शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘आयर्नमॅन’वर भारतीय जवानाचा झेंडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 20:20 IST

बिश्वरजितने रचला इतिहास : भारतीयांचे स्पर्धेवर वर्चस्व

पणजी : देशात पहिल्यांदाच झालेल्या आयर्नमॅन ७०.३ या अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेवर भारतीय सेनेच्या बिश्वरजित सिंग सईखोम याने झेंडा फडकवला. २९ वर्षीय या जवानाने ४ तास ४२ मिनिटांत ही स्पर्धा जिंकत इतिहास रचला. भारताच्या निहाल बेग आणि महेश लॉरेबाम यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकाविले. स्वित्झर्लंडच्या पाबलो इरातने चौथे स्थान मिळवले. स्पर्धेवर भारतीय ट्रायथलिट्सचे वर्चस्व राहिले.मिरामार येथील बीचवर सकाळी ७ वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेत १.९ किमी स्वीमिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी धावण्याचे आव्हान होते. ट्रायथलिट्ना न थांबता हे तिन्ही प्रकार करायचे होते. त्यात पुणे येथील भारतीय सेनेच्या हवालदाराने बाजी मारली. त्याने प्रथमच आयर्नमॅन स्पर्धा जिंकली हे विशेष. बिश्वरजितने या तिन्ही प्रकारांसाठी ४ तास ४२ मिनिटांचा वेळ दिला. दुसºया क्रमांकावरील भारताचा निहाल बेग हा आयआयटी मुंबईचा असून त्याने ४ तास ४७ मिनिटे आणि ४७ सेकंदांत स्पर्धा पूर्ण केली. मणिपूरच्या महेशने ४ तास ५२ मिनिटांत शर्यत पूर्ण केली. या विजयानंतर पुणेस्थित हा जवान म्हणाला की, स्वित्झर्लंडच्या पाबलो इरातला पराभूत करण्याचे माझे स्वप्न होते, ते आज पूर्ण झाले. २०१५ मध्ये मी गोव्यातील ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण केली होती. अनेक वर्षांपासून पाबलो ही स्पर्धा जिंकत आहे. त्यामुळे त्याला पराभूत करण्याचे माझे ध्येय होते. फिनिश लाइनवर आलेला मी देशातील पहिला ठरलो, याचा मला खूप अभिमान आहे. बिश्वरजित हा व्यावसायिक ट्रायथलिट आहे. त्याने यापूर्वी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्वही केलेले आहे. रियो आॅलिम्पिक स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवडही झाली होती. मात्र, काही कारणास्तव या स्पर्धेत संघ सहभागी झाला नव्हता. याचे त्याला दु:खही आहे. परंतु, आयर्नमॅन स्पर्धा जिंकून त्याने आपल्यातील क्षमता सिद्ध केली आहे. या शानदार कामगिरीनंतर बिश्वरजितला न्यूूझीलंड येथे पुढील वर्षी होणाºया आयर्नमॅन ७०.३ विश्वचॅम्पियनशिपसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सकाळीच बीचवरराज्यात पहिल्यांदाच झालेली आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धा पाहण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही उत्सुकता होती. ते सकाळी ७.३० वाजताच मिरामार बीचवर पोहोचले. स्वीमिंग स्पर्धा आटोपल्यानंतर लगेच सायकलिंगला सुरुवात झाली. त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि सहभागींचा उत्साह वाढवला. या वेळी नौसेनेचे अ‍ॅडमिरल फिलिपोझ जी. पिनुमुतील उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अशा प्रकारच्या क्रीडा प्रकारामुळे पर्यटनालाही मोठी मदत मिळते. तसेच क्रीडा संस्कृतीस चालना मिळते. अशा स्पर्धांचे आयोजन करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यापुढेही ही स्पर्धा आयोजित करताना आम्हाला आनंद वाटेल. दरम्यान, या स्पर्र्धेत २७ देशांतील ट्रायथलिट्सनी भाग घेतला. देशात पहिल्यांदाच ही स्पर्धा होत असल्याने अधिकाधिक खेळाडू देशातीलच होते. त्यात महाराष्ट्रातील जवळपास ६० खेळाडूंचा समावेश होता. 

सांघिक गटातही भारतीय त्रिकूटसांघिक गटातही भारतीय त्रिकुटाने मजल मारली. यामध्ये अदित दहीया (स्वीमिंग), याशिष दहिया (सायकलिंग) आणि पंकज धिमन (धावणे) यांचा समावेश आहे. याशिष हा एका मोठ्या कंपनीचा सीईओ आहे. त्याला ट्रायथलॉनबद्दल खूप आवड आहे. तो म्हणाला की, येथील वातावरण आणि स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद उत्तम होता. मी दुबई येथे गेल्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी झालो होतो. सहा महिन्यांपासून आम्ही गोव्यातील स्पर्धेसाठी तयारी करीत होतो. केलेल्या कष्टांचे फळ मिळाले.

पहाटेपासून पोलीस तैनात...आयर्नमॅन या स्पर्धेसाठी सुरक्षारक्षक, पोलीस आणि स्वयंसेवक यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. गोवा पोलीस दलाला काही सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही पोलिसांची ड्युटी रात्री ३ वाजल्यापासून लावण्यात आली होती. पहाटे ४ वाजल्यापासून स्पर्धेचा मार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. दोनापावल सर्कलजवळ सकाळी ९ वाजता मात्र काही स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मणिपाल हॉस्पिटलकडे जाण्याचा मार्ग बंद असल्याने काही डॉक्टरांची अडचण झाली. इतर ठिकाणी मात्र स्थानिकांनी स्पर्धेला प्रतिसाद दिला.

टॅग्स :Indiaभारत