शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

बरोबरी साधण्यास भारत उत्सुक

By admin | Updated: October 4, 2015 23:50 IST

गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पहिल्या टी-२० सामन्यात पराभव स्वीकारणारा भारतीय संघ सोमवारी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या लढतीत उणिवा दूर करण्यास प्रयत्नशील

कटक : गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पहिल्या टी-२० सामन्यात पराभव स्वीकारणारा भारतीय संघ सोमवारी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या लढतीत उणिवा दूर करण्यास प्रयत्नशील असून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यास उत्सुक आहे. भारताची या मालिकेत सुरुवात निराशाजनक झाली. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. सलामी लढतीतील पराभवासाठी जबाबदार असल्यामुळे भारतीय गोलंदाजांवर दडपण आहे. मालिकेत १-० ने आघाडीवर असलेला पाहुणा दक्षिण आफ्रिका संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्यास प्रयत्नशील आहे. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीवर संघाला पुन्हा एकदा विजयी मार्गावर आणण्याची जबाबदारी आहे. धर्मशालाच्या तुलनेत कटक आणि कोलकाता येथील परिस्थिती धोनी अ‍ॅण्ड कंपनीसाठी अनुकूल राहण्याची आशा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे कटक येथील खेळपट्टी संथ राहण्याची शक्यता आहे. उभय संघ ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये दाखल झाले. त्या वेळी कटकमध्ये वादळी पाऊस सुरू होता. त्यामुळे स्टेडियमला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीपूर्वी मैदानाची स्थिती चिंतेचा विषय आहे. हवामान खात्याने आगामी ४८ तासांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे लढतीमध्ये षटकांची कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मालिकेच्या सलामी लढतीत रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले शतक झळकावले, तर कोहलीने ४३ धावांची खेळी केली. रोहित व विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारताने १९९ धावांची दमदार मजल मारली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही सर्वोच्च धावसंख्या होती. फलंदाजांकडून यापेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त करता येणार नाही. फलंदाजांच्या चमकदार कामगिरीवर गोलंदाजांनी पाणी फेरले. रविचंद्रन आश्विनचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. डीव्हिलियर्सचा विचार करता तो जगातील कुठल्याही गोलंदाजाविरुद्ध धावा वसूल करण्यात सक्षम आहे. अचूक दिशा व टप्पा राखून गोलंदाजी केली तरच त्याच्यावर अंकुश राखता येऊ शकतो. धर्मशाला येथे भुवनेश्वर कुमार व एस. अरविंद यांना अचूक यॉर्कर टाकता आले नाहीत. भारताच्या फलंदाजीचा विचार करता रोहित व कोहली बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांना वेगाने धावा वसूल करता आल्या नाहीत. डेथ ओव्हर्समध्ये अधिक धावा वसूल करण्याचा भारताचा प्रयत्न राहील. धोनीची अंबाती रायुडूला पसंती आहे, पण गेल्या लढतीत त्याला खातेही उघडता आले नाही. पटेलच्या स्थानासाठी ज्याप्रमाणे मिश्रा योग्य पर्याय आहे त्याचप्रमाणे रायुडूच्या स्थानी अजिंक्य रहाणे उत्तम पर्याय ठरू शकतो. धोनी अंतिम ११ खेळाडूंमध्ये कुणाला संधी देतो, याबाबत उत्सुकता आहे. (वृत्तसंस्था)------------प्रतिस्पर्धी संघभारत :- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, अक्षर पटेल, रविचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, एस. अरविंद, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, हरभजन सिंग आणि अमित मिश्रा. दक्षिण आफ्रिका :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, एबी डीव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, फरहान बेहारडीन, मिलर, ख्रिस मॉरिस, कॅगिसो रबादा, केली एबट, मर्चंट डी लांगे, इम्रान ताहिर, क्विंटन डीकॉक, एडी लेई, अ‍ॅल्बी मोर्केल आणि कयाया जोंडो.