शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

भारतीयांनी चिनी वर्चस्वाला धक्का दिला: ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 10:47 IST

हे यश क्रिकेटच्या १९८३ सालच्या विश्वचषक विजयाप्रमाणे आहे.

रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिव्या देशमुखने जिंकलेला विश्वचषक भारतीय बुद्धिबळासाठी, विशेषतः भारतीय महिला बुद्धिबळासाठी फार मोठी घटना आहे. विश्वचषक किंवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धाना चिनी खेळाडू खूप महत्त्व देतात. १९९० पासून महिला जागतिक अजिंक्यपदावर चीनचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे भारतीयांनी चिनी वर्चस्वाला धक्का दिला आहे, असे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

स्पर्धेतील महिला विश्वचषक भारतीयांच्या कामगिरीबाबत ठिपसे म्हणाले की, 'यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत चिनी खेळाडूंचे मानांकन वरचढ होते. दिव्याला १५वे मानांकन होते. त्यामुळे १५व्या मानांकनाची खेळाडू विश्वचषक पटकावते, ही अत्यंत दुर्मीळ बाब आहे. चिनी खेळाडूंना नमवणे सोपे नसते आणि दिव्या तसेच कोनेरू हम्पी यांनी आपल्या प्रवासादरम्यान मातब्बर चिनी खेळाडूंना पराभूत केले.'

दिव्याचे कौतुक करताना ठिपसे म्हणाले की, 'दिव्या बेधडक आहे. टायब्रेकमध्ये दुसरा डावही बरोबरीत जात असताना दडपणात आलेल्या हम्पीकडून चूक झाली आणि बाजी पलटली. तिला वेळेशी सांगड घालता आली नाही.'

त्याचप्रमाणे, 'डाव सुरू झाला, तेव्हा दिव्याच्या १५ मिनिटांमध्ये, १६ मिनिटे अशी वाढ झाली. ती पटापट चाली रचत असल्याने तिचा वेळ वाढला. जेव्हा तिच्याकडे १६.३० मिनिटे होती, तेव्हा हम्पीकडे केवळ ८ मिनिटे होती. हम्पी विचार करून खेळत होती आणि दिव्या आक्रमकपणे खेळली. त्यामुळे दिव्याची तयारी पाहून हम्पीच्या मनात कुठेतरी चलबिचल झाल्यासारखे वाटले. यामुळेच तिच्याकडून चूक झाली. दिव्या महाभारतातील अर्जुनासारखी खेळली, तिला केवळ पक्ष्याचा डोळा दिसत होता,' असेही ठिपसे यांनी सांगितले.

हे यश १९८३ विश्वचषकासारखे!

ठिपसे यांनी सांगितले की, 'हम्पीचा खेळ पुन्हा एकदा बहरला आहे. तिचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे. २०१७ मध्ये आई बनल्यानंतर तिने खेळ जवळपास सोडलाच होता. मात्र, दोन वर्षांनी तिने पुनरागमन केले, तेव्हा तिने चेसबोर्ड उघडूनही पाहिला नव्हता. यानंतर तिने रॅपिड वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावली आणि मागे वळून पाहिले नाही. हे यश क्रिकेटच्या १९८३ सालच्या विश्वचषक विजयाप्रमाणे आहे. त्यावेळी जसे भारताला कोणीही गृहीत धरले नव्हते, तसेच यावेळीही भारतीयांना विश्वजेतेपदाचा दावेदार मानले नव्हते. २०२२ ऑलिम्पियाडपासूनच भारतीयांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला असून, आता भारतीय बुद्धिबळाच्या सुवर्णकाळाची तयारी सुरू झाली आहे.'

 

टॅग्स :Chessबुद्धीबळ