शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

हिंद केसरीसह महाराष्ट्र केसरींचे मानधन रखडले; दहा महिने प्रलंबित तर सरकारचेही दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 02:57 IST

अशा बिकटच्या परिस्थितीत राज्याचा क्रीडाविभाग या मल्लांच्या मागणीला दाद देत नाही. वारंवार पत्रव्यवहार, विनंती अर्ज करून ही मंडळी आता थकली आहेत

कोल्हापूर : राज्यातील सात हिंद केसरींसह ३0 हून अधिक महाराष्ट्र केसरी ज्येष्ठ मल्लांचे मानधन गेल्या दहा महिन्यांपासून रखडले आहे. मिळणारे मानधन किमान एक ते सात तारखेपर्यंत खात्यावर जमा व्हावे, अशी सर्वसाधारण अपेक्षा या मल्लांकडून व्यक्त होत आहे; मात्र त्यांच्या मागणीला क्रीडा खाते दाद देत नाही.

एकेकाळी कुस्ती म्हटले की, कोल्हापूरसह पुणे, सांगली, नगर या शहरांचा दबदबा राज्यात होता. त्यात हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी झालेले मल्ल म्हटले की त्यांचा सन्मान केला जात होता. वेळच्या वेळी ज्येष्ठ झालेल्या मल्लांना मानधन दिले जात होते; मात्र कालांतराने सरकार बदलत गेले, तसे त्यांचे दिवसही पालटत गेले. महिन्याकाठी थेट बँक खात्यावर जमा होणारे मानधन कधी चार महिने, तर कधी वर्षभर जमा होईनासे झाले. हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांना राज्य शासन प्रतिमहिना सहा हजार रुपये इतके मानधन देते; मात्र हे मानधन गेल्या १0 महिन्यांपासून मल्लांना न मिळाल्याने यावरच निर्वाह असलेल्या मल्लांना हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. आयुष्यातील उमेदीची वर्षे कुस्तीमध्ये घालविलेल्या मल्लांना उतारवयात योग्य आहार न मिळाल्याने अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यात औषधोपचारांचा खर्च न परवडणारा आहे. मानधनधारक मल्ल अशा या तुटपुंज्या का असेना मानधनावरच अवलंबून आहेत.

अशा बिकटच्या परिस्थितीत राज्याचा क्रीडाविभाग या मल्लांच्या मागणीला दाद देत नाही. वारंवार पत्रव्यवहार, विनंती अर्ज करून ही मंडळी आता थकली आहेत; त्यामुळे क्रीडाप्रेमी असलेल्या राज्याचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून या मंडळींचे मानधन वाढवून वेळच्या वेळी द्यावे, अशी मागणी या मल्लांकडून केली जात आहे.मानधन का रखडले?मानधनाचा निधी जिल्हा क्रीडा कार्यालयात गेल्या आठवडाभरापूर्वी आला आहे; मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडियासाठी गेलेले आहेत; त्यामुळे हे मानधन बीडीएस प्रणालीद्वारे ते यापूर्वीच करून जाणे गरजेचे होते; मात्र ते आता विचारणा केल्यानंतर शुक्रवार (दि. १७) पर्यंत मल्लांच्या खात्यावर जमा केले जाईल, असे सांगत आहेत. अशा बाबी वारंवार कुस्तीगीरांच्या मानधनाबाबत होत आहेत.जेवढे मानधन आम्हाला महिन्याकाठी देता, ते तरी वेळेत द्यावे. यापूर्वी आम्ही मानधन वाढवून देण्याची क्रीडा खात्याकडे मागणी केली होती. त्याची दखल न घेता त्या अर्जांना केराची टोपली दाखविली आहे. तेव्हा आता उद्धवजींच्या सरकारने तरी आमची दखल घेऊन आम्हाला योग्य न्याय द्यावा. - हिंद केसरी दीनानाथसिंह

टॅग्स :Wrestlingकुस्ती