शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

भारताच्या महत्त्वाच्या सामन्यांची तिकिटे लॉटरीने

By admin | Updated: February 25, 2016 03:52 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक टी-२० स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील तिकीटविक्रीला बुधवारपासून सुरुवात केली आहे. यामध्ये भारताच्या

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक टी-२० स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील तिकीटविक्रीला बुधवारपासून सुरुवात केली आहे. यामध्ये भारताच्या काही महत्त्वाच्या सामन्यांची तिकिटे लॉटरी पद्धतीने विकली जाणार आहेत.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिकीटविक्रीसाठी एका वेबसाइटशी करार केला आहे. पहिल्या सत्रात बंगळुरू, चेन्नई, मोहाली, कोलकाता व धर्मशाळा येथे होणाऱ्या सामन्यांची तिकीटविक्री केली जाणार आहे. मात्र, यामध्ये भारताचे सामने, विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना, उपांत्य फेरीतील सामन्यांचा समावेश नाही.या संदर्भात ‘बीसीसीआय’ने सांगितले की, तिकिटांची मागणी आणि पुरवठा यांच्यात समन्वय साधण्यासाठी भारताचे चार सामने, दोन उपांत्य सामने व अंतिम सामन्याची तिकिटे लॉटरी पद्धतीने विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.‘बीसीसीआय’चे सचिव अनुराग ठाकूर यांनीही आॅनलाइन तिकीटविक्रीचे समर्थन केले आहे. ‘आयसीसी विश्वचषक स्पर्धेची तिकीटविक्रीही या स्पर्धेपासून होण्याची शक्यता आहे. क्रिकेटला विकसित करण्याच्या अभियानांतर्गत ‘बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक स्पर्धा भारत, तसेच जगभरात लोकप्रिय करण्यासाठी मदत करेल,’ असे ठाकूर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था) या वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत ज्या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊन सामना पाहायचा आहे, त्यांना योग्य प्रकारे तिकीट देण्याची जबाबदारी आमची आहे.- शशांक मनोहर, अध्यक्ष, आयसीसी