शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

भारत चार गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता

By admin | Updated: January 31, 2015 23:18 IST

तिरंगी मालिकेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर संघाची फलंदाजी मजबूत करण्यासाठी विश्वकप स्पर्धेत भारतीय संघ चार स्पेशालिस्ट गोलंदाजांसह खेळू शकतो,

पर्थ : तिरंगी मालिकेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर संघाची फलंदाजी मजबूत करण्यासाठी विश्वकप स्पर्धेत भारतीय संघ चार स्पेशालिस्ट गोलंदाजांसह खेळू शकतो, असे संकेत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दिले आहेत. आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाकडून तिरंगी मालिकेत चांगल्या कामगिरीची आशा होती, पण दिग्गज फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्यामुळे भारताला या मालिकेत एकही विजय साकारता आला नाही. धोनी म्हणाला, ‘‘आम्ही तीन वेगवान व दोन फिरकीपटूंसह खेळू शकत नाही. कारण त्यामुळे आमची फलंदाजी कमकुवत होते.’’शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध तीन गड्यांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय कर्णधाराने विश्वकप स्पर्धेसाठी संभाव्य रणनीतीचे संकेत देताना म्हटले, ‘‘जर तुम्ही नाणेफेक गमाविली आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना काही विकेट लवकर गमाविल्यात तर संघ अडचणीत येतो. या वेळी आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली विश्वकप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. चांगली कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या फलंदाजांचा आमच्या संघात समावेश आहे, पण प्रथम श्रेणी क्रिकेट व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करणे वेगळे आहे. त्यासाठी आम्ही रवींद्र जडेजाला बराच वेळ दिला असून तो आता अष्टपैलू म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.’’तिरंगी मालिकेतील चार सामन्यांत केवळ एक धाव व दोन विकेट घेणाऱ्या अक्षर पटेलबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘‘आम्हाला माहिती आहे की तो फलंदाजी करू शकतो, पण अधिक सामने खेळल्यानंतर तो परिपक्व होईल. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट व प्रथम श्रेणी क्रिकेट यामध्ये बराच फरक आहे. आम्हाला आमची फलंदाजी अधिक मजबूत करावी लागेल. तळाचे फलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.’’ विश्वकप स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखण्याबाबत बोलताना धोनी म्हणाला,‘‘आत्मविश्वासाचा विचार करता आम्ही चांगल्या स्थितीत आहोत. आम्ही योग्य रणनीती लागू करण्यावर भर दिला. पराभवाचे चक्र कसे भेदायचे याची आम्हाला चांगली कल्पना आहे. भारतीय संघ बऱ्याच दिवसांपासून येथे आहे. आमच्याकडे अद्याप १० दिवसांचा कालावधी आहे.’’संघाच्या विश्वकप स्पर्धेच्या तयारीबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘‘या विश्रांतीच्या कालावधीत क्रिकेटपासून दूर राहणार आहे. खेळाडूंचा उत्साह कसा वाढवायचा, हा पत्रकार परिषदेत सांगण्याचा विषय नाही. हे क्रिकेटच्या मैदानावर शक्य नाही. त्यासाठी ब्रेकची गरज आहे. आम्ही दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून येथे आहोत. आम्हाला येथील वातावरणाची सवय झाली आहे. आता क्रिकेटपासून ब्रेक घेत पुढे काय करायचे, याचा विचार करणार आहे.’’ (वृत्तसंस्था)मी तळाच्या फळीत असल्यामुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविले. तळाला बिन्नी व जडेजा हे फलंदाजही होते. आमची तळाची फळी मजबूत भासत होती. सुपर ओव्हर्समध्ये सलामीवीराला फलंदाजीसाठी पाठवू शकत नाही. नेहमीच्या लढतीत तुम्ही सलामीवीरांना फलंदाजीची जबाबदारी सोपवू शकतो, पण सुपर ओव्हरमध्ये फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाला पाठविणे आवश्यक ठरते. परिस्थिती ओळखून निर्णय घ्यावे लागतात. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत स्टार फलंदाज विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्याच्या निर्णय घेतला.- महेंद्रसिंह धोनी