शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

होबार्ट सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजी सुधारेल?

By admin | Updated: January 22, 2015 00:17 IST

पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजी क्रमात केलेले प्रयोग आणि नवे संयोजन तपासूनही पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने भारतीय संघाची फलंदाजी सुधारण्याची चिन्हे नाहीत.

सिडनी : पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजी क्रमात केलेले प्रयोग आणि नवे संयोजन तपासूनही पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने भारतीय संघाची फलंदाजी सुधारण्याची चिन्हे नाहीत. यावर तोडगा म्हणून विराट कोहली याला तिरंगी मालिकेत चौथ्या स्थानावर पाठवून फलंदाजीतील उणिवा दूर सारण्याचे ‘टीम इंडिया’चे प्रयत्न राहतील. महेंद्रसिंग धोनीच्या संघाला इंग्लंडकडून मंगळवारी नऊ गड्यांनी पराभवाचा धक्का बसला. या पराभवामुळे भारत ‘करा किंवा मरा’ अशा अवस्थेत पोहोचला आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध होबार्ट येथे पुढचा सामना खेळण्याआधी धोनीची चिंता वाढली. विराटला चौथ्या स्थानावर पाठविण्याचा आपला निर्णय किती योग्य होता, हे सांगायला पराभवानंतरही धोनी विसरला नाही. तो म्हणाला, ‘आम्ही मधली आणि तळाची फळी अधिक सक्षम बनवू इच्छीतो. रवींद्र जडेजा संघात नाही. शिवाय, स्टुअर्ट बिन्नी खेळला असता, तर विराटला तिसऱ्या स्थानावर पाठवू शकलो असतो. अक्षर पटेल किंवा अश्विन अंतिम एकादशमध्ये असते, तरी सुरेश रैना याला पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर पाठविता आले असते. त्यानंतर फलंदाजी शिल्लक राहात नाही. विराट चौथ्या स्थानावर खेळायला आला आणि गडी लवकर बाद झाले, तर विराटला १२ किंवा १३ व्या षटकात खेळपट्टीवर येण्याची संधी मिळते. अशावेळी तो एक टोक सांभाळून खेळू शकतो आणि आम्ही त्याला दुसऱ्या टोकावर साथ देऊ शकतो.’खरेतर कोहलीला नव्या स्थानावर ताळमेळ साधण्यास पुरेसा वेळ हवा. शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या लवकर बाद होण्यामुळे समस्या बिकट होत आहे. डावखुरा धवन २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफीत ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’चा पुरस्कार जिंकल्यापासून संघात आहे. यादरम्यान विदेशात त्याने केवळ दोन वन-डे शतके ठोकली. गोलंदाजी ही तर संघाची फार मोठी डोकेदुखी. कमकुवत माऱ्यामुळे तिरंगी मालिकेत सपाटून मार खावा लागला आणि आता स्पर्धेबाहर होण्याची वेळ आली. आॅस्ट्रेलिया- इंग्लंड हे शुक्रवारी होबार्ट येथे एकमेकाविरुद्ध खेळतील. या सामन्यातील विजयी संघ १ फेब्रुवारी रोजी पर्थमध्ये होणाऱ्या अंतिम लढतीसाठी पात्र ठरणार आहे.(वृत्तसंस्था)कोहली मेलबोर्न आणि ब्रिस्बेनच्या दोन्ही सामन्यात गरज नसताना फटका मारून बाद झाला. त्याने क्रमश: नऊ आणि चार धावा केल्या आहेत. अशावेळी त्याला तिसऱ्या स्थानावर पाठविले जाते की मग चौथ्या स्थानावर कायम ठेवले जाते हे पाहणे रंजक ठरेल. कोहलीने तिसऱ्या स्थानावर खेळून २१ पैकी १४ वन डे शतके झळकविली आहेत.