शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

वेस्ट इंडिज समोर भारताचे १९३ धावांचे विराट आव्हान

By admin | Updated: March 31, 2016 20:41 IST

विराट कोहलीच्या आक्रमक ८९ धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज समोर १९३ धावांचे विराट आव्हान ठेवले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ गड्याच्या मोबदल्यात १९२ धावा केल्या.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ३१ - विराट कोहलीच्या आक्रमक ८९ धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज समोर १९३ धावांचे विराट आव्हान ठेवले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ गड्याच्या मोबदल्यात १९२ धावा केल्या. भारतातर्फे विराट कोहलीने पुन्हा एकदा जिगरबाज आक्रमक खेळी करताना ४७ चेंडूत एक षटकार आणि ११ चौकाराच्या मदतीने नाबाद ८९ धावा केल्या. त्याला रहाणे (४०) आणि धोनीने (१५) चांगली साथ दिली.
 
रैना सतत अपयशी ठरत असल्यामुळे धोनी आज ४ क्रमांकावर फलंदाजीस आला. धोनी आणि विराट कोहलीने ४.३ षटकात झटपट ६४ धावांची भागीदीरी केली. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताला दमदार सुरवात करुन दिली आहे. टी २० विश्वचषकात भारताला आतापर्यंत अशी सुरवात मिळाली नव्हती. सलामीवर शिखर धवनला आराम देऊन अजिंक्य रहाणेला संधी देण्याचा निर्णय धोनीला फायद्याचा ठरला.
 
रोहित आणि रहाणे यांनी ७.२ षटकात ६२ धावांची सलामी दिली. ही या विश्वचषकातील भारतातर्फे सर्वात मोठी सलामीची भागीदारी होय. रोहित शर्मा संघाच्या ६२ धावा असताना बाद झाला. त्याने ३१ चेंडूचा सामना करताना ३ षटकार आणि ३ चौकाराच्या मदतीने झटपट ४३ धावा जमवल्या.
 
दरम्यान आंद्रे रसेलने पहिल्या षटकात केवळ २ धावा दिल्या. दुसरे षटक घेऊन आलेल्या सॅमुअल बद्रीने ४ धावा खर्च केल्या. ब्रेथवेटने टाकलेल्या तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रोहितने षटकार मारून ९ धावा वसूल केल्या. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात रोहितने २० धावा चोपून काढल्या. त्यानंतर रोहित शर्मा ३१ चेंडूत ४३ धावा काढून बद्रीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. अजिंक्य रहाणेने संथ सुरवातीनंतर अक्रमक ४० धावा केल्या. यामध्ये २ चौकारांचा समावेश आहे. रहाणे आणि कोहलीयांनी दुसऱ्या विकेटसाठी ८.१ षटकात ६६ धावांची भागीदारी केली. 
 
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान टी २० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार सॅमीने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रीत केले. भारतीय संघात २ मोठे बदल करण्यात आले आहेत, सतत अपयशी ठरणाऱ्या शिखर धवन ऐवजी मुंबईकर अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळाले आहे. तर दुखापतग्रस्त युवराज ऐवजी मनिष पांडेला संघात स्थान दिले आहे. यामधून जिंकणारा संघ ३ तारखेला इंग्लडशी दोन हात करणार आहे. सर्वांचे लक्ष असेल ते भारताच्या विराट कोहली आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांच्या खेळीकडे. या दोघांच्या कामगिरीवर दोन्ही संघांचा विजय अवलंबून असेल.
 
वेस्ट इंडिज संघ - डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युएल बद्री, सुलेमान बेन, कार्लोस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, लेंडल सिमन्स, ख्रिस गेल, जेसन होल्डर, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल.
भारतीय संघ - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, मनिष पांडे, रविचंद्रन आश्विन, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आशीष नेहरा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या.