शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

आयपीएलमध्ये निचांकी धावसंख्येचा इतिहास

By admin | Updated: April 24, 2017 07:12 IST

ईडन्स गार्डनवर झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगलुरूने आपल्या नावावर निचांकी विक्रमाची नोंद

आकाश नेवे / ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 24 - ईडन्स गार्डनवर झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगलुरूने आपल्या नावावर निचांकी विक्रमाची नोंद केली. विराट आणि कंपनीने केकेआर विरोधात फक्त ४९ धावा केल्या. केकेआरच्या भेदक गोलंदाजीसमोर आरसीबीच्या फलंदाज खेळपट्टीवर हजेरी लावून परतले.विस्फोटक ख्रिस गेल, रन मशिन विराट कोहली, धडाकेबाज एबीडी, फटकेबाजीत धुरंधर असलेला केदार जाधव असे सरस फलंदाज असलेल्या रॉयल चँलेजर्स बंगलुरू संघाने आयपीएलच्या दहाही पर्वातील सर्वात निचांकी धावसंख्या नोंदवली. आरसीबीच्या एकाही फलंदाजात दुहेरी आकडा गाठता आला नाही. तर पुर्ण संघाला १० षटकेही खेळून काढता आली नाही. पूर्ण संघ फक्त ५८ धावात बाद झाला. चौथ्या आणि सहाव्या षटकाचा अपवाद सोडला तर प्रत्येक षटकांत आरसीबीने गडी गमावला आहे. आरसीबीच्या या पतनाची सुरूवातच झाली ती विराट कोहलीपासून. पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर कोहली बाद झाला. त्यानंतर मनदीप सिंहला बढती देण्याचा निर्णय पुन्हा एकदा अपयशी ठरला. जखमेनंतर पुनरागमन करणारा डिव्हिलियर्सही तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजांनी फक्त खेळपट्टीवर हजेरी लावली.

श्रीनाथ अरविंद याने नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर व्होक्सला एक चौकार लगावला. मात्र हा चौकार गेला कसा हे त्याला देखील कळले नाही. आरसीबीच्या एकाही फलंदाजांच्या खेळी आत्मविश्वास जाणवून येत नव्हता. एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलंडता आली नाही. तीन फलंदाज तर शुन्यावर बाद झाले. केदार जाधव याने सर्वाधिक ९ धावा केल्या. केकेआरच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा प्रशिक्षक जॅक कॅलीस यांचा विश्वास सार्थ ठरवला. कुल्टर - नाईल, व्होक्स, डी - ग्रॅण्डहोम या तिकडीने आरसीबीच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावु दिले नाही. गौतम गंभीरच्या आक्रमक नेतृत्वाने हा सामना जिंकला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याने आक्रमक क्षेत्ररक्षण लावले. मागच्या गेल्या काही सामन्यांपासून क्षेत्ररक्षणात केलेले बदल केकेआरसाठी फायदेशीर ठरले आहेत. इडन्सच्या खेळपट्टीशी चांगला परिचित असलेल्या गंभीरने या सामन्यात चार जलदगती गोलंदाजांना खेळवण्याचा निर्णय घेतला. तो चांगलाच फायदेशीर ठरला. त्याने या सामन्यात एकाही फिरकीपटूला गोलंदाजी दिली नाही. आरसीबीच्या फिरकीने केकेआरला गोत्यात आणल्यावरही त्याने फिरकीपटूला गोलंदाजी देण्याचा मोह टाळला. आरसीबीने नोंदवलेली ४९ ही सर्वात निचांकी धावसंख्या आहे. याबाबतीत त्यांनी २००९ चा राजस्थान रॉयल्सचा विक्रम मोडला. राजस्थानने त्या सामन्यात आरसीबी विरोधात ५८ धावा केल्या होत्या.निचांकी धावसंख्या नोंदवणारे दहा संघ-

-आरसीबी - ९.५ षटकांत ४९ विरुद्ध केकेआर, आयपीएल २०१७-राजस्थान रॉयल्स १५.१ षटकांत ५८  विरुद्ध आरसीबी आयपीएल २००९-मुंबई इंडियन्स १५.२ षटकांत ६७ विरुद्ध केकेआर आयपीएल २००८-आरसीबी १५ षटकांत ७०विरुद्ध राजस्थान रॉयल्स आयपीएल २०१४-कोची टस्कर्स केरला १६.३ षटकांत ७४ विरुद्ध डेक्कन चाजर्स आयपीएल २०११