शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भारतापुढे दुसरे स्थान गमावण्याचा धोका

By admin | Updated: January 22, 2016 03:02 IST

आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर सलग चार वन-डे सामने गमाविल्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत ०-४ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघापुढे आयसीसी वन-डे क्रमवारीतील आपले दुसरे स्थान गमावण्याचा धोका आहे

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर सलग चार वन-डे सामने गमाविल्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत ०-४ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघापुढे आयसीसी वन-डे क्रमवारीतील आपले दुसरे स्थान गमावण्याचा धोका आहे. भारताला जर सिडनी येथे २३ जानेवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पाचव्या व अखेरच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला तर तो भारतीय संघाचा ४०० वा पराभव ठरेल. भारताने मालिकेतील पहिल्या चारही सामन्यांत फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली, पण मोक्याच्या क्षणी चुका झाल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. चौथ्या लढतीत विजय मिळवण्याची चांगली संधी असताना भारतीय संघाने ती गमावली. क्रमवारीतील दुसरे स्थान कायम राखण्यात आता भारताला २३ जानेवारी रोजी सिडनी येथे होणाऱ्या पाचव्या व अखेरच्या लढतीत कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. भारताला मालिकेत ०-५ ने पराभव स्वीकारावा लागला तर भारतीय संघ क्रमवारील दक्षिण आफ्रिकेपेक्षा पिछाडीवर पडेल. अशा परिस्थितीत भारत आणि न्यूझीलंड संघांचे समान १११ मानांकन गुण राहतील, पण दशांश गुणांच्या फरकाने भारतीय संघ तिसऱ्या आणि न्यूझीलंड संघ चौथ्या स्थानावर राहील. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ अव्वल स्थानी दाखल झाला आहे, पण आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाचवी लढत गमावल्यानंतर वन-डे क्रमवारीत भारताची घसरण होणार आहे. मालिकेपूर्वी आॅस्ट्रेलिया (१२७) अव्वल तर भारत (११४) दुसऱ्या स्थानी होता. दक्षिण आफ्रिका (११२) संघ तिसऱ्या स्थानावर होता. (वृत्तसंस्था)> भारताने आतापर्यंत एकूण ८९५ सामने खेळले असून जगातील अन्य संघांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. भारताने यात ४५० सामने जिंकले असून ३९९ सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. सात सामने टाय झाले तर ३९ सामन्यांत निकाल शक्य झाला नाही.दुसऱ्या बाजूचा विचार करता विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलिया संघाने ८६६ सामन्यांत ५३७ विजय मिळवले आहेत तर त्यांना २८९ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.