शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

भारताचा 'विराट' विजय, अश्विनची अष्टपैलू खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 04:07 IST

रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू खेळी आणि इतर गोलंदाजांकडून त्याला मिळालेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ९२ धावांनी विराट विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत
अँटिग्वा, दि. २५ : रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू खेळी आणि इतर गोलंदाजांकडून त्याला मिळालेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ९२ धावांनी विराट विजय मिळवला. त्याबरोबरच भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. दुसऱ्या डावात रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडीजची फलंदाजी ढेपाळली. भारताने फॉलोऑन दिल्यानंतर यजमान संघाने दुसऱ्या डावात ७८ षटकांत सर्वबाद २३१ धावा केल्या. या डावात आश्विनने सात बळी घेतले. ३३ सामन्यांत त्याने १७ वेळा ही कामगिरी केली. परदेशात ५ विकेट घेण्याची त्याची पहिली वेळ आहे. तर वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्यांदा ही कामगीरी केली आहे. 
 
पहिल्या डावांत भारताने विराट कोहलीचे द्विशतक आणि आश्विनचे शतक या जोरावर ५६६ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर वेस्ट इंडीजचा पहिला डाव २४३ धावांतच आटोपला. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट याने चिवटपणे खेळ करीत ७४ धावा केल्या. सावधपणे खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या क्रेगने ७४ धावा करताना तब्बल २१८ चेंडू खेळले. मात्र, इतर फलंदाजांची त्याला साथ लाभली नाही. पहिल्या डावांत यष्टिरक्षक शेन डॉवरीच याने झुंजार खेळ केला. त्याने १०७ चेंडूंचा सामना करताना नाबाद ५७ धावा केल्या. डॉवरीचने फॉलोआॅन टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला ते शक्य झाले नाही. भारताच्या शमी आणि यादव यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. अमित मिश्रानेदेखील दोन गडी बाद केले. 
 
विंडीजच्या दुसऱ्या डावाची सुरुवातदेखील खराब राहिली. पहिल्या डावात एकही बळी न घेणाऱ्या ईशांत शर्मा याने पहिल्याच षटकात क्रेग ब्रेथवेटचा बळी घेतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडीजच्या १ बाद २१ धावा होत्या. चौथ्या दिवसाची सुरुवातही वेस्ट इंडीजसाठी खराब होती. पहिल्याच षटकात यादवने डॅरेन ब्रावोला १० धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर रविचंद्रन आश्विन नावाचे वादळ अ‍ॅँटिग्वाच्या खेळपट्टीवर पुन्हा घोंघावू लागले आणि त्याच्या फिरकीच्या जाळ््यात चंद्रिका, सॅम्युअल्स, चेस, ब्लॅकवूड आणि होल्डर हे एका पाठोपाठ एक अडकत गेले.
 
कसोटी सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त गडी बाद करण्याची आश्विनची ही १७ वी वेळ आहे. त्याने ३३ कसोटी सामन्यांत ही कामगिरी केली. सलामीवीर राजेंद्र चंद्रिका याने ३१ धावा केल्या, तर मार्लोन सॅम्युअल्स याने अर्धशतक झळकावले. ब्रेथवेटने तळाच्या फलंदाजाला सोबत घेऊन भारताचा विजय लांबणीवर टाकला त्याने नाबाद ५१ धावांची खेली केली. बिशूनेही ४५ धावांची खेळी करत भारताचा विजय लांबणीवर टाकला. पण अश्विनने भेदक मारा करत सामन्याच्या चौथ्याच दिवशी विजय मिळवून दिला.