शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

होबार्ट सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजी सुधारेल?

By admin | Updated: January 22, 2015 00:17 IST

पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजी क्रमात केलेले प्रयोग आणि नवे संयोजन तपासूनही पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने भारतीय संघाची फलंदाजी सुधारण्याची चिन्हे नाहीत.

सिडनी : पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजी क्रमात केलेले प्रयोग आणि नवे संयोजन तपासूनही पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने भारतीय संघाची फलंदाजी सुधारण्याची चिन्हे नाहीत. यावर तोडगा म्हणून विराट कोहली याला तिरंगी मालिकेत चौथ्या स्थानावर पाठवून फलंदाजीतील उणिवा दूर सारण्याचे ‘टीम इंडिया’चे प्रयत्न राहतील. महेंद्रसिंग धोनीच्या संघाला इंग्लंडकडून मंगळवारी नऊ गड्यांनी पराभवाचा धक्का बसला. या पराभवामुळे भारत ‘करा किंवा मरा’ अशा अवस्थेत पोहोचला आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध होबार्ट येथे पुढचा सामना खेळण्याआधी धोनीची चिंता वाढली. विराटला चौथ्या स्थानावर पाठविण्याचा आपला निर्णय किती योग्य होता, हे सांगायला पराभवानंतरही धोनी विसरला नाही. तो म्हणाला, ‘आम्ही मधली आणि तळाची फळी अधिक सक्षम बनवू इच्छीतो. रवींद्र जडेजा संघात नाही. शिवाय, स्टुअर्ट बिन्नी खेळला असता, तर विराटला तिसऱ्या स्थानावर पाठवू शकलो असतो. अक्षर पटेल किंवा अश्विन अंतिम एकादशमध्ये असते, तरी सुरेश रैना याला पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर पाठविता आले असते. त्यानंतर फलंदाजी शिल्लक राहात नाही. विराट चौथ्या स्थानावर खेळायला आला आणि गडी लवकर बाद झाले, तर विराटला १२ किंवा १३ व्या षटकात खेळपट्टीवर येण्याची संधी मिळते. अशावेळी तो एक टोक सांभाळून खेळू शकतो आणि आम्ही त्याला दुसऱ्या टोकावर साथ देऊ शकतो.’खरेतर कोहलीला नव्या स्थानावर ताळमेळ साधण्यास पुरेसा वेळ हवा. शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या लवकर बाद होण्यामुळे समस्या बिकट होत आहे. डावखुरा धवन २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफीत ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’चा पुरस्कार जिंकल्यापासून संघात आहे. यादरम्यान विदेशात त्याने केवळ दोन वन-डे शतके ठोकली. गोलंदाजी ही तर संघाची फार मोठी डोकेदुखी. कमकुवत माऱ्यामुळे तिरंगी मालिकेत सपाटून मार खावा लागला आणि आता स्पर्धेबाहर होण्याची वेळ आली. आॅस्ट्रेलिया- इंग्लंड हे शुक्रवारी होबार्ट येथे एकमेकाविरुद्ध खेळतील. या सामन्यातील विजयी संघ १ फेब्रुवारी रोजी पर्थमध्ये होणाऱ्या अंतिम लढतीसाठी पात्र ठरणार आहे.(वृत्तसंस्था)कोहली मेलबोर्न आणि ब्रिस्बेनच्या दोन्ही सामन्यात गरज नसताना फटका मारून बाद झाला. त्याने क्रमश: नऊ आणि चार धावा केल्या आहेत. अशावेळी त्याला तिसऱ्या स्थानावर पाठविले जाते की मग चौथ्या स्थानावर कायम ठेवले जाते हे पाहणे रंजक ठरेल. कोहलीने तिसऱ्या स्थानावर खेळून २१ पैकी १४ वन डे शतके झळकविली आहेत.