शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नेमबाजांचे ‘मिशन विश्वकप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 03:55 IST

नेमबाजी विश्वचषकाची अंतिम फेरी भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता गाठण्यासह भारताच्या २८ खेळाडूंना शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या आयएसएसएफ विश्व शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविण्यासाठी कडव्या आव्हानांचा सामना करावा लागेल.

मॉस्को : नेमबाजी विश्वचषकाची अंतिम फेरी भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता गाठण्यासह भारताच्या २८ खेळाडूंना शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या आयएसएसएफ विश्व शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविण्यासाठी कडव्या आव्हानांचा सामना करावा लागेल.जगभरातील शॉटगन नेमबाजांसाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते. कारण, चांगल्या कामगिरीसह नवी दिल्लीत पुढील महिन्यात आयोजित विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान पटकावण्याची संधी याच स्पर्धेद्वारे मिळेल. पाचही स्पर्धेतील पदकविजेते विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळतील. डबल ट्रॅपचे नेतृत्व २६ वर्षांचा कयनान चेनाई करेल. त्याने अलीकडे आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकले होते. त्याच्या सोबतीला जोरावरसिंग आणि बिरेनदीपसिंग हे आहेतच. स्कीट प्रकारात मैराज अहमद खान हा भारताकडून पदकाचा प्रबळ दावेदार आहे. महिला गटात रश्मी राठोड आव्हान सादर करेल. अस्ताना येथे माहेश्वरी चौहान हिने स्कीटमध्ये आंतरराष्टÑीय पदक जिंकले होते. पुरुष स्कीट संघात मैराजशिवाय अंगदवीरसिंग बाजवा आणि शिराजसिंग; तर महिला ट्रॅप संघात राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग आणि सीमा तोमर आव्हान सादर करतील. ज्युनियर गटात १५ वर्षांचा शपथ भारद्वाज याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. याशिवाय, मानवादित्यसिंग राठोड, लक्ष्य आणि अनंतजितसिंग नरुका हेदेखील पदकाचे दावेदार असतील. (वृत्तसंस्था)भारताकडून आतापर्यंत केवळ अंकुर मित्तल हाच नवी दिल्लीच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्याने दिल्ली आणि मेक्सिको येथील पहिल्या दोन फेºयांमध्ये रौप्य आणि सुवर्णपदक जिंकले होते. डबल ट्रॅपचा तज्ज्ञ खेळाडू मित्तल याला सध्याच्या स्पर्धेतही पदकाची आशा आहे.अंकुर मित्तलने याच महिन्यात अस्ताना येथे आशियाई शॉटगन स्पर्धेचे सुवर्ण जिंकले होते. संग्राम दहिया आणि मोहंमद असाब हेदेखील मित्तलसोबत स्पर्धेत सहभागी होणार आहेत.