शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

भारताने चीनमध्ये घडविला इतिहास! आशियाई स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत जिंकली ८० हून अधिक पदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 05:08 IST

भारताने यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत १९५१ पासून आतापर्यंतची सर्वाधिक ८१ हून अधिक पदके जिंकली आहेत.

हांगझाऊ : भारताने यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत १९५१ पासून आतापर्यंतची सर्वाधिक ८१ हून अधिक पदके जिंकली आहेत. जकार्ता येथे २०१८ साली भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्य पदकांसह ७० पदकांची कमाई केली होती.

भारताने यंदा १०० पदकांचे लक्ष्य ठेवले असून, बुधवारपर्यंत १८ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ३२ कांस्य अशी एकूण ८१ पदके जिंकली आहेत.  स्पर्धेत अद्याप चार दिवस शिल्लक आहेत. भारताने बुधवारी भालाफेक, तिरंदाजी आणि पुरुष ४ बाय ४०० रिले शर्यत अशा तीन स्पर्धांमध्ये सुवर्ण कमाई केली. भारताने  १९५१ मध्ये  ५१ पदके जिंकली. त्यानंतर   ५० पदके मिळविण्यासाठी ३१ वर्षे वाट पाहावी लागली.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत पूर्वीपेक्षा अधिक चमकला! ८१ पदकांसह, आपण आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट पदकतालिका साजरी केली. खेळाडूंच्या अतुलनीय समर्पण, धैर्य आणि खिलाडूवृत्तीचा हा पुरावा आहे. आपले प्रत्येक पदक कठोर परिश्रम आणि उत्कटतेच्या प्रवासावर प्रकाश टाकते. संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण. आपल्या खेळाडूंचे अभिनंदन.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आतापर्यंत काय झाले होते?

१९८२ मध्ये नवी दिल्ली आशियाडमध्ये  १३ सुवर्णांसह ५७ पदके जिंकली होती. १९५४ मध्ये  १७, तर १९५८ मध्ये केवळ १३ पदके जिंकली होती.   n१९९० मध्ये भारत पदकतालिकेत पहिल्या १० मध्येही नव्हता. त्यावेळी भारताकडे केवळ २३ पदके होती. १९९८ पासून कामगिरी सुधारली.

२००६ मध्ये प्रथमच  ५० हून अधिक पदके जिंकली होती. भारताकडे तिरंदाजी, मॅरेथाॅनसह इतर स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याची संधी आहे.

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३