शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने उभारली 'विजयाची गुढी'

By admin | Updated: March 28, 2017 11:34 IST

अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 विकेटने नमवून भारताने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर विजयाची गुढी उभारली.

 ऑनलाइन लोकमत 

धरमशाला, दि. 28 - गोलंदाजांनी विजयाचा पाया रचल्यानंतर भारतीय फलंदाजांनी कोणतीही चूक न करता आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'विजयाची गुढी' उभारली. ऑस्ट्रेलियाचे 106 धावांचे लक्ष्य भारताने दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार करत सामन्यासह बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने जिंकली. अजिंक्य रहाणे नाबाद (38) आणि लोकेश राहुल नाबाद (51) या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 
 
लोकेश राहुलने पहिल्या डावाप्रमाणे दुस-या डावातही नाबाद अर्धशतकी खेळी केली. पूजारा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या रहाणेने आत्मविश्वासाने आक्रमक फलंदाजी केली. त्याच्या 38 धावांच्या नाबाद खेळीत त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. कालच्या बिनबाद 19 वरुन मुरली विजय आणि लोकेश राहुल या सलामीवीरांनी डावपुढे सुरु केल्यानंतर भारताला 46 धावांवर पहिला धक्का बसला. 
 
मुरली विजय (8) धावांवर कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने वाडेकडे झेल दिला. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पूजाराला भोपळाही फोडू न देता मॅक्सवेलने धावबाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रहाणेने आणखी पडझड होऊ न देता विजयावर शिक्कामोर्तब केले.
 
ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावांत १३७ धावांत खुर्दा उडवत विजयाचा पाया रचला. जाडेजाने ६३ धावांत ४, आश्विनने २९ धावांत ३ आणि उमेश यादवने २९ धावांत ३ गडी बाद करून दुसऱ्या डावांत ५३.५ षटकांत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. ग्लेन मॅक्सवेल (४५) आणि पीटर हँड्सकोंब (१८), मॅथ्यू वेड (२५) यांच्या संयमी खेळीनंतरही पाहुण्यांना फार काळ तग धरणे कठीण झाले होते. चहापानापर्यंत ९२ धावांत ५ गडी गमावणाऱ्या पाहुण्या संघाचे उर्वरित ५ फलंदाज तिसऱ्या सत्रात पाठोपाठ बाद झाले.
 
सामनावीर - रविंद्र जाडेजा 
मालिकावीर - रविंद्र जाडेजा