शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Tokyo Olympics 2020 : आजीच्या कष्टाचं झालं चीज, तिकीट कलेक्टर रेवथीला टोकियो ऑलिंपिकचं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 11:31 IST

मदुराई जिल्ह्यातील सक्कीमंगलम या लहानशा खेड्यात रोजंदारीवर काम करुन रेवथीच्या आजीने तिचा सांभाळ केला आहे. रेवथी 5 वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचे निधन झाले.

ठळक मुद्देआज रेवथीची टीम इंडियाकडून ऑलिंपिकसाठी निवड झाल्याचा अत्यानंद होत असल्याचे रेवथीची आजी आर्मलने म्हटलं आहे. तसेच, तिच्या प्रशिक्षकांचेही आभार मानले आहेत. 

मुंबई - भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टर असलेल्या रेवथी वीरामणीने टोकियो ऑलिंपिक 2020 स्पर्धेसाठी टीम इंडियात स्थान निश्चित केलं आहे. आपल्या ध्येयपूर्तीसाठी रेवथीने घेतलेले कष्ट आणि परिस्थितीशी दोनहात करत केलेला संघर्ष देशातील कोट्यवधी तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. तमिळनाडूच्या मदुराईची कन्या असलेल्या रेवथीला 4x400 मिश्र रिले संघात स्थान मिळवले आहे. 

भारतीय अॅथलेटीक्स महासंघाने टोकियो ऑलिंपिक 2020 साठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यामध्ये, मिश्र रिले 4x400 क्रीडा प्रकरात सार्थक भांबरी, एलेक्स एँटनी, रेवथी वीरामणी, सुभा व्यंकटेशन आणि धनलक्ष्मी सेकर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी रेवथी तमिळनाडूची असून सध्या रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून कार्यरत आहे. रेवथीच्या या यशाबद्दल रेल्वे विभागाकडूनही तिचं अभिनंदन करत तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.  ग्रॅज्यूएट असेल्या 23 वर्षीय रेवथीच्या आई-वडिलांचे तिच्या लहानपणीच निधन झाले होते. त्यानंतर, आजीनेच काबाडकष्ट करत तिला लहानाचं मोठं केलं. रेवथीसह तिच्या लहान बहिणीचा सांभाळही आजीनेच केला. आता रेवथीने टोकियो ऑलिंपिंकचे तिकीट फिक्स केलं आहे. मिक्स रिले या क्रीडाप्रकारात रेवथी देशाचं प्रतिनिधित्व करत असून संपू्र्ण देशाच्या नजरा तिच्याकडे लागल्या आहेत. 

मदुराई जिल्ह्यातील सक्कीमंगलम या लहानशा खेड्यात रोजंदारीवर काम करुन रेवथीच्या आजीने तिचा सांभाळ केला आहे. रेवथी 5 वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यानंतर, तिच्या आईच्या आईने म्हणजेच आजीनेच दोन्ही लहान मुलांना सांभाळले. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने बुट घेण्यासाठीही पैसे नव्हते. त्यावेळी, अनेकदा रेवथीने अनवाणी सराव केला. आजी आर्मलने रेवथीला घडविण्यात मोठं योगदान दिलं. तसेच, तामिळनाडूच्या क्रीडा विकास प्राधिकरणाचे प्रशिक्षक कन्नन यांनीही शाळेतच रेवथीमधील धावपटूचे गुण ओळखले. त्यानंतर त्यांनी तिच्या क्रीडा क्षेत्रातील भरारीसाठी मदत व मार्गदर्शन केलं. 

रेवती शाळेत असताना तिच्यातील धावपटूचे गुण ओळखून तिच्या शिक्षकांनी रेवथीला प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यासाठी विचारले. त्यावेळी, सुरुवातीला आजीला नको वाटत होते. पण, शिक्षकांच्या आग्रहानंतर आजीने रेवथीला प्रशिक्षणसााठी पाठवले. आज रेवथीची टीम इंडियाकडून ऑलिंपिकसाठी निवड झाल्याचा अत्यानंद होत असल्याचे रेवथीची आजी आर्मलने म्हटलं आहे. तसेच, तिच्या प्रशिक्षकांचेही आभार मानले आहेत. 

दरम्यान, याच महिन्यात 23 जुलैपासून जपानच्या टोकियो येथे ऑलिंपिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. भारताकडून आत्तापर्यंत 115 खेळाडूंची स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020madurai-pcमदुराईTamilnaduतामिळनाडूTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ