शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

भारतीयांची ऑलिम्पिक पात्रता धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 01:15 IST

दहा सदस्य असलेल्या भारतीय कॅनोइंग संघ पटाया, थायलंड (३० एप्रिल-७ मे ) येथे होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला मुकला आहे

अभिजित देशमुखकाही महिन्यांपूर्वी १५० भारतीय खेळाडू ऑलिम्पिकसाठी सहज पात्र ठरतील, अशी शक्यता निर्माण झाली होती; पण अनेक देशांनी कोविडमुळे प्रवासबंदी केली आहे, त्यामुळे अनेक खेळाडूंच्या ऑलिम्पिक पात्रतेवर धोका निर्माण झाला आहे. भारताचे आतापर्यंत ९१ खेळाडू ११ क्रीडाप्रकारांत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. 

महिला रिले संघभारतीय ४x४०० आणि ४x१०० महिला रिले संघ कदाचित यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिसणार नाहीत. २००२ पासून आशियाई क्रीडा स्पर्धेत ४x४०० महिला संघाने नेहमी गोल्ड मेडल जिंकले आहेत. सर्व भारतीय ॲथलेटिक्स खेळाडू (१-२ मे) दरम्यान पोलंड येथे होणाऱ्या वर्ल्ड रिले ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी सज्ज होते. भारतातून पोलंडला थेट विमानसेवा नसल्यामुळे, भारतीय संघ हॉलंड मार्गे पोलंडमध्ये दाखल होणार होता; पण हॉलंडने भारतीयांना प्रवासबंदी घातल्यामुळे ॲथलेटिक्स संघाला विमानामध्ये प्रवेश दिला नाही. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरू शकणाऱ्या महिला रिले संघाचे आव्हान जवळ जवळ संपले आहे. 

कॅनोईंगदहा सदस्य असलेल्या भारतीय कॅनोइंग संघ पटाया, थायलंड (३० एप्रिल-७ मे ) येथे होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला मुकला आहे. या स्पर्धेसाठी १० दिवस विलगीकरण आवश्यक होते, त्यासाठी भारतीय संघ १६ एप्रिलला रवाना होणार होता; पण थायलंडने शेवटच्या क्षणी भारतातून थेट विमानसेवा बंद केल्यामुळे कॅनोइंग संघाला धक्का बसला. इतर कुठल्याही देशातून शेवटच्या क्षणी विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे कॅनोइंग संघाचे ऑलिम्पिक स्वप्न संपुष्टात आले.

मलेशिया व्हाया कतार?भारतीय ओपन सुपर ५०० स्पर्धा रद्द झाल्यामुळे भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, किदंबी श्रीकांत आणि अश्विनी पोनाप्पा - सिक्की रेड्डी जोडी यांची ऑलिम्पिक पात्रता धोक्यात दिसत आहे. त्यामुळे उरलेल्या दोन स्पर्धा मलेशिया (मे २५-३०) आणि सिंगापूर (जून १-६) येथे उत्तम कामगिरी करावी लागेल. पण दोन्ही देशांनी भारतातून थेट विमानसेवा बंद केली आहे. त्यामुळे मलेशिया व्हाया कतार किंवा आणखी कुठला देश परवानगी देतो याचे नियोजन भारतीय बॅडमिंटन संघटनेला करावे लागेल. पी. व्ही. सिंधू, साई प्रनिथ, चिराग रेड्डी - सात्विकराज रांकीरेड्डी हे आधीच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020Indiaभारत