शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

भारताचा 'विराट' विजय, अश्विनची अष्टपैलू खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 04:07 IST

रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू खेळी आणि इतर गोलंदाजांकडून त्याला मिळालेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ९२ धावांनी विराट विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत
अँटिग्वा, दि. २५ : रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू खेळी आणि इतर गोलंदाजांकडून त्याला मिळालेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ९२ धावांनी विराट विजय मिळवला. त्याबरोबरच भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. दुसऱ्या डावात रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडीजची फलंदाजी ढेपाळली. भारताने फॉलोऑन दिल्यानंतर यजमान संघाने दुसऱ्या डावात ७८ षटकांत सर्वबाद २३१ धावा केल्या. या डावात आश्विनने सात बळी घेतले. ३३ सामन्यांत त्याने १७ वेळा ही कामगिरी केली. परदेशात ५ विकेट घेण्याची त्याची पहिली वेळ आहे. तर वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्यांदा ही कामगीरी केली आहे. 
 
पहिल्या डावांत भारताने विराट कोहलीचे द्विशतक आणि आश्विनचे शतक या जोरावर ५६६ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर वेस्ट इंडीजचा पहिला डाव २४३ धावांतच आटोपला. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट याने चिवटपणे खेळ करीत ७४ धावा केल्या. सावधपणे खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या क्रेगने ७४ धावा करताना तब्बल २१८ चेंडू खेळले. मात्र, इतर फलंदाजांची त्याला साथ लाभली नाही. पहिल्या डावांत यष्टिरक्षक शेन डॉवरीच याने झुंजार खेळ केला. त्याने १०७ चेंडूंचा सामना करताना नाबाद ५७ धावा केल्या. डॉवरीचने फॉलोआॅन टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला ते शक्य झाले नाही. भारताच्या शमी आणि यादव यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. अमित मिश्रानेदेखील दोन गडी बाद केले. 
 
विंडीजच्या दुसऱ्या डावाची सुरुवातदेखील खराब राहिली. पहिल्या डावात एकही बळी न घेणाऱ्या ईशांत शर्मा याने पहिल्याच षटकात क्रेग ब्रेथवेटचा बळी घेतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडीजच्या १ बाद २१ धावा होत्या. चौथ्या दिवसाची सुरुवातही वेस्ट इंडीजसाठी खराब होती. पहिल्याच षटकात यादवने डॅरेन ब्रावोला १० धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर रविचंद्रन आश्विन नावाचे वादळ अ‍ॅँटिग्वाच्या खेळपट्टीवर पुन्हा घोंघावू लागले आणि त्याच्या फिरकीच्या जाळ््यात चंद्रिका, सॅम्युअल्स, चेस, ब्लॅकवूड आणि होल्डर हे एका पाठोपाठ एक अडकत गेले.
 
कसोटी सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त गडी बाद करण्याची आश्विनची ही १७ वी वेळ आहे. त्याने ३३ कसोटी सामन्यांत ही कामगिरी केली. सलामीवीर राजेंद्र चंद्रिका याने ३१ धावा केल्या, तर मार्लोन सॅम्युअल्स याने अर्धशतक झळकावले. ब्रेथवेटने तळाच्या फलंदाजाला सोबत घेऊन भारताचा विजय लांबणीवर टाकला त्याने नाबाद ५१ धावांची खेली केली. बिशूनेही ४५ धावांची खेळी करत भारताचा विजय लांबणीवर टाकला. पण अश्विनने भेदक मारा करत सामन्याच्या चौथ्याच दिवशी विजय मिळवून दिला.