शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारत ‘फेव्हरीट,’ पण...

By admin | Updated: February 22, 2017 01:26 IST

मालिका सुरू होण्याआधी मी सहसा काय बोलले गेले यावर विश्वास बाळगत नसतो. अविश्वसनीय, अनिवार्य हे शब्द मालिका

हर्षा भोगले लिहितो...मालिका सुरू होण्याआधी मी सहसा काय बोलले गेले यावर विश्वास बाळगत नसतो. अविश्वसनीय, अनिवार्य हे शब्द मालिका सुरूहोण्याआधी ऐकायला मिळतात. पण या गोष्टींना फारसे महत्त्व नाही. भारत-आॅस्ट्रेलिया मालिकेआधी काही असामान्य घडले असेल तर ते मला गोंधळात टाकणारे आहे.आॅस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला, की तो किती चांगला संघ आहे, याचीच चर्चा जोरात होते. पण यंदा आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्याच्या आधीपासून भारतीय संघ किती चांगला आहे, याची चर्चा रंगताना दिसते. पाहुण्या संघासाठी हा दौरा आव्हानात्मक मानला जात असला तरी माझ्या मते आॅस्ट्रेलियाचे खेळाडू संधीचे सोने करण्यात तरबेज मानले जातात. त्यांना कमी लेखून चालणार नाही.भारतीय संघ दिवसेंदिवस चांगली कामगिरी करीत आहे. सध्याचा संघदेखील बलाढ्य आहे. पण २०१३ च्या तुलनेत सध्याचा आॅस्ट्रेलियन संघ मला सरस दिसतो. भारताने इंग्लंडला सहज चारीमुंड्या चीत केले असले तरी आॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध बचावात्मक पवित्रा न घेता आक्रमक राहूनच खेळणे भारताला हितावह ठरणार आहे. कदाचित हे कुणाला पटणार नाही, पण आॅस्ट्रेलियाचा संघ पहिल्या कसोटीपासून यजमान संघावर दडपण आणू शकतो. पहिल्या डावात ४०० वर धावा काढून दुसऱ्या डावात फलंदाजीची वेळ आली तरी सामना गमवायचा नाही, याची खात्रीदेखील हा संघ देऊशकतो. इंग्लंडने पहिल्या डावात ४०० आणि ४७७ धावा काढूनदेखील तो संघ भारताकडून प्रत्येक वेळी डावाने पराभूत झाला, हा अनुभव आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चांगलाच डोक्यात ठेवला आहे.सर्व शस्त्रानिशी सज्ज असलेल्या भारतीय संघाशी आपला सामना आहे. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आक्रमक पण आत्ममुग्ध नाही, तसेच त्याचे सर्व सहकारी तगडे असल्याची जाणीव पाहुण्या संघाला असेलच. हे ओळखूनच काय डावपेच आखायचे आणि कुठल्याही स्थितीत हार न मानण्याचे धोरण आॅस्ट्रेलियाने आखले असावे. पाहुण्या संघाच्या प्रशिक्षकाने खेळाडूंना तशी तंबी दिली असावी. केवळ कौशल्याच्या बळावर तुम्ही भारतात भारताला नमवू शकणार नाही. आॅस्ट्रेलियाला भारतात विजय मिळवायचा झाल्यास कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आगमनाबरोबर घाम गाळणे सुरू करा, हाच यशाचा मूलमंत्र कोचने खेळाडूंना दिला असावा.