शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

सरकारचे ज्वाला, अश्विनीकडे दुर्लक्ष नाही

By admin | Updated: May 30, 2015 01:44 IST

टायगेट आॅलिम्पिक पोडियम (टीओपी) योजनेसाठी दुहेरीतील अव्वल महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा यांच्याकडे मंत्रालयाने कधी दुर्लक्ष केलेले नाही,

नवी दिल्ली : टायगेट आॅलिम्पिक पोडियम (टीओपी) योजनेसाठी दुहेरीतील अव्वल महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा यांच्याकडे मंत्रालयाने कधी दुर्लक्ष केलेले नाही, असे शुक्रवारी क्रीडा मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये त्यांच्या नावावर चर्चा करण्यात आली होती, असेही मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. २०११ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये अश्विनीच्या साथीने कांस्यपदक पटकावणाऱ्या ज्वालाने टीओपी योजनेमध्ये समावेश न करण्यात आल्यामुळे क्रीडा मंत्रालयावर टीका केली होती. क्रीडा मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले की, २१ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये ज्वाला व अश्विनीच्या नावावर चर्चा करण्यात आली होती. सूत्राने पुढे म्हटले की, ‘खासदार अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील ओळख समितीच्या २१ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये टीओपी योजनेत समावेश करण्यासाठी ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा यांच्या नावावर विचार करण्यात आला. राष्ट्रकुल २०१४ च्या स्पर्धेनंतरच्या त्यांच्या कामगिरीबाबत चर्चा झाली. चर्चेनंतर समितीने स्पष्ट केले की, त्यांचा समावेश करण्याचा व दुहेरीतील खेळाडूंसाठी संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबतचा निर्णय नंतर घेण्यात येईल.’टीओपी योजनेंतर्गत रिओ आॅलिम्पिक २०१६ साठी पदक पटकावण्याची आशा असलेल्या खेळाडूंना उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंत्रालयाने या योजनेसाठी सहा बॅडमिंटन खेळाडूंची निवड केलेली आहे. त्यात आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, पारुपल्ली कश्यप, के. श्रीकांत, गुरू साईदत्त व एच.एस. प्रणय यांचा समावेश आहे. मंत्रालायातर्फे योजनेसाठी खेळाडूंच्या नावांची घोषणा झाल्यानंतर, ज्वालाने राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यावर टीका केली होती. गोपीचंद यांनी स्वत:च्या अकादमीतील खेळाडूंना प्राधान्य दिले असून निवड करताना पक्षपात केला, असे आरोप ज्वालाने केले होते. सूत्राने सांगितले की,‘ओळख समितीने त्यांना वगळलेले नाही. समितीतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयावर समितीचे सदस्य पुलेला गोपीचंद यांना दोषी ठरवणे चुकीचे आहे. समितीच्या सदस्यांनी सर्व निर्णय संयुक्तपणे घेतलेले आहे. सध्या टीओपी योजनेसाठी निवड प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याचप्रमाणे या योजनेत समावेश नसलेल्या खेळाडूंनाही राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या योजनेंतर्गत सरकारतर्फे मदत मिळत आहे.’ (वृत्तसंस्था)