शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

भारताची आयर्लंडवर ८ विकेट्सने मात

By admin | Updated: March 10, 2015 13:17 IST

शिखर धवनचे शानदार शतकाच्या जोरावर भारताने आयर्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला.

 ऑनलाइन लोकमत 

हॅमिल्टन, दि. १० -  शिखर धवनचे शानदार शतक (१००) आणि रोहित शर्माच्या ६४ धावांच्या  खेळीच्या जोरावर भारताने आयर्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला. विशवचषक स्पर्धेतील भारताचा हा सलग पाचवा विजय आहे. शर्मा व धवन बाद झाल्यानंतर विराट कोहली (४४) व अजिंक्य रहाणेने (३३) विजयावर शिक्कामोर्तब केले. शिखर धवनने ११ चौकार व ५ षटकार ठोकत विश्वचषक स्पर्धेतील दुसरे शतक ८४ चेंडूत पूर्ण केले. त्याला रोहित शर्माचीही चांगली साथ मिळाली होती, मात्र ६४ धावांवर असताना शर्मा बाद झाला. शतक पूर्ण झाल्यावर धवनही तंबूत परतला. त्यानंतर कोहली व रहाणेने चांगली खेळी करत अवघ्या ३६.५ षटकांतच भारताला विजय मिळवून दिला. आयर्लंडतर्फे थॉम्प्सनने २ बळी टिपले.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या आयर्लंडने भारतासमोर विजयासाठी २६० धावांचे लक्ष्य ठेवले. विल्यम पोर्टरफिल्डने ६७ धावांची खेळी करत आयर्लंडला चांगली सुरूवात करून दिली खरी मात्र त्यानंतर त्यांचा डाव गडगडला आणि फलंदाज पटापट तंबूत परतले. मात्र नील ओब्रायनने ७५ धावांची महत्वपूर्ण खेळी करून आयर्लंडला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. तळाचे गडी लवकर बाद झाल्याने आयर्लंडचा डाव २५९ धावांवर आटोपला. भारतातर्फे शमीने ३, अश्विनने २ तर यादव, शर्मा, जडेजा व रैनाने १ बळी टिपला.