शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भारताने चीनमध्ये घडविला इतिहास! आशियाई स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत जिंकली ८० हून अधिक पदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 05:08 IST

भारताने यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत १९५१ पासून आतापर्यंतची सर्वाधिक ८१ हून अधिक पदके जिंकली आहेत.

हांगझाऊ : भारताने यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत १९५१ पासून आतापर्यंतची सर्वाधिक ८१ हून अधिक पदके जिंकली आहेत. जकार्ता येथे २०१८ साली भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्य पदकांसह ७० पदकांची कमाई केली होती.

भारताने यंदा १०० पदकांचे लक्ष्य ठेवले असून, बुधवारपर्यंत १८ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ३२ कांस्य अशी एकूण ८१ पदके जिंकली आहेत.  स्पर्धेत अद्याप चार दिवस शिल्लक आहेत. भारताने बुधवारी भालाफेक, तिरंदाजी आणि पुरुष ४ बाय ४०० रिले शर्यत अशा तीन स्पर्धांमध्ये सुवर्ण कमाई केली. भारताने  १९५१ मध्ये  ५१ पदके जिंकली. त्यानंतर   ५० पदके मिळविण्यासाठी ३१ वर्षे वाट पाहावी लागली.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत पूर्वीपेक्षा अधिक चमकला! ८१ पदकांसह, आपण आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट पदकतालिका साजरी केली. खेळाडूंच्या अतुलनीय समर्पण, धैर्य आणि खिलाडूवृत्तीचा हा पुरावा आहे. आपले प्रत्येक पदक कठोर परिश्रम आणि उत्कटतेच्या प्रवासावर प्रकाश टाकते. संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण. आपल्या खेळाडूंचे अभिनंदन.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आतापर्यंत काय झाले होते?

१९८२ मध्ये नवी दिल्ली आशियाडमध्ये  १३ सुवर्णांसह ५७ पदके जिंकली होती. १९५४ मध्ये  १७, तर १९५८ मध्ये केवळ १३ पदके जिंकली होती.   n१९९० मध्ये भारत पदकतालिकेत पहिल्या १० मध्येही नव्हता. त्यावेळी भारताकडे केवळ २३ पदके होती. १९९८ पासून कामगिरी सुधारली.

२००६ मध्ये प्रथमच  ५० हून अधिक पदके जिंकली होती. भारताकडे तिरंदाजी, मॅरेथाॅनसह इतर स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याची संधी आहे.

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३