शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

चार गडी राखत भारताची विंडीजवर मात

By admin | Updated: March 6, 2015 19:57 IST

चार गडी राखत भारताने विंडीजवर मात केली. देशभरात होळीचा सण साजरा होत असताना भारताच्या विजयाने भारतीयांच्या ऊत्साहाला उधाण आले आहे.

ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. ६ - चार गडी राखत भारताने विंडीजवर मात केली. देशभरात होळीचा सण साजरा होत असताना भारताच्या विजयाने भारतीयांच्या ऊत्साहाला उधाण आले आहे. 
जेरॉम टेलरच्या तेज गोलंदाजीपुढे रोहित शर्मा व शिखऱ धवन अनुक्रमे सात व नऊ धावा करत तंबूत परतल्याने भारतीय प्रेक्षकांची घोर निराशा झाली होती. विराट कोहलीचा जम बसत असतानाच रसेलच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना मार्लन सॅम्युअलकडे झेल गेल्याने ३३ धावांवर त्याला तंबूत परतावे लागले. फक्त १४ धावा करत केमर रॉचच्या चेंडूवर यष्टिरक्षक रामादिनकडे झेल गेल्याने अजिंक्य रहाणे बाद झाला. 
 
तीन चौकार व एक षटकार लगावत कर्णधार धोनीने ५६ चेंडूत ४५ धावा केल्या. भारतीय फलंदाजांपुढे वेस्ट इंडिजचा तेज तर्रार गोलंदाज जेरॉम टेलर व आंद्रे रसेल या गोलंदाजांचे आव्हान होते.  आठ षटकांमध्ये टेलरने ३३ धावा देत रोहित शर्मा व शिखर धवन या पहिल्या फळीतील फलंदाजांना तंबूत परत पाठवले. तसेच आंद्रे रसेल ने ४३ धावा देत विराट कोहली व रविंद्र जडेजा यांचा बळी घेतला होता. कर्णधार धोनी व रविचेंद्र अश्विन यांच्या टिकून राहण्याने भारताला विजय सहज शक्य झाला.