शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हिंद केसरीसह महाराष्ट्र केसरींचे मानधन रखडले; दहा महिने प्रलंबित तर सरकारचेही दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 02:57 IST

अशा बिकटच्या परिस्थितीत राज्याचा क्रीडाविभाग या मल्लांच्या मागणीला दाद देत नाही. वारंवार पत्रव्यवहार, विनंती अर्ज करून ही मंडळी आता थकली आहेत

कोल्हापूर : राज्यातील सात हिंद केसरींसह ३0 हून अधिक महाराष्ट्र केसरी ज्येष्ठ मल्लांचे मानधन गेल्या दहा महिन्यांपासून रखडले आहे. मिळणारे मानधन किमान एक ते सात तारखेपर्यंत खात्यावर जमा व्हावे, अशी सर्वसाधारण अपेक्षा या मल्लांकडून व्यक्त होत आहे; मात्र त्यांच्या मागणीला क्रीडा खाते दाद देत नाही.

एकेकाळी कुस्ती म्हटले की, कोल्हापूरसह पुणे, सांगली, नगर या शहरांचा दबदबा राज्यात होता. त्यात हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी झालेले मल्ल म्हटले की त्यांचा सन्मान केला जात होता. वेळच्या वेळी ज्येष्ठ झालेल्या मल्लांना मानधन दिले जात होते; मात्र कालांतराने सरकार बदलत गेले, तसे त्यांचे दिवसही पालटत गेले. महिन्याकाठी थेट बँक खात्यावर जमा होणारे मानधन कधी चार महिने, तर कधी वर्षभर जमा होईनासे झाले. हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांना राज्य शासन प्रतिमहिना सहा हजार रुपये इतके मानधन देते; मात्र हे मानधन गेल्या १0 महिन्यांपासून मल्लांना न मिळाल्याने यावरच निर्वाह असलेल्या मल्लांना हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. आयुष्यातील उमेदीची वर्षे कुस्तीमध्ये घालविलेल्या मल्लांना उतारवयात योग्य आहार न मिळाल्याने अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यात औषधोपचारांचा खर्च न परवडणारा आहे. मानधनधारक मल्ल अशा या तुटपुंज्या का असेना मानधनावरच अवलंबून आहेत.

अशा बिकटच्या परिस्थितीत राज्याचा क्रीडाविभाग या मल्लांच्या मागणीला दाद देत नाही. वारंवार पत्रव्यवहार, विनंती अर्ज करून ही मंडळी आता थकली आहेत; त्यामुळे क्रीडाप्रेमी असलेल्या राज्याचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून या मंडळींचे मानधन वाढवून वेळच्या वेळी द्यावे, अशी मागणी या मल्लांकडून केली जात आहे.मानधन का रखडले?मानधनाचा निधी जिल्हा क्रीडा कार्यालयात गेल्या आठवडाभरापूर्वी आला आहे; मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडियासाठी गेलेले आहेत; त्यामुळे हे मानधन बीडीएस प्रणालीद्वारे ते यापूर्वीच करून जाणे गरजेचे होते; मात्र ते आता विचारणा केल्यानंतर शुक्रवार (दि. १७) पर्यंत मल्लांच्या खात्यावर जमा केले जाईल, असे सांगत आहेत. अशा बाबी वारंवार कुस्तीगीरांच्या मानधनाबाबत होत आहेत.जेवढे मानधन आम्हाला महिन्याकाठी देता, ते तरी वेळेत द्यावे. यापूर्वी आम्ही मानधन वाढवून देण्याची क्रीडा खात्याकडे मागणी केली होती. त्याची दखल न घेता त्या अर्जांना केराची टोपली दाखविली आहे. तेव्हा आता उद्धवजींच्या सरकारने तरी आमची दखल घेऊन आम्हाला योग्य न्याय द्यावा. - हिंद केसरी दीनानाथसिंह

टॅग्स :Wrestlingकुस्ती