहेत. या स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभूत झाल्याचे दु: ख तिला होते, मात्र विश्व चॅम्पियनशीपचा किताब मिळवल्यानंतर हे दु:ख हलके झाले. आता पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिकचा चषक जिंकण्याकडे सिंधूच्या नजरा आहेत त्यासाठी तिने आपल्या ट्रॉफ्रीच्या कॅबिनेटमध्ये (शोकेसमध्ये) एक जागा राखीव ठेवली आहे ती खास ऑलिम्पिक चषकासाठी.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने बासेलमध्ये आपल्या सलग तिसºया फायनलमध्ये जपानच्या नोजोमी ओकुहाराचा २१-७, २१-७ ने पराभव करीत विश्व चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकाविले होते. या ऐतिहासिक कामगिरीपूर्वी २४ वर्षीय सिंधूने रिओ आॅलिम्पिक, विश्व चॅम्पियनशीप (२०१७, २०१८) २०१७ दुबई सिरिज फायनल्स, २०१८ राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा आणि जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

एका वृत्तसंस्थेशी दिलेल्या मुलखतीत सिंधू म्हणाली की, विश्व चॅम्पिनशीपमधील सुवर्णपदक हे आतापर्यंतच्या सर्व पराभवांना दूर नेणारे आहे. लोक माझ्यावर टीक करीत होते. फायनलमध्ये मी जिंकू शकत नाही, असे बोलले जात होते. या सर्वांना माझ्या परिने उत्तर दिले आहे. असे असले तरीही ऑलिम्पिक स्पर्धा फार वेगळी असते. रिओ आणि विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेने मला वेगळ्या आठवणी दिल्या आहेत आणि हा...एक सुवर्ण शिल्लक आहे. ते जिंकल्यानंतर त्याची माझ्या कॅबिनेटमध्ये खास जागा असेल. मी निश्चितपणे, ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकासाठी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करीन. टोकियो ऑलिम्पिक हेच माझे ध्येय आहे. ऑलिम्पिक क्वालिफिकेशन्स सुरू आहेत आणि विजय मिळवत त्यादृष्टिने पुढे जाण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.रिओनंतर सर्व काही बदलले२०१६ मध्ये रिओ हे माझे पहिले ऑलिम्पिक होते. तेव्हा मला जास्त लोक ओळखत नव्हते. एक खेळाडू म्हणून थोडी परिचित होते. रिओनंतर मात्र सर्व काही बदलले. आता विश्व चॅम्पियनशीपनंतर बºयाच गोष्टी घडत आहेत. मला प्रत्येक स्पर्धेतून नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रतिस्पर्धी खेळाडूजवळ माझ्याविरुद्ध खेळण्याची काही ना काही रणनिती असते ती आपल्यालाही ओळखता आली पाहिजे.ऑलिम्पिक प्रतिस्पर्ध्यांबाबतड्रॉ काढल्यानंतर निश्चितपणे आघाडीचे खेळाडू हेच प्रतिस्पर्धी असतील. मी मानांकनाचा विचार करीत नाही. तुम्ही चांगला खेळ करण्याचा विचार करा. त्यावर लक्ष केंद्रित केले तर कामगिरी चांगली होईल. इतर गोष्टीकउे दुर्लक्ष करणे हेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू