शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

ध्यास सर्वोत्तमाचा! वेध टोकियो ऑलिम्पिकचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 06:49 IST

भारताने २०२८ साली क्रीडा महासत्ता बनण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवला आहे. ‘स्पोर्ट्स वॉचिंग नेशन’ ते ‘स्पोर्ट्स प्लेइंग नेशन’ ही संकल्पना कृतीत आणण्यासाठी ऑलिम्पिकमधील यश अधिक मोलाचे ठरू शकते.

भारताने २०२८ साली क्रीडा महासत्ता बनण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवला आहे. ‘स्पोर्ट्स वॉचिंग नेशन’ ते ‘स्पोर्ट्स प्लेइंग नेशन’ ही संकल्पना कृतीत आणण्यासाठी ऑलिम्पिकमधील यश अधिक मोलाचे ठरू शकते. ऑलिम्पिकमधील कामगिरीमुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा वाढीस लागते.मका हाच ध्यास डोळ्यापुढे ठेवून नववर्षात ‘टोकियो ऑलिम्पिक २०२०’कडे पाहिले जात आहे. २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या खेळाच्या या महाकुंभात १३५ कोटी लोकसंख्येचा आपला देश किती पदकांची मजल गाठेल, हे सांगणे कठीणच. मात्र त्यादृष्टीने सरकारी पातळीवर सुरू असलेले प्रयत्न आणि खेळाडूंनी चालविलेली प्रयत्नांची पराकाष्ठा याचा उल्लेख व्हायलाच हवा.भारताचा ऑलिम्पिकचा इतिहास फारसा चांगला नाही. आतापर्यंत केवळ २८ पदके देशाच्या वाट्याला आली, त्यात ९ सुवर्ण आहेत. या नऊमध्ये वैयक्तिक खात्यात एकच सुवर्ण, ते म्हणजे नेमबाजीत अभिनव बिंद्राचे पदक. तरीही टोकियोत सर्वोत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा करणे गैर नाही. यासाठी ज्यांच्याकडून सर्वाधिक आशा आहेत त्यात २१ व्या वर्षी रिओ ऑलिम्पिकचे रौप्य जिंकणारी पी.व्ही. सिंधू हिचे नाव सर्वांत आघाडीवर असेल. विश्व विजेतेपदाचा मुकुट स्वत:कडे खेचून सिंधूने अपेक्षा वाढवली. ऑलिम्पिक सुवर्णाची आता तिच्याकडून आशा करता येईल.एमसी मेरीकोम हे नाव विश्व बॉक्सिंगवर अधिराज्य गाजविणारे आहे. ती टोकियोत खेळेल की नाही हे निश्चित नसले तरी मेरीकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत, युवा अमित पांघल यानेही विश्व बॉक्सिंगचे ऐतिहासिक रौप्य जिंकून ऑलिम्पिक पदकाची आशा पल्लवित केली आहे. शूटिंगमध्ये भारताला सर्वाधिक अपेक्षा असेल. एनआरएआयने स्वत: ऑलिम्पिकमध्ये किमान पाच पदके जिंकण्याचा दावा केला आहे. सौरभ चौधरी, मनू भाकर, अपूर्वी चंदेला हे सर्व दावेदार असतील. सौरभने यंदा विश्व शूटिंग स्पर्धेत ६ सुवर्ण जिंकले. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात तो पदकाचा प्रबळ दावेदार असेल. अंजुम मुदगिल आणि राही सरनोबत या क्रमश: १० मीटर एअर रायफल आणि २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात आशास्थान आहेत.भारोत्तोलनात २०१ ते २०४ किलो वजन उचलू शकल्यास मीराबाई चानूकडूनही पदकाची अपेक्षा बाळगता येईल. अ‍ॅथलेटिक्समध्ये पात्रता गाठू शकल्यास भालाफेकपटू नीरज चोप्रा, हिमा दास, दूती चंद, मोहम्मद अनस आदी खेळाडू आपापली कामगिरी उंचावू शकतील, मात्र पदकाची अपेक्षा बाळगणे घाईचे ठरेल असे दिसते. आर्चरीत दीपिका आणि अतानू दास हे भारतीय आव्हान देणार आहेत.भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाने पात्रता गाठली आहे. दोन्ही संघ पदकाच्या निर्धाराने उतरणार असले तरी मार्गातील अडथळे सोपे नाहीत. टेनिसमध्ये सानिया मिर्झा-अंकिता रैना ही जोडी दुहेरीत किती मजल गाठते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.२००८ च्या बीजिंग ते २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकपर्यंत कुस्तीने भारताला एक तरी पदक जिंकून दिले आहे. यंदा कुस्तीकडून किमान दोन पदकांची आशा बाळगता येईल. सर्वांत मोठी भिस्त बजरंग पुनियावर असेल. अनेक स्पर्धांमध्ये पदक विजेता असलेल्या बजरंगची नजर यंदा सुवर्णावर राहील. याशिवाय महिला मल्ल विनेश फोगाट हिच्याकडूनही पदकाची आशा आहे.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020