शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

भारतीय नेमबाजांचे ‘मिशन विश्वकप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 03:55 IST

नेमबाजी विश्वचषकाची अंतिम फेरी भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता गाठण्यासह भारताच्या २८ खेळाडूंना शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या आयएसएसएफ विश्व शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविण्यासाठी कडव्या आव्हानांचा सामना करावा लागेल.

मॉस्को : नेमबाजी विश्वचषकाची अंतिम फेरी भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता गाठण्यासह भारताच्या २८ खेळाडूंना शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या आयएसएसएफ विश्व शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविण्यासाठी कडव्या आव्हानांचा सामना करावा लागेल.जगभरातील शॉटगन नेमबाजांसाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते. कारण, चांगल्या कामगिरीसह नवी दिल्लीत पुढील महिन्यात आयोजित विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान पटकावण्याची संधी याच स्पर्धेद्वारे मिळेल. पाचही स्पर्धेतील पदकविजेते विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळतील. डबल ट्रॅपचे नेतृत्व २६ वर्षांचा कयनान चेनाई करेल. त्याने अलीकडे आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकले होते. त्याच्या सोबतीला जोरावरसिंग आणि बिरेनदीपसिंग हे आहेतच. स्कीट प्रकारात मैराज अहमद खान हा भारताकडून पदकाचा प्रबळ दावेदार आहे. महिला गटात रश्मी राठोड आव्हान सादर करेल. अस्ताना येथे माहेश्वरी चौहान हिने स्कीटमध्ये आंतरराष्टÑीय पदक जिंकले होते. पुरुष स्कीट संघात मैराजशिवाय अंगदवीरसिंग बाजवा आणि शिराजसिंग; तर महिला ट्रॅप संघात राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग आणि सीमा तोमर आव्हान सादर करतील. ज्युनियर गटात १५ वर्षांचा शपथ भारद्वाज याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. याशिवाय, मानवादित्यसिंग राठोड, लक्ष्य आणि अनंतजितसिंग नरुका हेदेखील पदकाचे दावेदार असतील. (वृत्तसंस्था)भारताकडून आतापर्यंत केवळ अंकुर मित्तल हाच नवी दिल्लीच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्याने दिल्ली आणि मेक्सिको येथील पहिल्या दोन फेºयांमध्ये रौप्य आणि सुवर्णपदक जिंकले होते. डबल ट्रॅपचा तज्ज्ञ खेळाडू मित्तल याला सध्याच्या स्पर्धेतही पदकाची आशा आहे.अंकुर मित्तलने याच महिन्यात अस्ताना येथे आशियाई शॉटगन स्पर्धेचे सुवर्ण जिंकले होते. संग्राम दहिया आणि मोहंमद असाब हेदेखील मित्तलसोबत स्पर्धेत सहभागी होणार आहेत.