शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

फायनल गाठण्याची आशा

By admin | Updated: January 16, 2015 04:18 IST

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर वन-डेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज असलेला भारतीय वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुढच्या महिन्यात प्रारंभ होत

मेलबर्न : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर वन-डेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज असलेला भारतीय वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुढच्या महिन्यात प्रारंभ होत असलेल्या विश्वकप स्पर्धेत टीम इंडिया जेतेपद राखण्यासाठी गत कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. संघाच्या नव्या वन-डे किटच्या अनावरणप्रसंगी बोलताना धोनी म्हणाला, ‘‘आम्ही २०११ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहोत. पण वातावरणातील बदल महत्त्वाची भूमिका बजावणार असून, आम्हाला त्यानुसार खेळावे लागेल. क्रिकेटच्या कुठल्याही स्वरूपासाठी मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) जागतिक क्रिकेटच्या आयोजनासाठी असलेल्या सर्वश्रेष्ठ स्थळांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत वन-डे क्रिकेटमध्ये आम्ही केलेल्या कामगिरीपेक्षा आम्ही चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य निश्चित केले असून, १९ मार्च रोजी होणाऱ्या विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आम्ही पुन्हा खेळू, अशी आशा आहे.’’आॅस्ट्रेलियात पुढील दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीमध्ये वन-डे क्रिकेटची धूम राहणार आहे. यजमान आॅस्ट्रेलियासह भारत व इंग्लंडचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेनंतर पुढील महिन्यात विश्वकप स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. तिरंगी मालिकेत भारताची पहिली लढत एमसीजीवर आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाच्या विश्वकप स्पर्धेच्या मोहिमेला १५ फेब्रुवारीपासून अ‍ॅडलेडमध्ये प्रारंभ होणार आहे. येथे ‘ब’ गटात भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. धोनीने अलीकडेच संपलेल्या भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेत एमसीजीवर अनिर्णीत संपलेल्या तिसऱ्या लढतीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण आता धोनी वन-डे टीमचा कर्णधार म्हणून मैदानावर परतणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या लढतीत विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले. आपल्या नेहमीच्या शैलीत धोनी म्हणाला, ‘‘मी विश्रांती घेतली. कुठल्याही खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे अभिमानाची बाब आहे. क्रिकेटमध्ये भारतात चुरस असून काहीच खेळाडूंना हा पोशाख (टीम इंडियाची जर्सी) परिधान करण्याची संधी मिळते. त्यामुळे येथे पुन्हा एकदा ही जर्सी परिधान करताना आनंद वाटतो.’’ आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत शानदार कामगिरी करणारा कोहली तिरंगी मालिका व त्यानंतर विश्वकप स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.भारतीय संघ बुधवारी येथे दाखल झाला असून, कसोटी मालिकेनंतर पाच दिवसांच्या विश्रांतीचा आनंद घेत संघ आता सरावासाठी सज्ज झाला आहे. तिरंगी मालिका व विश्वकप स्पर्धेसाठी संघात समावेश असलेल्या सर्व खेळाडूंसह रवींद्र जडेजाही येथे दाखल झाला आहे. त्याने क्षेत्ररक्षणाचा सराव केला. जडेजाच्या फिटनेसबाबत अद्याप निश्चित सांगणे घाईचे ठरेल. दरम्यान, सिडनीमध्ये आॅस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीने तिरंगी मालिकेचा प्रारंभ होणार आहे. (वृत्तसंस्था)