शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटमध्येही भारत पाकिस्तानच्या उरी... न्यूझीलंडला नमवत रँकिंगमध्ये अव्वल

By admin | Updated: October 3, 2016 17:47 IST

न्यूझीलंडसोबत दुसरा कसोटी सामना खेळणा-या भारताने मालिका 2 - 0 अशी खिशात टाकतानाच कसोटी क्रिकेटच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान पुन्हा पटकावले.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 3 - न्यूझीलंडचा 197 धावांमध्ये धुव्वा उडवत भारताने 179 धावांनी दुसरी कसोटी जिंकत मालिका 2 - 0 अशी खिशात टाकली आहे. भारताने पहिल्या डावात 316 व दुसऱ्या डावात 263 धावा केल्या. तर न्यूझीलंडने पहिल्या डावात 204 व दुसऱ्या डावात 197 धावा केल्या. गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेल्या या सामन्यामध्ये न्यूझीलंडसमोर विजयासाठी 376 धावांचे लक्ष्य होते. मात्र, प्रत्येकी तीन विकेट घेणाऱ्या अश्विन व जाडेजाने किवींना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. त्यांना भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शामीने चांगली साथ दिली.  शेवटचा गडी मोहम्मद शमीने टिपला. त्याच्या बाउन्सरवर मुरली विजयकडे झेल देत बोल्ट बाद झाला आणि भारताने मालिका खिशात टाकतानाच कसोटी क्रिकेटच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान पुन्हा पटकावले. दोन्ही डावांमध्ये अर्धशतके झळकावणाऱ्या आणि चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या वृद्धीमान साहाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या विजयाबरोबरच कर्णधार विराट कोहलीनेही एक विक्रम केला आहे. पाच कसोटी मालिकांमध्ये एकही मालिका न गमावण्याचा विक्रम कोहलीने केला आहे.
 
दरम्यान, भारताने आत्तापर्यंत कसोटी क्रिकेटच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी राहण्याचा काळ...
 
- नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोबर 2011 - 21 महिने
- जानेवारी 2016 ते फेब्रुवारी 2016 - 1 महिना
- ऑगस्ट 2016 ते ऑगस्ट 2016 - 5 दिवस
- ऑक्टोबर 2016 ते ---
 
 
भारताने दुसऱ्या डावामध्ये रोहीत शर्मा (82), वृद्धीमान साहा (58) आणि विराट कोहली (45) यांच्या जीवावर चांगली धावसंख्या उभी केली आणि न्यूजीलंडसमोर विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय गोलंदाजांनाही चांगला मारा करत भारताला चौथ्या दिवसाअखेरीसच विजय मिळवून दिला. लेथम वगळता न्यूझीलंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही.
या विजयामुळे भारताने कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तान रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर होता, मात्र या विजयामुळे आता भारत पहिल्या स्थानी आला आहे.
भारताचा दुसरा डाव 263 धावांवर आटोपला होता आणि विजयासाठी 376 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. न्यूझीलंडचा पहिला डाव 204 धावांत गुंडाळत 112 धावांची आघाडी घेणाऱ्या भारताने अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी दुसऱ्या डावात 8 बाद 227 धावांची मजल मारली होती. आज सकाळी खेळ सुरु झाल्यानंतर भारताने आपल्या राहिलेल्या दोन विकेट्सही गमावल्या. ईडन गार्डनमध्ये आतापर्यंत विदेशी संघाची चौथ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या 233 आहे. ही धावसंख्या 1961-62मध्ये इंग्लंडने फटकावली होती. त्यामुळे या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघापुढे मोठे आव्हान आहे.
 
रोहित शर्माने आपल्या आवडत्या ईडन गार्डन मैदानावर सूर गवसल्याचे संकेत देताना रविवारी ८२ धावांची खेळी केली आणि त्याने रिद्धिमान साहासोबत शतकी भागीदारी करीत भारताला न्यूझीलंडविरुद्ध ३०० पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवून दिली होती. रोहित, साहा व विराट यांच्या संघर्षपूर्ण खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
 
 
पहिल्या डावात ३१६ धावा फटकाविणाऱ्या भारताची कर्णधार विराट कोहलीच्या ४५ धावांच्या खेळीनंतरही दुसऱ्या डावात एकवेळ ६ बाद १०६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर रोहित व साहा (नाबाद ३९) यांनी सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. ईडनवर गेल्या पाच कसोटी सामन्यांत भारतातर्फे सातव्या विकेटसाठी ही पाचवी शतकी भागीदारी ठरली. 
 
सुरुवातीला जपून खेळणाऱ्या रोहितने त्यानंतर आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना काही आकर्षक फटके मारले. दुसऱ्या टोकाकडून साहाने त्याला योग्य साथ दिली. पहिल्या डावात नाबाद ५४ धावांची खेळी करणाऱ्या साहाने दुसऱ्या डावातही बचावात्मक व आक्रमक खेळाचा नजारा सादर केला.