शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

भारत टी-२० विश्वचषकाचा प्रबळ दावेदार

By admin | Updated: October 14, 2015 23:52 IST

टीम इंडियाची अलीकडची कामगिरी खराब आहे; पण पुढील वर्षी आपल्याच खेळपट्टीवर आयोजित होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा अन्य संघांसोबतच भारतही प्रबळ दावेदार

हैदराबाद : टीम इंडियाची अलीकडची कामगिरी खराब आहे; पण पुढील वर्षी आपल्याच खेळपट्टीवर आयोजित होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा अन्य संघांसोबतच भारतही प्रबळ दावेदार असल्याचे मत वेस्ट इंडीजचा मातब्बर फलंदाज ब्रायन लारा याने व्यक्त केले आहे.भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ ने गमावली. येथे एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या लाराने पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी तो म्हणाला, वेस्ट इंडीज संघाबाबतही लाराने मत मांडले. सध्याच्या विंडीज संघाचा मेंटॉर म्हणून भूमिका वठविण्याचा विचार आहे काय, असे विचारताच तो म्हणाला, ‘‘मी मेंटॉर किंवा कोच ही भूमिका स्वीकारली तरी काही विशेष फरक पडेल, असे मला वाटत नाही. समस्या गंभीर आहे आणि तिची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. आमच्याकडे पायाभूत सुविधा फारच तोकड्या असून, प्रशासकीय स्तरावरील कामही सुमार आहे. अशा वेळी कुणी जादूची कांडी फिरवून राष्ट्रीय स्तरावर बदल घडवून आणेल असे वाटत नाही.’’तो पुढे म्हणाला, ‘‘माझ्या मते, विंडीजकडे जगात सर्वांत प्रभावी खेळाडू आहेत; पण त्यांना साधारण दर्जाचे खेळाडू बनविण्यात येते. आमच्याकडे चांगल्या प्रशासनाची गरज आहे. मी काही करू शकतो; पण त्यासाठी पायाभूत स्तरावर सुधारणा घडवून आणावीच लागेल.’’ तू वेळेआधी निवृत्ती घेतली असे वाटते का, या प्रश्नाच्या उत्तरात लारा म्हणाला, ‘‘मी एक-दोन विक्रम आणखी नोंदवू शकलो असतो; पण विक्रमासाठी खेळलो नाही. १२ हजार धावा महत्त्वाच्या नाहीत. मी ज्या संघांविरुद्ध खेळलो, त्यांच्यासोबत खेळाचा आनंद लुटला.’’ मला भारतातील प्रत्येक शहर आवडते. क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहाचे नवल वाटते. सचिन, लक्ष्मण, द्रविड, धोनी, कोहली हे क्रिकेटला समर्पित असलेले मित्र मी भारतात मिळविले, याचा आनंद वाटतो, असे लाराने आवर्जून सांगितले. (वृत्तसंस्था)