शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

भारतीयांनी चिनी वर्चस्वाला धक्का दिला: ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 10:47 IST

हे यश क्रिकेटच्या १९८३ सालच्या विश्वचषक विजयाप्रमाणे आहे.

रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिव्या देशमुखने जिंकलेला विश्वचषक भारतीय बुद्धिबळासाठी, विशेषतः भारतीय महिला बुद्धिबळासाठी फार मोठी घटना आहे. विश्वचषक किंवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धाना चिनी खेळाडू खूप महत्त्व देतात. १९९० पासून महिला जागतिक अजिंक्यपदावर चीनचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे भारतीयांनी चिनी वर्चस्वाला धक्का दिला आहे, असे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

स्पर्धेतील महिला विश्वचषक भारतीयांच्या कामगिरीबाबत ठिपसे म्हणाले की, 'यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत चिनी खेळाडूंचे मानांकन वरचढ होते. दिव्याला १५वे मानांकन होते. त्यामुळे १५व्या मानांकनाची खेळाडू विश्वचषक पटकावते, ही अत्यंत दुर्मीळ बाब आहे. चिनी खेळाडूंना नमवणे सोपे नसते आणि दिव्या तसेच कोनेरू हम्पी यांनी आपल्या प्रवासादरम्यान मातब्बर चिनी खेळाडूंना पराभूत केले.'

दिव्याचे कौतुक करताना ठिपसे म्हणाले की, 'दिव्या बेधडक आहे. टायब्रेकमध्ये दुसरा डावही बरोबरीत जात असताना दडपणात आलेल्या हम्पीकडून चूक झाली आणि बाजी पलटली. तिला वेळेशी सांगड घालता आली नाही.'

त्याचप्रमाणे, 'डाव सुरू झाला, तेव्हा दिव्याच्या १५ मिनिटांमध्ये, १६ मिनिटे अशी वाढ झाली. ती पटापट चाली रचत असल्याने तिचा वेळ वाढला. जेव्हा तिच्याकडे १६.३० मिनिटे होती, तेव्हा हम्पीकडे केवळ ८ मिनिटे होती. हम्पी विचार करून खेळत होती आणि दिव्या आक्रमकपणे खेळली. त्यामुळे दिव्याची तयारी पाहून हम्पीच्या मनात कुठेतरी चलबिचल झाल्यासारखे वाटले. यामुळेच तिच्याकडून चूक झाली. दिव्या महाभारतातील अर्जुनासारखी खेळली, तिला केवळ पक्ष्याचा डोळा दिसत होता,' असेही ठिपसे यांनी सांगितले.

हे यश १९८३ विश्वचषकासारखे!

ठिपसे यांनी सांगितले की, 'हम्पीचा खेळ पुन्हा एकदा बहरला आहे. तिचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे. २०१७ मध्ये आई बनल्यानंतर तिने खेळ जवळपास सोडलाच होता. मात्र, दोन वर्षांनी तिने पुनरागमन केले, तेव्हा तिने चेसबोर्ड उघडूनही पाहिला नव्हता. यानंतर तिने रॅपिड वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावली आणि मागे वळून पाहिले नाही. हे यश क्रिकेटच्या १९८३ सालच्या विश्वचषक विजयाप्रमाणे आहे. त्यावेळी जसे भारताला कोणीही गृहीत धरले नव्हते, तसेच यावेळीही भारतीयांना विश्वजेतेपदाचा दावेदार मानले नव्हते. २०२२ ऑलिम्पियाडपासूनच भारतीयांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला असून, आता भारतीय बुद्धिबळाच्या सुवर्णकाळाची तयारी सुरू झाली आहे.'

 

टॅग्स :Chessबुद्धीबळ