शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

भारताला ३-० ने विजयाची संधी

By admin | Updated: December 6, 2015 01:43 IST

माझ्या मते दक्षिण आफ्रिका संघ मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. विशेषता दोन कसोटी सामने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाची मानसिक स्थिती ढासळलेली आहे.

वसीम अक्रम लिहितो...

माझ्या मते दक्षिण आफ्रिका संघ मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. विशेषता दोन कसोटी सामने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाची मानसिक स्थिती ढासळलेली आहे. उपखंडातील संघांनाही अशा स्थितीला सामोरे जावे लागते. विशेषता आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पूर्ण शक्ती खर्ची घातलेली असते आणि त्यातही पराभव स्वीकारावा लागला तर मानसिकता ढासळते. मानसिकदृष्ट्या तुम्ही दौरा संपविण्यास प्रयत्नशील असता, पण मनाने मात्र तुम्ही तेथे नसता. अगदी याच स्थितीतून सध्या कोटला स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिका संघ जात आहे. दक्षिण आफ्रिकन खेळाडू सध्या तनाने येथे असले तरी मनाने मात्र नाहीत. या खेळपट्टीवर फलंदाज व गोलंदाजांसाठी या खेळपट्टीमध्ये निश्चितच काहीतरी आहे. ही काही टर्नर नाही, पण उपखंडातील खेळपट्टी आहे. दक्षिण आफ्रिका संघाने सुरुवातीलाच संधी गमावली आहे. त्यामुळे यजमान संघाला वर्चस्वाची संधी मिळाली. रिव्हर्स सिंग कसे खेळावे हे विराट आणि अजिंक्यने द. आफ्रिकेला दाखवून दिले. इनिस्विंग निष्प्रभ ठरविण्यासाठी दोघांनी फ्रंट फूटचा वापर केला. द. आफ्रिकेचे फलंदाज उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर सराव करीत असल्याने बॅकफूटवर खेळतात. अशावेळी पायचित होण्याची शक्यता अधिक वाढते. रिव्हर्स स्विंगला बॅकफूटवर खेळणारा फलंदाज पायचित झाला म्हणून समजा. वकारने असे अनेक बळी घेतल्याचे मला आठवते. द. आफ्रिकेला चांगली सुरुवातही मिळाली नाही आणि त्यांचे फलंदाज मोठी भागीदारी करण्यातही अपयशी ठरले. डुप्लेसिस आणि अमला हे तर फार्ममध्ये नव्हतेच. डेल स्टेनची जखम आणि कालिसची निवृत्ती या संघाला मागे नेऊन ठेवणारी ठरली. प्रभावी फलंदाज एबी डिव्हिलियर्स हा देखील धावा काढण्यात अपयशी ठरला आहे. फिरकीविरुद्ध हा संघ किती अपयशी ठरला हे आपण पाहिलेच आहे. विराटऐवजी मी असतो तर चौथ्या दिवशी काही तास फलंदाजी केली असती. डाव कधी घोषित करायचा याचा निर्णय नंतर घेतला असता. या सामन्यात अद्याप १८० षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणूनच भारताला मालिका ३-० ने खिशात घालण्याची मोठी संधी आहे. (टीसीएम)