शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

भारताची आयर्लंडवर ८ विकेट्सने मात

By admin | Updated: March 10, 2015 13:17 IST

शिखर धवनचे शानदार शतकाच्या जोरावर भारताने आयर्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला.

 ऑनलाइन लोकमत 

हॅमिल्टन, दि. १० -  शिखर धवनचे शानदार शतक (१००) आणि रोहित शर्माच्या ६४ धावांच्या  खेळीच्या जोरावर भारताने आयर्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला. विशवचषक स्पर्धेतील भारताचा हा सलग पाचवा विजय आहे. शर्मा व धवन बाद झाल्यानंतर विराट कोहली (४४) व अजिंक्य रहाणेने (३३) विजयावर शिक्कामोर्तब केले. शिखर धवनने ११ चौकार व ५ षटकार ठोकत विश्वचषक स्पर्धेतील दुसरे शतक ८४ चेंडूत पूर्ण केले. त्याला रोहित शर्माचीही चांगली साथ मिळाली होती, मात्र ६४ धावांवर असताना शर्मा बाद झाला. शतक पूर्ण झाल्यावर धवनही तंबूत परतला. त्यानंतर कोहली व रहाणेने चांगली खेळी करत अवघ्या ३६.५ षटकांतच भारताला विजय मिळवून दिला. आयर्लंडतर्फे थॉम्प्सनने २ बळी टिपले.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या आयर्लंडने भारतासमोर विजयासाठी २६० धावांचे लक्ष्य ठेवले. विल्यम पोर्टरफिल्डने ६७ धावांची खेळी करत आयर्लंडला चांगली सुरूवात करून दिली खरी मात्र त्यानंतर त्यांचा डाव गडगडला आणि फलंदाज पटापट तंबूत परतले. मात्र नील ओब्रायनने ७५ धावांची महत्वपूर्ण खेळी करून आयर्लंडला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. तळाचे गडी लवकर बाद झाल्याने आयर्लंडचा डाव २५९ धावांवर आटोपला. भारतातर्फे शमीने ३, अश्विनने २ तर यादव, शर्मा, जडेजा व रैनाने १ बळी टिपला.