शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:31 IST

२१व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेची दमदार सुरुवात करताना यजमान भारताने पुरुष आणि महिला या दोन्ही गटातून सुपर आठ फेरीत प्रवेश केला.

कटक : येथे सुरु असलेल्या २१व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेची दमदार सुरुवात करताना यजमान भारताने पुरुष आणि महिला या दोन्ही गटातून सुपर आठ फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय खेळाडूंनी यादरम्यान केवळ दोन गेम गमावले. पुरुषांमध्ये अचंता शरथ कमल याने सिंगापूरच्या जेयू क्लेयरेन्सच्यूविरुद्ध, तर महिलांमध्ये अहलिका मुखर्जीने श्रीलंकेच्या चमातसारा फर्नांडोविरुद्ध प्रत्येकी एक गेम गमावला.पुरुष गटात संघ व्यवस्थापनाने शरथ कमल, जी. साथियान आणि हरमीत देसाई या अनुभवी खेळाडूंवर भरवसा दाखवला. आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविताना या तिघांनी प्रथम स्कॅटलंड आणि त्यानंतर सिंगापूर या संघांना प्रत्येकी ३-० असा धक्का दिला. महिलांमध्ये मात्र भारतीय संघाने दोन्ही सामन्यांत वेगळा चमू खेळवला. मनिका बत्रा, अर्चना कामत आणि अहलिका यांनी प्रथम श्रीलंकेला ३-० असे नमविले. यानंतर द. आफ्रिकाविरुद्ध अर्चना, मधुरिका पाटकर आणि सुचित्रा मुखर्जी यांना खेळविण्यात आले. त्यांनी भारताचा सलग दुसरा विजय मिळवताना ३-० अशी बाजी मारली. (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :Table Tennisटेबल टेनिसIndiaभारत