शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

भारताने लुटले विजयाचे सोने...

By admin | Updated: October 12, 2016 07:05 IST

अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर यजमान आणि संभाव्य विजेत्या भारतीय संघाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय

अहमदाबाद : अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर यजमान आणि संभाव्य विजेत्या भारतीय संघाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवताना बांगलादेशला ५७-२० असे लोळवले. या धमाकेदार विजयासह यजमानांनी ‘अ’ गटामध्ये ११ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.पहिला गुण बांगलादेशने जिंकल्यानंतर संपूर्ण सामन्यात भारताचा अपेक्षित दबदबा राहिला. भारतीयांनी केलेल्या जबरदस्त आक्रमणापुढे बांगलादेशचा शेवटपर्यंत निभाव लागला नाही. तब्बल ४ वेळा लोण चढवून भारतीयांनी बांगलादेशच्या आव्हानातली हवा काढली. मध्यंतरालाच भारताने २७-१० अशी १७ गुणांची एकतर्फी आघाडी सामन्याचा निकाल स्पष्ट केला. यानंतर बांगलादेशला केवळ १० गुण मिळवता आले. तर, भारतीयांनी बांगला खेळाडूंना कबड्डीचे धडे देताना सहज बाजी मारली. गेल्या दोन सामन्यांत लौकिकानुसार खेळण्यात अपयशी ठरलेल्या अजय ठाकूरने या सामन्यात आपल जलवा दाखवताना सर्वाधिक ११ गुणांची वसुली केली. तर, प्रदीप नरवालनेदेखील खोलवर चढाया करताना ८ गुण कमावले. तसेच, सुरेंद्र नाडा आणि संदीप नरवाल यांच्या भक्कम पकडीमध्ये बांगलाचे चढाईपटू अडकत गेले. बांगलादेशकडून कर्णधार अरुदुझमन मुन्शी याने एकाकी झुंज देताना आक्रमणात ६ गुणांची कमाई केली. तर, फेरदुस शेखने ४ गुण मिळवताना चांगल्या पकडी केल्या. (वृत्तसंस्था)