शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारत ‘फेव्हरीट,’ पण...

By admin | Updated: February 22, 2017 01:26 IST

मालिका सुरू होण्याआधी मी सहसा काय बोलले गेले यावर विश्वास बाळगत नसतो. अविश्वसनीय, अनिवार्य हे शब्द मालिका

हर्षा भोगले लिहितो...मालिका सुरू होण्याआधी मी सहसा काय बोलले गेले यावर विश्वास बाळगत नसतो. अविश्वसनीय, अनिवार्य हे शब्द मालिका सुरूहोण्याआधी ऐकायला मिळतात. पण या गोष्टींना फारसे महत्त्व नाही. भारत-आॅस्ट्रेलिया मालिकेआधी काही असामान्य घडले असेल तर ते मला गोंधळात टाकणारे आहे.आॅस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला, की तो किती चांगला संघ आहे, याचीच चर्चा जोरात होते. पण यंदा आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्याच्या आधीपासून भारतीय संघ किती चांगला आहे, याची चर्चा रंगताना दिसते. पाहुण्या संघासाठी हा दौरा आव्हानात्मक मानला जात असला तरी माझ्या मते आॅस्ट्रेलियाचे खेळाडू संधीचे सोने करण्यात तरबेज मानले जातात. त्यांना कमी लेखून चालणार नाही.भारतीय संघ दिवसेंदिवस चांगली कामगिरी करीत आहे. सध्याचा संघदेखील बलाढ्य आहे. पण २०१३ च्या तुलनेत सध्याचा आॅस्ट्रेलियन संघ मला सरस दिसतो. भारताने इंग्लंडला सहज चारीमुंड्या चीत केले असले तरी आॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध बचावात्मक पवित्रा न घेता आक्रमक राहूनच खेळणे भारताला हितावह ठरणार आहे. कदाचित हे कुणाला पटणार नाही, पण आॅस्ट्रेलियाचा संघ पहिल्या कसोटीपासून यजमान संघावर दडपण आणू शकतो. पहिल्या डावात ४०० वर धावा काढून दुसऱ्या डावात फलंदाजीची वेळ आली तरी सामना गमवायचा नाही, याची खात्रीदेखील हा संघ देऊशकतो. इंग्लंडने पहिल्या डावात ४०० आणि ४७७ धावा काढूनदेखील तो संघ भारताकडून प्रत्येक वेळी डावाने पराभूत झाला, हा अनुभव आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चांगलाच डोक्यात ठेवला आहे.सर्व शस्त्रानिशी सज्ज असलेल्या भारतीय संघाशी आपला सामना आहे. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आक्रमक पण आत्ममुग्ध नाही, तसेच त्याचे सर्व सहकारी तगडे असल्याची जाणीव पाहुण्या संघाला असेलच. हे ओळखूनच काय डावपेच आखायचे आणि कुठल्याही स्थितीत हार न मानण्याचे धोरण आॅस्ट्रेलियाने आखले असावे. पाहुण्या संघाच्या प्रशिक्षकाने खेळाडूंना तशी तंबी दिली असावी. केवळ कौशल्याच्या बळावर तुम्ही भारतात भारताला नमवू शकणार नाही. आॅस्ट्रेलियाला भारतात विजय मिळवायचा झाल्यास कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आगमनाबरोबर घाम गाळणे सुरू करा, हाच यशाचा मूलमंत्र कोचने खेळाडूंना दिला असावा.