शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
3
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...

पराभव टाळण्यासाठी यजमानांचा संघर्ष

By admin | Updated: August 1, 2015 00:30 IST

सलामीवीर अभिनव मुकुंद (५९), भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली (४५) आणि श्रेयस अय्यर (४९) यांनी दिलेल्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर भारत ‘अ’ संघ आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध अनौपचारिक

चेन्नई : सलामीवीर अभिनव मुकुंद (५९), भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली (४५) आणि श्रेयस अय्यर (४९) यांनी दिलेल्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर भारत ‘अ’ संघ आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध अनौपचारिक कसोटी सामन्यात पराभव टाळण्यासाठी संघर्ष करीत आहे. पहिल्या डावात २१४ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारत ‘अ’ संघाने आज तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ६ बाद २६५ धावांची मजल मारली. भारत ‘अ’ संघाकडे आता ५१ धावांच्या आघाडी असून चार विकेट शिल्लक आहेत.त्याआधी, कालच्या ९ बाद ३२९ धावसंख्येवरून पुढे खेळताना आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा पहिला डाव ३४९ धावांत संपुष्टात आला. भारत ‘अ’ संघातर्फे बाबा अपराजितने ८६ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले आणि कसोटी संघात स्थान न मिळालेला डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझाने १०७ धावांत ४ फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या भारत ‘अ’ संघाची दुसऱ्या डावात सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार चेतेश्वर पुजारा (११) स्टिव्हन ओकिफेच्या थेट थ्रोवर धावचित झाला. पुजाराने २७ चेंडूंना सामोरे जाताना १ चौकार लगावला. त्यानंतर मुकुंद, विराट, करुण नायर आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली फलंदाजी करीत संघाचा डाव सावरला. मुकुंदने १६३ चेंडूंना सामोेरे जाताना ५९ धावा फटकावल्या. त्यात ३ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. विराटने ४५ धावांची खेळी पाच चाौकार व १ षटकाराने सजवली. नायरने ३४ चेंडूंमध्ये आक्रमक ३१ धावा फटकावताना ७ चौकार ठोकले. श्रेयस अय्यरने ८ चौकारांच्या सहाय्याने ४९ धावा फटकावल्या. मुकुंद व विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. विराटला ओकिफेने क्लीनबोल्ड करीत भारत ‘अ’ संघाला दुसरा धक्का दिला. मुकुंदने नायरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. नायरला गुरिंदर संधूने माघारी परतवले. मुकुंद व अय्यर यांनी चौथ्या विकेटासठी ६९ धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करणाऱ्या मुकुंदला एश्टन एगरने बाद केले. यजमान संघाने २०३ धावसंख्या असताना चौथी विकेट गमावली. मुकुंद बाद झाल्यानंतर ६ धावांच्या अंतरात अय्यरही माघारी परतला. त्याला ओकिफेने बाद केले. नमन ओझा (३०) आणि अपराजित (नाबद २८) यांनी सहाव्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाच्या खेळातील काही षटके शिल्लक असताना ओकिफेने ओझाला तंबूचा मार्ग दाखवला. ओझाने ४४ चेंडूंमध्ये ३० धावा फटकावल्या. त्यात ३ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक भारत-अ पहिला डाव १३५; आॅस्ट्रेलिया-अ पहिला डाव ३४९; भारत-अ दुसरा डाव : ८३ षटकांत ६ बाद २६७; (अभिनव मुकुंद ५९, श्रेयस अय्यर ४९, विराट कोहली ४५, करुण नायर ३१, नमन ओझा ३0, बाबा अपराजित खेळत आहे २८, चेतेश्वर पुजारा ११, श्रेयस गोपाल खेळत आहे 0, स्टीव्ह ओकीफे ३/८३, गुरिंदर संधू १/७४, एशटन एगर १/७१).