शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

यजमान संघाला अनुकूल खेळपट्ट्या हव्यात

By admin | Updated: November 4, 2015 01:37 IST

वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टीबाबत झालेला वाद आता इतिहास असून यजमान संघ स्वत:ला अनुकूल खेळपट्ट्या तयार करतात आणि यात लपविण्यासारखे काही नाही, असे

मोहाली : वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टीबाबत झालेला वाद आता इतिहास असून यजमान संघ स्वत:ला अनुकूल खेळपट्ट्या तयार करतात आणि यात लपविण्यासारखे काही नाही, असे टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.भारतीय संघ ५ नोव्हेंबरपासून जगातील अव्वल कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. शास्त्री म्हणाले, ‘या मालिकेच्या निमित्ताने चुरस अनुभवायला मिळेल.’पीसीए स्टेडियममध्ये बोलताना शास्त्री म्हणाले,‘यजमान संघाला अनुकूल खेळपट्ट्या मिळायला हव्यात. यात लपविण्यासारखे काही नाही. वर्षानुवर्षे असेच चालत असून आपल्या देशात आपण याची अपेक्षा करायला हवी. दक्षिण आफ्रिका किंवा आॅस्ट्रेलियात खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून चेंडू वळत नाही, येथे काय होते हे बघावे लागेल. दक्षिण आफ्रिका संघ फॉर्मात असून गेल्या १० वर्षांतील ही सर्वोत्तम मालिका होईल.’ शास्त्री पुढे म्हणाले की, कोहली बऱ्याच दिवसांपासून कसोटी कर्णधारपद सांभाळत आहे. श्रीलंकेत मालिका विजय मिळविल्यामुळे कोहली कर्णधार म्हणून परिपक्व होत असल्याची प्रचिती येते. (वृत्तसंस्था)रविचंद्रन आश्विन ठणठणीत असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहे. आश्विन चांगली गोलंदाज करीत आहे. आमच्या संघात अन्य दोन फिरकीपटू असून, पाहुणा संघ जर केवळ आश्विनवर लक्ष देणार असेल, तर अन्य दोन फिरकीपटू त्यांच्यापुढे अडचण निर्माण करू शकतात, हे विसरता येणार नाही.- रवी शास्त्री