शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत "हिरो" तर बांगलादेश ठरलाय "झिरो"

By admin | Updated: May 26, 2017 09:11 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाल्यापासून आजतागत बांगलादेश, इंग्लंड आणि पाकिस्तानला एकदाही या ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही...

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 26 - यंदा आयसीसीच्या आठव्यांदा रंगणाऱ्या स्पर्धेत क्रमवारीत अव्वल आठ संघ सहभागी झाले आहेत. या आठ संघाचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. 1 जूनपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी गतविजेता भारतीय संघ ब गटात खेळताना दिसणार असून या गटात त्यांना पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका या संघाचे आव्हान असेल.

तर अ गटात इंग्लड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा ही विश्वचषकानंतरची सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेला मिनी विश्वचषक म्हणून ही ओळखले जाते. 1998 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत बांगलादेश, इंग्लंड आणि पाकिस्तानला एकदाही या ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही. तर भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी दोन वेळा हा चषक पटकावला आहे. 1998 पासून या स्पर्धेत कोणत्या संघाने किती सामने खेळले? किती जिंकले?  हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आज आपण जाणून घेऊयात या संपूर्ण स्पर्धेत कोणत्या संघाने किती सामने जिंकले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेशचे प्रदर्शन खूपच खराब आहे. बांगलादेशने चॅम्पियन्स स्पर्धेत आठ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे तर सात सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. बांगलादेशनंतर या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरीही निराशजनक आहे. पाकिस्तानने 18 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना 11 पराभव स्वीकारावे लागले आहेत. तर फक्त सात सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. क्रिकेटची सुरवात करणाऱ्या साहेबांचीही अशीच काहीशी अवस्था आहे.

 (11 वर्षानंतर हा खेळाडू खेळणार "चॅम्पियन्स ट्रॉफी"त) 

 

इंग्लंडने या स्पर्धेत 21 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 11 विजय आणि 10 पराभव स्वीकारावे लागले आहेत. बांगलादेश, पाकिस्तान आणि इंग्लंड यांना ही स्पर्धा एकदाही जिंकता आलेली नाही. द. आफ्रिकेने या स्पर्धेत 21 सामने खेळले आहेत. यामध्ये 11 विजय आणि 9 पराभव झाले आहेत. तर एक सामना टाय झाला होता. दक्षिण आफ्रिकेने 1998 मध्ये झालेली पहिली चॅम्पिय़न्स ट्रॉफी जिंकली होती.

 

नूझीलंडने या स्पर्धेत खेळलेल्या 21 सामन्यातील 12 सामन्यात विजय मिळवला आहे. आठ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. तर एक सामना टाय झाला आहे. न्यूझीलंडने दुसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

(चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयी संघ आणि त्यांची कामगिरी)

आठव्या चॅम्पियन्स स्पर्धेत वेस्ट इंडिज खेळत नसला तरी या स्पर्धेत त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. वेस्ट इंडिजने या स्पर्धेत 24 सामने खेळले आहेत. यामध्ये 13 विजय आणि 10 पराभव झाले आहेत. तर एक सामना टाय झालेला आहे. 2002मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि श्रीलंका संयुक्त विजेते झाले होते. या स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघात श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत त्यांनी 24 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 13 जिंकले आहेत तर 9 सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. श्रीलंकेचे दोन सामने टाय झाले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम गतविजेत्या भारतीय संघाच्या नावावर आहे. या स्पर्धेत भारताने खेळलेल्या 24 सामन्यात 15 विजय मिळवले आहेत. या स्पर्धेत भाराताला सहा सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. तर तीन सामने टाय झाले आहेत. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर दोन वेळा नाव कोरले आहे.