शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

बरोबरी साधण्यास भारत प्रयत्नशील

By admin | Updated: June 21, 2015 01:14 IST

मालिका गमाविण्याचे दडपण असताना भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली रविवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय

मीरपूर : मालिका गमाविण्याचे दडपण असताना भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली रविवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत ७९ धावांनी पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघावर बांगलादेशविरुद्ध प्रथमच वन-डे मालिका गमाविण्याचे संकट निर्माण झाले आहे. या व्यतिरिक्त पहिल्या लढतीत धाव घेण्याच्या प्रयत्नात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कर्णधार धोनीला ७५ टक्के सामना शुल्क गमवावे लागले. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताचा मार्ग खडतर आहे. कारण गेल्या काही कालावधीपासून बांगलादेश सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे. आयसीसी विश्वकप क्रिकेट स्पर्धेत अंतिम आठ संघात स्थान मिळविल्यानंतर मशरफी मूर्तजाच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघाने मायदेशात पाकिस्तानचा वन-डे मालिकेत ३-० ने पराभव केला. बांगलादेशने त्यानंतर पहिल्या वन-डे लढतीत भारतासारख्या बलाढ्य संघाचा पराभव करीत प्रतिभा असल्याचे सिद्ध केले. याव्यतिरिक्त कर्णधार धोनीला गेल्या काही दिवसांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि अलीकडेच त्याच्या ‘कॅप्टन कुल’च्या प्रतिमेला धक्का बसला आहे. धाव घेताना मुद्दाम धक्का मारल्यामुळे धोनीला दोन सामन्यांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले नाही, हे नशीब. विश्वकप स्पर्धेत झिम्बाब्वेसारख्या कमकुवत संघाविरुद्ध ८५ धावांची खेळी आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीतील पराभवादरम्यान केलेली ६५ धावांची खेळी, याचा अपवाद वगळता धोनीला अलीकडच्या कालावधीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २०११ च्या विश्वकप स्पर्धेनंतर आकड्यांचा विचार करता फिरकीपटूंविरुद्ध धोनीचा स्ट्राईक रेट जवळजवळ ६६ पर्यंत घसरला आहे. डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध धोनीला चौकार ठोकण्यासाठी ३२ चेंडूंची प्रतीक्षा करावी लागत आहे. साकिब अल हसनविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत पावसाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पूर्ण सामना व्हावा, अशी अपेक्षा आहे. शिखर धवन गेल्या लढतीत अपयशी ठरला असला तरी गेल्या काही लढतींमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. धवनकडून कसोटी सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. एकमेव कसोटी सामन्यात त्याने मोठी शतकी खेळी केली होती. रोहित शर्मा वन-डेमध्ये मोठी खेळी करण्यास सक्षम आहे. कसोटी कर्णधार विराट कोहलीची वन-डेमधील कामगिरी उल्लेखनीय आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला सूर गवसेल, अशी अपेक्षा आहे. अजिंक्य रहाणेही प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहे. गोलंदाजांकडून कर्णधार धोनीला चमकदार कामगिरीची आशा आहे. उमेश यादव अनेक दिवसांपासून संघाचा स्थायी खेळाडू आहे, पण त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येतो. पहिल्या लढतीत त्याच्या दिशाहीन माऱ्याचा भारताला फटका बसला. मोहित शर्माला गेल्या काही दिवसांपासून तिसरा गोलंदाज म्हणून धोनीची पसंती लाभली आहे, पण पहिल्या लढतीत त्याने पाच षटकांत ५० पेक्षा अधिक धावा बहाल केल्या. भुवनेश्वर कुमारचा वेग कमी असल्यामुळे धोनीची अडचण वाढली आहे. भुवनेश्वर सुरुवातीला १३० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करीत होता, पण आता त्याच्या गोलंदाजीचाा वेग १२५ च्या आसपास असतो. त्यामुळे संघाचा मुख्य गोलंदाज रविचंद्रन अश्विनवर दडपण येते. अश्विन व काही अंशी सुरेश रैनाच्या गोलंदाजीमुळे पहिल्या लढतीत भारतीय संघ बांगलादेशला ३०७ धावांत रोखण्यात यशस्वी ठरला. गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेश संघाच्या वन-डे क्रिकेटमधील कामगिरीमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. बांगलादेश संघात युवा व अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. साकिब-अल-हसन, मुशफिकुर रहीम, तमीम इक्बाल व कर्णधार मशरफी मूर्तजा या अनुभवी खेळाडूंकडून बांगलादेश संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे. सलामीवीर सौम्या सरकार व वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान यांनी छाप सोडली आहे.(वृत्तसंस्था)भारत :- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी व धवल कुलकर्णी.बांगलादेश :- मशरफी मूर्तजा (कर्णधार), तमीम इक्बाल, सौम्या सरकार, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, साकिब-अल-हसन, शब्बीर रहमान, नासिर हुसेन, अराफात सनी, तास्किन अहमद, रुबेल हुसेन, रोनी तालुकदार, मुस्तफिजूर रहमान व लिट्टन दास.