शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अडीच किलोमीटर पुरातून पोहून जात त्याने मिळवले रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 04:00 IST

पुराच्या पाण्यातून सुमारे अडीच किलोमीटर अंतर पोहत जाऊन राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे.

 - प्रकाश बेळगोजीबेळगाव : पुराच्या पाण्यातून सुमारे अडीच किलोमीटर अंतर पोहत जाऊन राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील मन्नूर येथील निशांत मनोहर कदम याने.येथील ज्योती महाविद्यालयात निशांत बारावीत शिकतो. राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी त्याची कर्नाटक राज्य संघात निवड झाली होती. ही स्पर्धा सात आॅगस्टला बंगळुरू येथे होती. मात्र याच दरम्यान सुरु झालेल्या पावसामुळे येथील मार्कंडेय नदीला मोठा पूर आला.या पूरामुळे मन्नूरचा बेळगावसह अन्य शहरांशी संपर्क तुटल्याने त्याच्यापुढे स्पर्धेला कसे जायचे हा प्रश्न निर्माण झाला. या स्पर्धेत सहभागी व्हायचेच, असे त्याने ठरवले होते. त्याच्या या जिद्दीला त्याच्या वडिलांनीही साथ देण्याचे ठरवले.शेतकरी असलेल्या मनोहर कदम यांनी निशांतचे सर्व साहित्य प्लास्टिकच्या पिशवीत गुंंडाळले व पुराच्या पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी तब्बल अडीच किलोमीटर अंतर पार करत बेळगाव गाठले. बापलेकांनी हे अंतर ४५ मिनिटांत पार केले. बेळगावहून रेल्वेने निशांतने बंगळुरू गाठले. या स्पर्धेत त्याने सहभाग तर घेतलाच त्याच बरोबर त्याने रौप्यपदकही पटकावले. निशांत अर्जुन पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक मुकुंद किल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुष्टियुद्धाचा सराव करत आहे.

टॅग्स :boxingबॉक्सिंगIndiaभारत