शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

भारत पहिल्या विजयाचा प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2015 23:09 IST

विश्वचषक पात्रता फेरीतून जवळपास बाहेर पडल्यानंतर भारत गुरुवारी गुआमविरुद्ध विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत पहिला विजय नोंदवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

बंगळुरू : विश्वचषक पात्रता फेरीतून जवळपास बाहेर पडल्यानंतर भारत गुरुवारी गुआमविरुद्ध विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत पहिला विजय नोंदवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. ‘ड’ गटात समावेश असलेल्या भारताने याआधीच्या आपल्या सर्व, पाचही सामन्यांत पराभवाचे तोंड पाहिले आहे. त्याच वेळी गुआम संघाने आपल्या ५ सामन्यांतून ७ गुणांची कमाई केली आहे. स्टीफन कॉन्स्टेंटाइन यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाकडे पात्रता फेरीतील पहिला विजय मिळवण्याची ही सुवर्णसंधी असेल. त्याच वेळी जूनमध्ये झालेल्या एका सामन्यात गुआनने भारताला २-१ असे नमवले असल्याने भारतीय संघ गाफील राहिल्यास मोठा फटकाही बसू शकेल. त्याच वेळी विश्वचषक पात्रता फेरीचा विचार केल्यास भारताचे आव्हान याआधीच जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. इराण संघ सर्वधिक ११ गुणांसह गटात अग्रस्थानी आहे. तर, ओमान संघ ८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. गटविजेता संघ आणि ४ दुसरे सर्वोत्तम संघ २०१८मध्ये होणाऱ्या विश्वचषक पात्रतेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. दरम्यान, गुआमविरुद्धच्या सामन्यानंतर भारत आणखी २ साखळी सामन्यांत खेळणार असून, एक सामना घरच्या मैदानावर तुर्कमेनिस्तानविरुद्ध रंगेल, तर दुसरा सामना विदेशी मैदानावर बलाढ्य इराणविरुद्ध रंगणार आहे. (वृत्तसंस्था)