शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

By admin | Updated: February 10, 2017 02:28 IST

कर्णधार विराट कोहली व सलामीवीर मुरली विजय यांनी झळकावलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर भारताने बांगलादेशाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले.

हैदराबाद : कर्णधार विराट कोहली व सलामीवीर मुरली विजय यांनी झळकावलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर भारताने बांगलादेशाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. कोहली १११ धावा काढून खेळपट्टीवर असून, विजयने १०८ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त चेतेश्वर पुजाराने ८३ धावांची खेळी केली आणि विजयसोबत दुसऱ्या विकेटसाठी १७८ धावांची भागीदारी करून डाव सावरला. भारताने दिवसअखेर पहिल्या डावात ३ बाद ३५६ धावांची मजल मारली. आजचा खेळ थांबला त्या वेळी शतकवीर कोहलीला अजिंक्य रहाणे (४५) साथ देत होता. दुखापतीतून सावरल्यानंतर रहाणेने पुनरागमन केले. बांगलादेशाने पहिल्याच षटकात लोकेश राहुलला (२) तंबूचा मार्ग दाखवून चांगली सुरुवात केली; पण त्यानंतर त्यांचे गोलंदाज दिवसभर संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. विजय, पुजारा व कोहली यांनी कमकुवत माऱ्यापुढे सहज धावा वसूल केल्या. विजयने नववे शतक पूर्ण केले, तर कोहलीने दिवसअखेर १६व्या कसोटी शतकाला गवसणी घातली. कोहलीने १४१ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार लगावले, तर विजयने १६० चेंडू खेळताना १२ चौकार व १ षटकार मारला. पुजाराचे शतक मात्र हुकले. युवा आॅफस्पिनर मेहदी हसन मिराजने त्याला माघारी परतवले. पुजाराच्या १७७ चेंडूंच्या खेळीमध्ये ९ चौकारांचा समावेश आहे. बांगलादेशाने ३ सत्रांमध्ये प्रत्येकी एक बळी घेतला. ताईजुल इस्लामने तिसऱ्या सत्रात विजयला क्लीन बोल्ड करून भारताला तिसरा धक्का दिला. त्यानंतर रहाणेने कोहलीला चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२२ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. विजय वैयक्तिक ३५ धावांवर असताना सुदैवी ठरला. तो धावबाद होण्यापासून बचावला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सामन्याच्या चौथ्या चेंडूवर राहुल क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर विजय व पुजारा यांनी सातव्यांदा शतकी भागीदारी केली. भारतातर्फे सर्वाधिक शतकी भागीदारी नोंदवण्यात ते गौतम गंभीर व राहुल द्रविडसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. सर्वाधिक शतकी भागीदारी नोंदविण्याचा विक्रम संयुक्तपणे मोहिंदर अमरनाथ व सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर आहे. त्यांनी प्रत्येकी आठ वेळा असा पराक्रम केला आहे. बांगलादेशातर्फे तास्किन अहमद, मेहदी हसन व ताईजुल इस्लाम यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. धावफलकभारत पहिला डाव :- लोकेश राहुल त्रि.गो. तास्किन २, मुरली विजय त्रि.गो. ताईजुल इस्लाम १०८, चेतेश्वर पुजारा झे. रहीम गो. मिराज ८३, विराट कोहली खेळत आहे १११, अजिंक्य रहाणे खेळत आहे ४५. अवांतर : ७. एकूण : ९० षटकांत ३ बाद ३५६. बाद क्रम : १-२, २-१८०, ३-२३४. गोलंदाजी : तास्किन अहमद १६-२-५८-१, कामरुल इस्लाम रब्बी १७-१-९१-०, सौम्य सरकार १-०-४-०, मेहदी हसन मिराज २०-०-९३-१, शाकीब अल-हसन १३-३-४५-०, ताईजुल इस्लाम २०-४-५०-१, सब्बीर रहमान ३-०-१०-०. नंबर गेम...८९.१६ इतक्या सरासरीने चेतेश्वर पुजाराने यंदाच्या प्रथम श्रेणी मोसमात धावा केल्या आहेत. घरच्या मैदानावर खेळताना त्याने यापूर्वी केवळ दोन वेळाच याहून अधिक सरासरीने खेळी केली. २०१३-१४मध्ये पुजाराने ९८च्या सरासरीने, तर २०१२-१३मध्ये ९३.२३ सरासरीने फलंदाजी केली. ४३.२४ टक्के धावा या सामन्यात कोहलीने चौकारांच्या साह्याने केल्या. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी फलंदाजी करताना भारतीय फलंदाजाकडून झालेली ही चौथ्या क्रमांकाची हळुवार खेळी ठरली. परंतु, या फलंदाजांमध्ये त्याचा स्ट्राइक रेट सर्वाधिक ७८.७२ असा आहे. १२ शतके चौथ्या क्रमांकावर खेळताना कोहलीच्या नावावर झाली आहेत. विशेष म्हणजे, केवळ सचिन तेंडुलकरच्या नावावर या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक ४४ शतकांचा विक्रम आहे. तसेच, गुंडप्पा विश्वनाथनेदेखील चौथ्या क्रमांकावर खेळताना १२ शतके झळकावली आहेत.0९ शतके कर्णधारपदी असताना कोहलीने झळकावली आहेत. मोहंमद अझरुद्दिननेही कर्णधार म्हणून ९ शतके झळकावली असून, सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय कर्णधार म्हणून सुनील गावसकर (११) यांच्या नावावर विक्रम आहे. 0७ देशांविरुद्ध कोहलीने आतापर्यंत कसोटी सामने खेळले असून, प्रत्येक देशाविरुद्ध त्याने शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. कोहली अद्याप झिम्बाब्वे आणि पाकविरुद्ध कसोटी खेळलेला नाही.0९ कसोटी शतके झळकावणारा मुरली विजय सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय सलामीवीर म्हणून संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आला आहे. गावसकर (३३) आणि वीरेंद्र सेहवाग (२२) यांनी सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकावली आहेत.या सामन्यापूर्वी बांगलादेशाने भारतात एकही कसोटी सामना खेळलेला नाही.