शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

भारतीय महिलांचा जेतेपदाचा ‘चौकार’

By admin | Updated: January 5, 2017 02:17 IST

भारताच्या महिला फुटबॉल संघाने अपेक्षेप्रमाणे आपला दबदबा राखताना बांगलादेशचा ३-१ असा धुव्वा उडवून सलग चौथ्यांदा सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

सिलिगुडी : भारताच्या महिला फुटबॉल संघाने अपेक्षेप्रमाणे आपला दबदबा राखताना बांगलादेशचा ३-१ असा धुव्वा उडवून सलग चौथ्यांदा सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारतीय महिलांनी सलग १९ सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. यामध्ये १८ विजय व एक अनिर्णित अशी कामगिरी भारतीय महिलांनी केली आहे.कंचनगंजा स्टेडियममध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात स्ट्रायकर दांगमेई ग्रेसने १२व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल केला. बांगलादेशची गोलकीपर सबीना अख्तरला सहजपणे चकवा देत ग्रेसने शानदार गोल केला. १७व्या मिनीटाला भारताला दुसरा गोल करण्याची संधी मिळाली. परंतु, कमल देवीने केलेला हेडर गोलपोस्टच्या अगदी जवळून गेला. यानंतर, बांगलादेशने ४०व्या मिनीटाला सीरत जहां शोपनाच्या जोरावर १-१ अशी बरोबरी साधली. मध्यंतराला ही बरोबरी कायम राहिली. मात्र, दुसऱ्या सत्रात भारताने आक्रमक खेळ केला. ६०व्या मिनिटाला बाला देवीला बांगलादेशच्या खेळाडूने गोलक्षेत्रात धक्का दिल्याने पंचांनी भारताला पेनल्टी किक बहाल केली. ही नामी संधी साधताना सस्मिता मलिकने भारताची आघाडी २-१ अशी केली. (वृत्तसंस्था)