शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

भारताला हॅट्ट्रिकची संधी

By admin | Updated: February 28, 2015 01:27 IST

पाक आणि द. आफ्रिकेला नमवीत ‘ब’ गटात वर्चस्व निर्माण करणाऱ्या गतविजेत्या टीम इंडियाला आज, शनिवारी विश्वचषकात कमकुवत मानल्या

पर्थ : पाक आणि द. आफ्रिकेला नमवीत ‘ब’ गटात वर्चस्व निर्माण करणाऱ्या गतविजेत्या टीम इंडियाला आज, शनिवारी विश्वचषकात कमकुवत मानल्या जाणाऱ्या संयुक्त अरब अमिरातवर (यूएई) विजयासह हॅट्ट्रिक नोंदविण्याची संधी असेल. भारताच्या विजयात फलंदाज व गोलंदाजांनी तोलामोलाचे प्रदर्शन केले. तिसऱ्या सामन्यात मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खेळणार नाही. त्याच्या गुडघ्याला दुखापत आहे. तथापि, यूएईविरुद्ध फारसा फरक जाणवणार नाही. गटात अव्वल स्थानावर राहण्याचा निर्धार धोनी अँड कंपनीने केलेला दिसतो. असे झाल्यास उपांत्यपूर्व फेरीत ‘अ’ गटात चौथ्या स्थानावर राहणाऱ्या संघाविरुद्ध खेळायला मिळेल. यूएईविरुद्ध टीम इंडियाला आणखी एक मोठा विजय साजरा करण्याची संधी असेल. यामुळे धावांची सरासरी वाढणार आहे. विराट कोहलीने दोन सामन्यांत शतक आणि ४६ धावांसह शानदार पुनरागमन केले. शिखर धवनने पाकविरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर द. आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैना हेदेखील उत्तम फलंदाजी करीत आहेत. भारताचे सहापैकी चार फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. यूएईच्या अनुभवहीन गोलंदाजीसाठी ही चांगली बातमी नाही. यूएईचा कर्णधार मोहम्मद तौकिर हा ४३ वर्षे ४३ दिवसांच्या वयासह स्पर्धेत सर्वाधिक वयाचा दुसरा खेळाडू आहे. २००४ मध्ये डम्बुला येथे आशिया चषक खेळल्यापासून तो केवळ सात सामने खेळू शकला. खुर्रम खान ४३ वर्र्षे २५० दिवस वयाचा आहे. संघाचे तीन गोलंदाज असांका गुरुगे, मोहम्मद नाविद आणि अमजद जावेद हे दहा आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. धोनी, कोहली, रहाणे यांच्यासारख्यांच्या फलंदाजीपुढे त्यांची डाळ शिजणार नाही. दुसरीकडे भारताला मोठी धावसंख्या उभारून सरासरीत सुधारणा करता येईल. रोहित शर्मा यालादेखील सूर गवसल्यास तो मोठी खेळी करू शकतो. कर्णधार धोनी हादेखील मोठी खेळी करण्याच्या प्रतीक्षेत असेल. कमकुवत संघाविरुद्ध बेंच स्ट्रेंग्थ तपासण्याच्या प्रयत्नांत धोनी विजयी संयोजन बदलेल, ही शक्यता नाही. शमीऐवजी मात्र बिन्नी किंवा भुवनेश्वर यापैकी एकाला संधी दिली जाईल. वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या लाईन आणि लेंग्थबद्दल संघ व्यवस्थापन चिंतेत आहे; पण तो वेगात मागे नाही. मोहित शर्मानेदेखील कामगिरीने प्रभावित केले. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रभावी फिरकी मारा करीत कर्णधाराची चिंता कमी केली. अशा परिस्थितीत यूएईला भारतावर विजय नोंदविण्यासाठी एखाद्या चमत्काराचीच आशा करावी लागेल. (वृत्तसंस्था)