शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा 'विराट' विजय, उपांत्य फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 22:59 IST

टी- २० वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात फलंदाज विराट कोहलीच्या जोरावर भारताने 'विराट' विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

ऑनलाइन लोकमत 
मोहाली, दि. २७ -  टी- २० वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात फलंदाज विराट कोहलीच्या जोरावर भारताने 'विराट' विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना भारताने १९.१ षटकात चार बाद १६१ धावा केल्या. आक्रमक फलंदाज विराट कोहलीने या सामन्यात सर्वाधिक जास्त धावा केल्या. विराट कोहलीने ५१ चेंडूत दोन षटकार आणि नऊ चौकार लगावत नाबाद ८२ धावा केल्या. तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १० चेंडूत तीन चौकार लगावत नाबाद १८ धावा केल्या. तर युवराज सिंग २१ धावांवर झेलबाद झाला. पाच षटकात ३७ धावांची भागीदारी करुन रोहित शर्मा आणि शिखर धवन ही भारताची सलामी जोडी तंबूत परतली. शिखर धवन १३ धावांवर बाद झाला. तर रोहित शर्मा १२ धावांवर बाद झाला. सुरेश रैना १० धावांवर झेलबाद झाला. 
भारताकडून गोलंदाज हार्दिक पांड्यांने दोन गडी बाद केले, तर युवराज सिंग, आर. अश्विन, आशिष नेहरा आणि जसप्रित बुमराह यांनी प्रत्येकी एक-एक बळी टिपले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फलंदाज आरोन फिंचने ३४ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार लगावत ४३ धावा कुटल्या. तर, उस्मान ख्वाजा आणि एरॉन फिंचने पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची सलामी दिली. ख्वाजाला २६ धावांवर नेहराने यष्ठीपाठी धोनीकरवी झेलबाद केले. त्यानंतर संघाच्या ७२ धावा असताना अश्विनच्या गोलंदाजीवर  धोकादायक डेव्हिड वॉर्नर पाच धावांवर यष्टीचीत झाला. ग्लेन मॅक्सवेल ३१ धावांवर बाद झाला.  त्यानंतर गोलंदाज हार्दीक पांड्याने दिला ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का देत जेम्स फॉल्कनर १0 धावांवर बाद केले. 
युवराजने पहिल्याच षटकात कर्णधार स्मिथला अवघ्या दोन धावांवर यष्टीपाठी धोनीकरवी झेलबाद करुन ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. त्यानंतर सलामीवीर एरॉन फिंचला ४३ धावांवर  हार्दिक पंडयाने शिखर धवनकरवी झेलबाद केले. मॅक्सवेल १३ धावांवर नाबाद असून, त्याची साथ द्यायला धोकादायक शेन वॉटसन मैदानात आला आहे. 
दरम्यान , आयसीसी टी-२० वर्ल्डकपची उपांत्यफेरी गाठण्यासाठी भारतासाठी 'करो या मरो' अशीच स्थिती होती.