शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

भारतासमोर मालिका विजयाचे लक्ष्य

By admin | Updated: January 19, 2017 00:52 IST

इंग्लंडविरुद्ध आज येथे होणारा मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने ‘विराट’सेना उतरणार आहे

कटक : कठीण लक्ष्याचा पाठलाग करीत विजय नोंदविणाऱ्या टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावताच इंग्लंडविरुद्ध आज येथे होणारा मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने ‘विराट’सेना उतरणार आहे.धावांचा पाठलाग करण्यात पटाईत असलेल्या विराटने पुण्यात स्वत: मोर्चा सांभाळून ३०० हून अधिक धावांचे आव्हान सर करीत भारताला चमत्कारिक विजय मिळवून दिला होता. कोहलीने १७ वे शतक ठोकले तर विजयाचा नायक ठरलेल्या केदार जाधव याने ६५ चेंडूत शतकी खेळी केली होती. तीनदा ३५० वर धावांचा पाठलाग करीत विजय नोंदविणारा भारत एकमेव संघ आहे. या तिन्ही विजयात विराटने शतक ठोकले हे देखील विशेष.जाधवमुळे आश्चर्यचकित झालेला प्रतिस्पर्धी कर्णधार इयोन मॉर्गन म्हणाला, ‘आम्ही विराटविरुद्ध डावपेच आखले होते. जाधवच्या खेळीची जाणीव नव्हतीच. त्याने आमचा विजय हिरावून घेतला.’ बाराबती स्टेडियम भारतासाठी लकी ठरले. येथे १५ पैकी ११ वन डे भारताने जिंकले. येथे युवराजच्या कामगिरीवर नजर असेल. तो ३०० वन डे पासून केवळ सहा सामने दूर आहे. पहिल्या सामन्यात भारताची गोलंदाजी साधारण झाती. दरम्यान अमित मिश्राला संधी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. (वृत्तसंस्था)>इंग्लंडवरही विजय मिळविण्याचे दडपण आहे. त्यासाठी गोलंदाजीत सुधारणा घडवून आणण्याचे आव्हान कर्णधारापुढे असेल. ख्रिस व्होक्स आणि डेव्हिड व्हिले यांना सुरुवातीला बळी मिळाले पण नंतर सर्वच गोलंदाज निष्प्रभावी ठरले. बेन स्टोक्सने ७३ धावा मोजल्या होत्या.बाराबती स्टेडियमवर मागचा वन डे २ नोव्हेंबर २०१४ ला खेळला गेला. भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात ३६३ धावा ठोकल्यानंतर लंकेवर १६९ धावांनी विजय साजरा केला. ४ आॅक्टोबर २०१५ ला याच मैदानावर भारताने टी-२० सामना खेळला. त्यात भारत ९२ धावांत बाद होताच सहा गड्यांनी पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. नाराज प्रेक्षकांनी मैदानात कागदी रॉकेट भिरकावल्यामुळे खेळ खोळंबला. यंदा सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.या रेकॉडर््सवर असणार नजर...१०६ धावांची खेळी केल्यास माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय सामन्यात ख्रिस गेलच्या ९,२२१ धावांचा विक्रम मागे टाकेल. असे केल्यास जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये धोनी १६व्या स्थानी येईल. आणखी एक शतक ठोकल्यास कर्णधार विराट कोहली श्रीलंकेचा माजी धडाकेबाज फलंदाज सनथ जयसूर्याच्या २८ एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी करेल. शिवाय, कोहली सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानी येईल.चार षटकार ठोकल्यास महेंद्रसिंग धोनी ब्रेंडन मॅक्क्युलमच्या २०० षटकार ठोकण्याचा विक्रम मोडून सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी येईल.पुनरागम करणाऱ्या युवराजला १५० षटकारांचा विक्रम करण्यासाठी एका षटकाराची गरज आहे.अष्टपैलू रवींद्र जडेजाला १५० बळी पूर्ण करण्यासाठी २ बळींची गरज.धावांचा पाठलाग करताना पुन्हा शतक ठोकण्यात कोहली यशस्वी झाला तर तो सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडू शकतो. कोहली व सचिनने धावांचा पाठलाग करताना प्रत्येकी १७ शतक झळकावली आहेत. >उभय संघ यातून निवडणारभारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. आश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, जयंत यादव, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार आणि अमित मिश्रा.इंग्लंड : इयोन मोर्गन(कर्णधार), जेसन राय, अ‍ॅलेक्स हेल्स, ज्यो रुट, जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस व्होक्स, डेव्हिड व्हिले, आदील रशीद, जॅक बॉल, लियाम डॉसन, जॉनी बेयरस्टॉ, सॅम बिलिंग्स, लियॉम प्लंकेट.